पुनर्वसित नानसी गावात पाणीटंचाईचा बळी
By Admin | Updated: September 25, 2014 00:53 IST2014-09-25T00:36:49+5:302014-09-25T00:53:07+5:30
मंठा : निम्नदुधना प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील नानसी गावाचे स्थलांतर झाले खरे. परंतु त्या ठिकाणी पाणीटंचाई असल्याने गावालगत हेलस शिवारात विहिरीवर पाणी

पुनर्वसित नानसी गावात पाणीटंचाईचा बळी
मंठा : निम्नदुधना प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील नानसी गावाचे स्थलांतर झाले खरे. परंतु त्या ठिकाणी पाणीटंचाई असल्याने गावालगत हेलस शिवारात विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना २३ सप्टेंबर रोजी घडली.
बळीराम लक्ष्मण चव्हाण (वय ३५) असे या मृत तरूणाचे नाव आहे. याबाबत मंठा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पुनर्वसित नानसी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशी मागणी होऊन देखील प्रशासकीय पातळीवर त्याकडे दुर्लक्ष झाले. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून अंतर्गत जलवाहिनीचे काम करण्यात आले. परंतु निम्न दुधना प्रकल्प कार्यालयाकडून गावात पाणीपुरवठा करण्यासाठी विहिर व विहिर ते गाव जलवाहिनी, जलकुंभ मंजूर नसल्याचे ग्रामस्थ ंबंडूनाना निर्वळ यांनी सांगितले.
निम्न दुधनाचे पाणी अडविण्यासाठी गावकऱ्यांचे तात्काळ स्थलांतर करण्यात आले. परंतु कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आलेली नाही. ऐन सणासुदीच्या काळात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.