शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

छत्रपती संभाजीनगरात आठवड्यातून एकदाच पाणी; त्यातही दिवस, वेळ निश्चित नाही

By मुजीब देवणीकर | Updated: August 22, 2023 19:45 IST

पाच दिवसांआड पाणी देण्याची महापालिकेची घोषणा कागदावरच

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पाणीप्रश्नावर यापूर्वी अनेकदा खंडपीठात चर्चा झाली. महापालिकेने शपथपत्र सादर करून शहराला पाच दिवसांआड पाणी देण्याची हमी दिली. काही महिने अंमलबजावणीही झाली. अलीकडे यामध्ये खंड पडला असून, सध्या आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. दररोज पाणीपुरवठ्यात तांत्रिक अडचणी निर्माण होतात, त्यामुळे पाणीपुरवठ्याचा दिवस, वेळ पुढे ढकलण्यात येते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक पाणीप्रश्नावर मेटाकुटीला आले आहेत.

एखाद्या वसाहतीत एक दिवस उशिराने पाणी आले तर त्या भागातील राजकीय मंडळी, नगरसेवक आंदोलनाचे शस्त्र उपसत असत. आता तर पाणी आले काय गेले काय? कोणालाच काही देणेघेणे राहिलेले नाही. जुलै, ऑगस्ट महिन्यांत जायकवाडी, फारोळा येथे वारंवार तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. दोन आठवडे उलटल्यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. पाचव्या दिवशी ज्या वसाहतींना पाणी मिळायला हवे, ते मिळत नाही. लाईनमन व्यवस्थित उत्तर देत नाहीत. अधिकारी फोन उचलत नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. पाणीप्रश्नाला शहरवासीय कमालीचे वैतागले आहेत.

हा पाहा विस्कळीतपणा१. एकनाथनगर उस्मानपुरा - ७ दिवसांआड२. टीव्ही सेंटर परिसर - ८ दिवसांआड३. सिडको-एन-२ - ६ दिवसांनंतर पाणी४. आरेफ कॉलनी - ७ दिवसांआड५. रशीदपुरा - ६ दिवसांनंतरच७. गणेश कॉलनी - ८व्या दिवशी पाणी८. टिळकनगर, विश्वभारती कॉलनी - ५ दिवसांनंतर९. संजयनगर, भवानीनगर - ८ दिवसांनंतर१०. बायजीपुरा - ८व्या दिवशी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी