शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

भाजप, एमआयएममुळेच शहरात पाणीटंचाई,समांतरच्या योजनेचे वाटोळे त्यांनीच केले: चंद्रकांत खैरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 11:45 IST

समांतरच्या योजनेत भ्रष्टाचार केल्याचे दाखवून द्या, मी राजकारणातून संन्यास घेईन

औरंगाबाद : केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना समांतर जलवाहिनी मंजूर केली. मात्र, भाजप आणि एमआयएममुळेच त्या योजनेचे वाटोळे झाले. शहरातील पाणीटंचाईला भाजप आणि एमआयएम जबाबदार असल्याची टीका माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

समांतरच्या योजनेत भ्रष्टाचार केल्याचे दाखवून द्या, मी राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हानही त्यांनी दिले. शहरातील पाणीपुरवठ्याची परिस्थिती सुधारत आहे. हे भाजप आणि एमआयएमला देखवत नाही, शिवसेनेला श्रेय मिळू नये, यासाठी वाटेल ते आरोप करीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील भाजपच्या काही नगरसेवकांनी पाणीटंचाईवरून आंदोलन केले होते. मुंबई आणि औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला बदनाम करण्याचा यांचा डाव आहे. शहरात रस्ते, ड्रेनेज, पथदिव्यांची कामे झाली आहेत. पाणीपुरवठा योजनेचे काम देखील सुरू आहे. जलवाहिन्या मुद्दाम चोकअप करणे, जलकुंभांवर आंदोलन करण्याचे प्रकार सुरू आहेत. हे सगळे शिवसेनेला बदनाम करण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, कला ओझा, सुनीता आऊलवार, सुनीता देव यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाने मोर्चा काढावा का ?मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाने पाणीपुरवठ्यावर मोर्चा काढावा काय, असा सवाल खैरेंनी केला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सभेला सभेतून उत्तर देण्याची गरज काय होती? विधानसभेत बोलता आले असते. राज्य सरकारने शहराला भरपूर काही दिले आहे. मागच्या सरकारच्या काळात तुकडे - तुकडे करून निधी दिला. मात्र, जाहिराती मोठमोठ्या केल्याची टीकाही खैरे यांनी केली.

कराड, जलील, केणेकर यांच्यावर टीकाखा. इम्तियाज जलील यांना काहीही काम नाही. त्यांनी शहरातील कोणत्या भागात फिरून पाणीटंचाईचा आढावा घेत उपाययोजना केल्या, ते दाखवावे. लोकांच्या काय समस्या आहेत, हे त्यांना माहिती तरी आहे का, असे खैरे म्हणाले. मुस्लिम समाजाचे लोक माझ्याकडे समस्या सोडविण्यासाठी येतात. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे मनपात महापौर असताना त्यांनी काय कामे केली, हे मला माहीत आहे. तसेच भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर ‘टीनपाट’ असून त्यांचे सगळे ‘धंदे’ बाहेर काढण्याचा इशारा खैरे यांनी दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv Senaशिवसेनाwater scarcityपाणी टंचाई