शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जायकवाडी धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर; कोणत्याही क्षणी गोदावरी पात्रात विसर्ग होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 11:28 IST

गोदावरी नदी पात्रात विसर्ग होणार असल्याने प्रशासनाने गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे

पैठण : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाचा पाणीसाठा ९० टक्के झाला असून, कोणत्याही क्षणी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, अहमदनगर या जिल्ह्यांतील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जायकवाडी धरणाची पाणीपातळी एका महिन्यातच १३ वरून ९० टक्क्यांवर आली आहे. धरणात सध्या १६ हजार १८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरणाची पाणीपातळी ९५ टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतर धरणातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीतील निर्णयानंतर गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येईल, अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली.

दरम्यान, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी दुपारी ४ वाजता जायकवाडी धरणास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात राहून गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचे नियोजन करा. नागरिकांना सतर्कतेचा इशारा द्यावा, तसेच सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा, असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जि.प. सीईओ विकास मीना, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार सारंग चव्हाण, चेअरमन विलास भुमरे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीRainपाऊसAurangabadऔरंगाबाद