शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरण असलेल्या पैठण तालुक्यात पाणीटंचाई; ३३ गावांमध्ये टँकर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 16:35 IST

पैठण तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला नाही.

पैठण : तालुक्यात आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाली असून, ३३ गावांमध्ये ६२ टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पैठण तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे जमिनीतील पाणीपातळी कमालीची घटली आहे. परिणामी विहीर व हातपंपांचे पाणी कमी होत आहे. शिवाय नदी, नाल्यांना पाणी नसल्याने व विविध प्रकल्पांमधील पाणीसाठा घटल्याने आतापासूनच पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार तालुक्यातील आडुळ बुद्रुक, आडुळ खुर्द, अंतरवाली खांडी, ब्राह्मणगाव तांडा, गेवराई मर्दा, गेवराई बुद्रुक, गेवराई खुर्द, अब्दुल्लापूर, होनोबाची वाडी, एकतुनी, रजापूर, थापटी तांडा, आडगाव जावळे, कडेठाण खुर्द, ब्राह्मणगाव, दाभरूळ, दरेगाव, देवगाव, देवगाव तांडा, डोणगाव, टेकडी तांडा, खादगाव, तुपेवाडी, तुपेवाडी तांडा, चिंचाळा, मिरखेडा, केकत जळगाव, हर्षी बुद्रुक, चौंढाळा, हर्षी खुर्द, जामवाडी तांडा, रांजणगाव, दांडगा, सानपवाडी अशा ३३ गावांमध्ये ६२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शिवाय ३ गावांमध्ये खासगी विहिरीचे प्रशासनाने अधिग्रहण केले आहे. फेब्रुवारी माहिन्यात आणखी काही गावांची यात भर पडणार आहे. जानेवारीअखेरीसच पाणीटंचाई जाणवत असल्याने एप्रिल, मे महिन्यांत पाणीटंचाईची तीव्रता किती असेल, असा प्रश्न ग्रामस्थांना पडून लागला आहे.

प्रस्ताव आल्यास टँकर सुरू करणार : चव्हाणयाबाबत तहसीलदार सारंग चव्हाण म्हणाले, सध्या तालुक्यात ३३ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आणखी काही गावांनी टँकरची मागणी केल्यास संबधित गावांचे सरपंच व ग्रामसेवकांनी याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. संबंधित गावांची पाहणी करून परिस्थिती गंभीर असेल तर टँकरने पाणीपुरवठा केला जाईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसWaterपाणी