शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

‘समांतर जलवाहिनी’चे पाणी कोसोदूर; कामाचा श्रीगणेशा करण्यासाठी वर्ष उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 12:56 IST

वर्षभरापूर्वी शिवसेना-भाजप युती सरकारने निवडणुकीपूर्वी १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली.

ठळक मुद्देअंमलबजावणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची निवड आठ ते दहा महिन्यांपासून मंजुरीची फाईल मंत्रालयात धूळ खात पडून

औरंगाबाद : ‘समांतर’ जलवाहिनीद्वारे शहरात मुबलक पाणी आणण्यासाठी वर्षभरापूर्वी नवीन योजना मंजूर करण्यात आली. योजनेचा श्रीगणेशा करण्यासाठी राज्य शासनाकडून चालढकल करण्यात येत आहे. त्यामुळे अवघ्या ६० किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्यासाठी नागरिकांना वर्षानुवर्षे वाट बघावी लागत आहे. 

वर्षभरापूर्वी शिवसेना-भाजप युती सरकारने निवडणुकीपूर्वी १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. ५५ दिवसांत युती सरकारने ही योजना मंजूर केली. विशेष बाब म्हणजे योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची निवड करण्यात आली. प्राधिकरणातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर डीपीआर तयार करून निविदा काढली. नामाकिंत कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला. त्यातील एका कंपनीची निवड करण्यात आली. कंपनीला काम सुरू करण्यासाठी अंतिम आदेश देणे बाकी आहे. त्यापूर्वी राज्य शासनाकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला मंजुरी हवी आहे. मागील आठ ते दहा महिन्यांपासून ही फाईल मंत्रालयात धूळ खात पडली आहे. सत्ताधारी अधूनमधून योजनेचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची निव्वळ घोषणा करतात. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी काहीच होत नाही. जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत २२०० मि.मी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकून शहरात मुबलक पाणी आणणे हे सर्वात मोठे ध्येय आहे. मागील वर्षीप्रमाणे जायकवाडी धरण तुडुंब भरले आहे. धरणात प्रचंड पाणीसाठा असताना आम्हाला आठवड्यातून एकदा पाणी का मिळते? दिवाळीसारख्या सणाला महापालिकेकडून मुबलक पाणीपुरवठा का होत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतो. जायकवाडी येथून मोठ्या प्रमाणात पाणी आणण्याची क्षमताच महापालिकेकडे नाही. मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादकरांना निव्वळ समांतर जलवाहिनीचे गाजर दाखविण्यात येत आहे. प्रत्यक्षात अंमलबजावणी काहीच होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये महापालिकेबद्दल प्रचंड चीड निर्माण होत आहे. महापालिका इच्छा असूनही काहीच करू शकत नाही, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. राज्य शासनाने नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यासाठी अंतिम मंजुरी दिली तरी संबंधित कंपनीला वर्क ऑर्डर देता येणार नाही अशी परिस्थिती आहे. 

६०० कोटी रुपये महापालिकेचा वाटाराज्य शासनाने १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असला तरी महापालिकेला योजनेत आपला वाटा म्हणून तब्बल ६०० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. महापालिकेच्या तिजोरीतून कर्मचाऱ्यांचा पगार करण्याची क्षमता प्रशासनामध्ये नाही. राज्य शासनाकडून दर महिन्याला अनुदान प्राप्त झाल्यानंतरच कर्मचाऱ्यांचा पगार होऊ शकतो. अशा गंभीर आर्थिक परिस्थितीत महापालिका ६०० कोटी रुपये कोठून आणणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण