पाणीटंचाईचा मंत्रालयीन पथकाने घेतला आढावा
By Admin | Updated: April 28, 2015 00:28 IST2015-04-28T00:15:25+5:302015-04-28T00:28:19+5:30
जालना : जिल्ह्यात टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा मंत्रालयीन समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला

पाणीटंचाईचा मंत्रालयीन पथकाने घेतला आढावा
जालना : जिल्ह्यात टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा मंत्रालयीन समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला. टंचाई निवारणार्थ आवश्यक असलेल्या निधीचे प्रस्ताव तातडीने
या समितीमध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव महेश सावंत, कक्ष अधिकारी राजेंद्र कुमटणी, सहाय्यक राम साबणे यांचा समावेश होता. यावेळी बोलताना उपसचिव महेश सावंत म्हणाले की, जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीवर मात करताना टँकरद्वारे पाणीपुरवठा ही सर्वात शेवटची उपाययोजना असून आवश्यकता असेल त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. तसेच पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठीच्या उपाययोजना हाती घ्याव्यात. टंचाई निवारणार्थ आवश्यक असलेल्या निधीचे प्रस्ताव मंत्रालयास पाठविले नसतील तर ते तातडीने पाठविण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी या बैठकीस केल्या.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, परतूरचे उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे, अंबडचे श्रीमंत हरकर, तहसीलदार छाया पवार, महेश सावंत, बालाजी क्षीरसागर, ज्योत्स्ना धुळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदार, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
यावेळी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी पथकास जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देऊन उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.
४तसेच जि.प. च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एन. तांगडे यांनी मंत्रालयीन पथकास पॉवर पॉर्इंट प्रेझेटेशनद्वारे जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण, गावांची संख्या, गावे, जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये उपलब्ध पाणीसाठा, नवीन विंधन विहिरी घेणे, विहिरींची विशेष दुरूस्ती, नळयोजना, तात्पुरती पूरक नळयोजना त्याचबरोबर आवश्यक असलेल्या निधीची माहिती दिली.