शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

धरण उशाला,कोरड घशाला; औरंगाबादच्या पाणीटंचाईवर आज भाजपचा मोर्चा,१४ अटींवर परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 13:52 IST

पैठण गेट ते गुलमंडी मार्गे महात्मा फुले चौक मार्गे सांस्कृतिक मंडळ ते मनपा असा मोर्चा जाईल

औरंगाबाद : शहरात दर आठवड्याला होणारा पाणीपुरवठा १,६८० कोटी रुपयांच्या नवीन जलवाहिनी योजनेच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामाविरोधात भाजप २३ मे रोजी सायंकाळी ४ वा. पैठणगेट ते महापालिकेपर्यंत मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. कराड म्हणाले, शहरात आठ-आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. १,६८० काेटींची पाणीपुरवठा योजना आ. अतुल सावे यांनी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मंजूर करून घेतली. परंतु महाविकास आघाडी सरकारने नव्याने अध्यादेश काढून योजनेचे स्वरूप बदलले. त्याला मनपा प्रशासकांनीदेखील होकार दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिथे योजनेचे भूमिपूजन केले त्या ठिकाणचे कामदेखील सुरू झालेले नाही. सतरा ठिकाणी जलकुंभाचे काम सुरू केले, एकही काम पूर्ण झाले नाही. औरंगाबाद ते पैठण या महामार्गावर जलवाहिनीचे अलायनमेंट कसे असेल, याची माहितीदेखील समोर आलेली नाही. असे असेल तर ही जलवाहिनी१० वर्षे होणार नाही. या कारभाराविरोधात २३ मे रोजी मोर्चा काढून सरकारला जागे करण्यात येणार आहे. शहराध्यक्ष संजय केणेकर म्हणाले, सरकारने मोर्चाचा मार्ग बदलण्यासाठी पोलीस प्रशासनावर दबाव आणला. १४ अटींसह परवानगी दिली आहे. पैठण गेट ते गुलमंडी मार्गे महात्मा फुले चौक मार्गे सांस्कृतिक मंडळ ते मनपा असा मोर्चा जाईल, तेथे सभेने समारोप होईल. या मोर्चाची शिवसेनेने धास्ती घेतल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी राजू शिंदे, अनिल मकरिये, भगवान घडमोडे यांची उपस्थिती होती.

१२ टक्के झाले आहे योजनेचे कामआ. अतुल सावे यांनी आरोप केला, ऑक्टोबर २०२० मध्ये योजनेचे काम सुरू झाले. ३ वर्षांत योजनेचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. आजवरच्या काळात फक्त १२ टक्के काम झाले आहे. आधी जलवाहिनी पैठण ते औरंगाबाद टाकणे गरजेचे होते, परंतु ते काम बाजूस ठेवून जलकुंभ बांधण्यास प्राधान्य दिल्याने ही योजना समांतरच्या दिशेने जाईल, अशी भीती आहे. योजना २०८० कोटींवर गेली असून साडेचार कि.मी. जलवाहिनीचे काम झाल्याचा दावा त्यांनी केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाwater scarcityपाणी टंचाई