शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

जायकवाडी धरण असलेल्या पैठण तालुक्यात पाणीटंचाई; ३३ गावांमध्ये टँकर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 16:35 IST

पैठण तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला नाही.

पैठण : तालुक्यात आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाली असून, ३३ गावांमध्ये ६२ टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पैठण तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे जमिनीतील पाणीपातळी कमालीची घटली आहे. परिणामी विहीर व हातपंपांचे पाणी कमी होत आहे. शिवाय नदी, नाल्यांना पाणी नसल्याने व विविध प्रकल्पांमधील पाणीसाठा घटल्याने आतापासूनच पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार तालुक्यातील आडुळ बुद्रुक, आडुळ खुर्द, अंतरवाली खांडी, ब्राह्मणगाव तांडा, गेवराई मर्दा, गेवराई बुद्रुक, गेवराई खुर्द, अब्दुल्लापूर, होनोबाची वाडी, एकतुनी, रजापूर, थापटी तांडा, आडगाव जावळे, कडेठाण खुर्द, ब्राह्मणगाव, दाभरूळ, दरेगाव, देवगाव, देवगाव तांडा, डोणगाव, टेकडी तांडा, खादगाव, तुपेवाडी, तुपेवाडी तांडा, चिंचाळा, मिरखेडा, केकत जळगाव, हर्षी बुद्रुक, चौंढाळा, हर्षी खुर्द, जामवाडी तांडा, रांजणगाव, दांडगा, सानपवाडी अशा ३३ गावांमध्ये ६२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शिवाय ३ गावांमध्ये खासगी विहिरीचे प्रशासनाने अधिग्रहण केले आहे. फेब्रुवारी माहिन्यात आणखी काही गावांची यात भर पडणार आहे. जानेवारीअखेरीसच पाणीटंचाई जाणवत असल्याने एप्रिल, मे महिन्यांत पाणीटंचाईची तीव्रता किती असेल, असा प्रश्न ग्रामस्थांना पडून लागला आहे.

प्रस्ताव आल्यास टँकर सुरू करणार : चव्हाणयाबाबत तहसीलदार सारंग चव्हाण म्हणाले, सध्या तालुक्यात ३३ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आणखी काही गावांनी टँकरची मागणी केल्यास संबधित गावांचे सरपंच व ग्रामसेवकांनी याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. संबंधित गावांची पाहणी करून परिस्थिती गंभीर असेल तर टँकरने पाणीपुरवठा केला जाईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसWaterपाणी