शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

धरण उशाला,कोरड घशाला; औरंगाबादच्या पाणीटंचाईवर आज भाजपचा मोर्चा,१४ अटींवर परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 13:52 IST

पैठण गेट ते गुलमंडी मार्गे महात्मा फुले चौक मार्गे सांस्कृतिक मंडळ ते मनपा असा मोर्चा जाईल

औरंगाबाद : शहरात दर आठवड्याला होणारा पाणीपुरवठा १,६८० कोटी रुपयांच्या नवीन जलवाहिनी योजनेच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामाविरोधात भाजप २३ मे रोजी सायंकाळी ४ वा. पैठणगेट ते महापालिकेपर्यंत मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. कराड म्हणाले, शहरात आठ-आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. १,६८० काेटींची पाणीपुरवठा योजना आ. अतुल सावे यांनी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मंजूर करून घेतली. परंतु महाविकास आघाडी सरकारने नव्याने अध्यादेश काढून योजनेचे स्वरूप बदलले. त्याला मनपा प्रशासकांनीदेखील होकार दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिथे योजनेचे भूमिपूजन केले त्या ठिकाणचे कामदेखील सुरू झालेले नाही. सतरा ठिकाणी जलकुंभाचे काम सुरू केले, एकही काम पूर्ण झाले नाही. औरंगाबाद ते पैठण या महामार्गावर जलवाहिनीचे अलायनमेंट कसे असेल, याची माहितीदेखील समोर आलेली नाही. असे असेल तर ही जलवाहिनी१० वर्षे होणार नाही. या कारभाराविरोधात २३ मे रोजी मोर्चा काढून सरकारला जागे करण्यात येणार आहे. शहराध्यक्ष संजय केणेकर म्हणाले, सरकारने मोर्चाचा मार्ग बदलण्यासाठी पोलीस प्रशासनावर दबाव आणला. १४ अटींसह परवानगी दिली आहे. पैठण गेट ते गुलमंडी मार्गे महात्मा फुले चौक मार्गे सांस्कृतिक मंडळ ते मनपा असा मोर्चा जाईल, तेथे सभेने समारोप होईल. या मोर्चाची शिवसेनेने धास्ती घेतल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी राजू शिंदे, अनिल मकरिये, भगवान घडमोडे यांची उपस्थिती होती.

१२ टक्के झाले आहे योजनेचे कामआ. अतुल सावे यांनी आरोप केला, ऑक्टोबर २०२० मध्ये योजनेचे काम सुरू झाले. ३ वर्षांत योजनेचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. आजवरच्या काळात फक्त १२ टक्के काम झाले आहे. आधी जलवाहिनी पैठण ते औरंगाबाद टाकणे गरजेचे होते, परंतु ते काम बाजूस ठेवून जलकुंभ बांधण्यास प्राधान्य दिल्याने ही योजना समांतरच्या दिशेने जाईल, अशी भीती आहे. योजना २०८० कोटींवर गेली असून साडेचार कि.मी. जलवाहिनीचे काम झाल्याचा दावा त्यांनी केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाwater scarcityपाणी टंचाई