शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

भाजप, एमआयएममुळेच शहरात पाणीटंचाई,समांतरच्या योजनेचे वाटोळे त्यांनीच केले: चंद्रकांत खैरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 11:45 IST

समांतरच्या योजनेत भ्रष्टाचार केल्याचे दाखवून द्या, मी राजकारणातून संन्यास घेईन

औरंगाबाद : केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना समांतर जलवाहिनी मंजूर केली. मात्र, भाजप आणि एमआयएममुळेच त्या योजनेचे वाटोळे झाले. शहरातील पाणीटंचाईला भाजप आणि एमआयएम जबाबदार असल्याची टीका माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

समांतरच्या योजनेत भ्रष्टाचार केल्याचे दाखवून द्या, मी राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हानही त्यांनी दिले. शहरातील पाणीपुरवठ्याची परिस्थिती सुधारत आहे. हे भाजप आणि एमआयएमला देखवत नाही, शिवसेनेला श्रेय मिळू नये, यासाठी वाटेल ते आरोप करीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील भाजपच्या काही नगरसेवकांनी पाणीटंचाईवरून आंदोलन केले होते. मुंबई आणि औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला बदनाम करण्याचा यांचा डाव आहे. शहरात रस्ते, ड्रेनेज, पथदिव्यांची कामे झाली आहेत. पाणीपुरवठा योजनेचे काम देखील सुरू आहे. जलवाहिन्या मुद्दाम चोकअप करणे, जलकुंभांवर आंदोलन करण्याचे प्रकार सुरू आहेत. हे सगळे शिवसेनेला बदनाम करण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, कला ओझा, सुनीता आऊलवार, सुनीता देव यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाने मोर्चा काढावा का ?मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाने पाणीपुरवठ्यावर मोर्चा काढावा काय, असा सवाल खैरेंनी केला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सभेला सभेतून उत्तर देण्याची गरज काय होती? विधानसभेत बोलता आले असते. राज्य सरकारने शहराला भरपूर काही दिले आहे. मागच्या सरकारच्या काळात तुकडे - तुकडे करून निधी दिला. मात्र, जाहिराती मोठमोठ्या केल्याची टीकाही खैरे यांनी केली.

कराड, जलील, केणेकर यांच्यावर टीकाखा. इम्तियाज जलील यांना काहीही काम नाही. त्यांनी शहरातील कोणत्या भागात फिरून पाणीटंचाईचा आढावा घेत उपाययोजना केल्या, ते दाखवावे. लोकांच्या काय समस्या आहेत, हे त्यांना माहिती तरी आहे का, असे खैरे म्हणाले. मुस्लिम समाजाचे लोक माझ्याकडे समस्या सोडविण्यासाठी येतात. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे मनपात महापौर असताना त्यांनी काय कामे केली, हे मला माहीत आहे. तसेच भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर ‘टीनपाट’ असून त्यांचे सगळे ‘धंदे’ बाहेर काढण्याचा इशारा खैरे यांनी दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv Senaशिवसेनाwater scarcityपाणी टंचाई