शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यावर पाणीटंचाईचे सावट; उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी पाण्याचे सीमोल्लंघन अडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 11:39 IST

 दोन वर्षांपूर्वीच्या घोषणेची पूर्तता झालीच नाही; अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांतून अपेक्षित असलेले ११ ते १३ टीएमसी पाणी अद्याप जायकवाडीत न आल्याने मराठवाड्यावर पाणीटंचाईचे सावट

छत्रपती संभाजीनगर : २०२१ साली विजयदशमीच्या मुहूर्तावर मराठवाड्यासाठी मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंजुरी दिली होती. मात्र, दोन वर्षांनंतरही या पाण्याचे सीमोल्लंघन झाले नाही. शिवाय, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांतून अपेक्षित असलेले ११ ते १३ टीएमसी पाणी अद्याप जायकवाडीत न आल्याने मराठवाड्यावर पाणीटंचाईचे सावट आले आहे.

मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९७५ चा पाणी वापर संरक्षित असल्याने मराठवाड्यासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होत नव्हते. मात्र, त्यातील त्रुटी दुरुस्त केल्याने मराठवाड्यासाठी १९.२९ टीएमसी पाणी उपलब्ध झाले असल्याची घोषणा तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केली होती. १९७५ पूर्वीचा पाणीवापर अबाधित ठेवून तो निर्णय झाल्याचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने सांगितले होते. या निर्णयामुळे परभणी, नांदेड, बीड, हिंगोली जिल्ह्यांसाठी लाभ होऊन तेथे काही नवीन प्रकल्प बांधणे शक्य होईल, असा दावा महामंडळाने केला होता. मात्र, दोन वर्षांनंतरदेखील या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही.

वरच्या धरणातील पाण्याचे काय? मराठवाड्यात यंदा १५ टक्के पावसाची तूट आहे. समन्यायी पाणीवाटप सूत्रानुसार जायकवाडीत १५ ऑक्टोबर रोजी सुमारे ४९.८४ टी.एम.सी. म्हणजेच ६५ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठी असेल, तर अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून उर्वरित पाणी सोडणे आवश्यक आहे. यंदा तर जायकवाडीत केवळ ४७ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे वरच्या धरणातून किमान २० टक्के पाणी सोडणे अपेक्षित आहे; परंतु अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही.

मराठवाड्याची दिशाभूलनिम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास, तसेच मध्य गोदावरी उपखोऱ्यातून १९.२९ टीएमसी पाणी उपलब्ध करण्यास दिलेली मंजुरी दिशाभूल करणारी आहे. २०२१ साली शासनाने मराठवाड्याच्या जनतेची दिशाभूल केली आहे. ते पाणी मराठवाड्याला कसे आणणार, हे कळण्यास मार्ग नाही. दमणगंगेच्या पाण्याविना मराठवाड्याला पर्याय नाही, असे मत मराठवाडा विकास मंडळाचे माजी सदस्य शंकर नागरे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीRainपाऊसAurangabadऔरंगाबाद