शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

भाजप, एमआयएममुळेच शहरात पाणीटंचाई,समांतरच्या योजनेचे वाटोळे त्यांनीच केले: चंद्रकांत खैरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 11:45 IST

समांतरच्या योजनेत भ्रष्टाचार केल्याचे दाखवून द्या, मी राजकारणातून संन्यास घेईन

औरंगाबाद : केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना समांतर जलवाहिनी मंजूर केली. मात्र, भाजप आणि एमआयएममुळेच त्या योजनेचे वाटोळे झाले. शहरातील पाणीटंचाईला भाजप आणि एमआयएम जबाबदार असल्याची टीका माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

समांतरच्या योजनेत भ्रष्टाचार केल्याचे दाखवून द्या, मी राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हानही त्यांनी दिले. शहरातील पाणीपुरवठ्याची परिस्थिती सुधारत आहे. हे भाजप आणि एमआयएमला देखवत नाही, शिवसेनेला श्रेय मिळू नये, यासाठी वाटेल ते आरोप करीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील भाजपच्या काही नगरसेवकांनी पाणीटंचाईवरून आंदोलन केले होते. मुंबई आणि औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला बदनाम करण्याचा यांचा डाव आहे. शहरात रस्ते, ड्रेनेज, पथदिव्यांची कामे झाली आहेत. पाणीपुरवठा योजनेचे काम देखील सुरू आहे. जलवाहिन्या मुद्दाम चोकअप करणे, जलकुंभांवर आंदोलन करण्याचे प्रकार सुरू आहेत. हे सगळे शिवसेनेला बदनाम करण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, कला ओझा, सुनीता आऊलवार, सुनीता देव यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाने मोर्चा काढावा का ?मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाने पाणीपुरवठ्यावर मोर्चा काढावा काय, असा सवाल खैरेंनी केला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सभेला सभेतून उत्तर देण्याची गरज काय होती? विधानसभेत बोलता आले असते. राज्य सरकारने शहराला भरपूर काही दिले आहे. मागच्या सरकारच्या काळात तुकडे - तुकडे करून निधी दिला. मात्र, जाहिराती मोठमोठ्या केल्याची टीकाही खैरे यांनी केली.

कराड, जलील, केणेकर यांच्यावर टीकाखा. इम्तियाज जलील यांना काहीही काम नाही. त्यांनी शहरातील कोणत्या भागात फिरून पाणीटंचाईचा आढावा घेत उपाययोजना केल्या, ते दाखवावे. लोकांच्या काय समस्या आहेत, हे त्यांना माहिती तरी आहे का, असे खैरे म्हणाले. मुस्लिम समाजाचे लोक माझ्याकडे समस्या सोडविण्यासाठी येतात. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे मनपात महापौर असताना त्यांनी काय कामे केली, हे मला माहीत आहे. तसेच भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर ‘टीनपाट’ असून त्यांचे सगळे ‘धंदे’ बाहेर काढण्याचा इशारा खैरे यांनी दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv Senaशिवसेनाwater scarcityपाणी टंचाई