शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘समांतर जलवाहिनी’चे पाणी कोसोदूर; कामाचा श्रीगणेशा करण्यासाठी वर्ष उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 12:56 IST

वर्षभरापूर्वी शिवसेना-भाजप युती सरकारने निवडणुकीपूर्वी १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली.

ठळक मुद्देअंमलबजावणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची निवड आठ ते दहा महिन्यांपासून मंजुरीची फाईल मंत्रालयात धूळ खात पडून

औरंगाबाद : ‘समांतर’ जलवाहिनीद्वारे शहरात मुबलक पाणी आणण्यासाठी वर्षभरापूर्वी नवीन योजना मंजूर करण्यात आली. योजनेचा श्रीगणेशा करण्यासाठी राज्य शासनाकडून चालढकल करण्यात येत आहे. त्यामुळे अवघ्या ६० किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्यासाठी नागरिकांना वर्षानुवर्षे वाट बघावी लागत आहे. 

वर्षभरापूर्वी शिवसेना-भाजप युती सरकारने निवडणुकीपूर्वी १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. ५५ दिवसांत युती सरकारने ही योजना मंजूर केली. विशेष बाब म्हणजे योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची निवड करण्यात आली. प्राधिकरणातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर डीपीआर तयार करून निविदा काढली. नामाकिंत कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला. त्यातील एका कंपनीची निवड करण्यात आली. कंपनीला काम सुरू करण्यासाठी अंतिम आदेश देणे बाकी आहे. त्यापूर्वी राज्य शासनाकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला मंजुरी हवी आहे. मागील आठ ते दहा महिन्यांपासून ही फाईल मंत्रालयात धूळ खात पडली आहे. सत्ताधारी अधूनमधून योजनेचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची निव्वळ घोषणा करतात. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी काहीच होत नाही. जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत २२०० मि.मी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकून शहरात मुबलक पाणी आणणे हे सर्वात मोठे ध्येय आहे. मागील वर्षीप्रमाणे जायकवाडी धरण तुडुंब भरले आहे. धरणात प्रचंड पाणीसाठा असताना आम्हाला आठवड्यातून एकदा पाणी का मिळते? दिवाळीसारख्या सणाला महापालिकेकडून मुबलक पाणीपुरवठा का होत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतो. जायकवाडी येथून मोठ्या प्रमाणात पाणी आणण्याची क्षमताच महापालिकेकडे नाही. मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादकरांना निव्वळ समांतर जलवाहिनीचे गाजर दाखविण्यात येत आहे. प्रत्यक्षात अंमलबजावणी काहीच होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये महापालिकेबद्दल प्रचंड चीड निर्माण होत आहे. महापालिका इच्छा असूनही काहीच करू शकत नाही, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. राज्य शासनाने नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यासाठी अंतिम मंजुरी दिली तरी संबंधित कंपनीला वर्क ऑर्डर देता येणार नाही अशी परिस्थिती आहे. 

६०० कोटी रुपये महापालिकेचा वाटाराज्य शासनाने १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असला तरी महापालिकेला योजनेत आपला वाटा म्हणून तब्बल ६०० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. महापालिकेच्या तिजोरीतून कर्मचाऱ्यांचा पगार करण्याची क्षमता प्रशासनामध्ये नाही. राज्य शासनाकडून दर महिन्याला अनुदान प्राप्त झाल्यानंतरच कर्मचाऱ्यांचा पगार होऊ शकतो. अशा गंभीर आर्थिक परिस्थितीत महापालिका ६०० कोटी रुपये कोठून आणणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण