शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात आठवड्यातून एकदाच पाणी; त्यातही दिवस, वेळ निश्चित नाही

By मुजीब देवणीकर | Updated: August 22, 2023 19:45 IST

पाच दिवसांआड पाणी देण्याची महापालिकेची घोषणा कागदावरच

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पाणीप्रश्नावर यापूर्वी अनेकदा खंडपीठात चर्चा झाली. महापालिकेने शपथपत्र सादर करून शहराला पाच दिवसांआड पाणी देण्याची हमी दिली. काही महिने अंमलबजावणीही झाली. अलीकडे यामध्ये खंड पडला असून, सध्या आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. दररोज पाणीपुरवठ्यात तांत्रिक अडचणी निर्माण होतात, त्यामुळे पाणीपुरवठ्याचा दिवस, वेळ पुढे ढकलण्यात येते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक पाणीप्रश्नावर मेटाकुटीला आले आहेत.

एखाद्या वसाहतीत एक दिवस उशिराने पाणी आले तर त्या भागातील राजकीय मंडळी, नगरसेवक आंदोलनाचे शस्त्र उपसत असत. आता तर पाणी आले काय गेले काय? कोणालाच काही देणेघेणे राहिलेले नाही. जुलै, ऑगस्ट महिन्यांत जायकवाडी, फारोळा येथे वारंवार तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. दोन आठवडे उलटल्यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. पाचव्या दिवशी ज्या वसाहतींना पाणी मिळायला हवे, ते मिळत नाही. लाईनमन व्यवस्थित उत्तर देत नाहीत. अधिकारी फोन उचलत नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. पाणीप्रश्नाला शहरवासीय कमालीचे वैतागले आहेत.

हा पाहा विस्कळीतपणा१. एकनाथनगर उस्मानपुरा - ७ दिवसांआड२. टीव्ही सेंटर परिसर - ८ दिवसांआड३. सिडको-एन-२ - ६ दिवसांनंतर पाणी४. आरेफ कॉलनी - ७ दिवसांआड५. रशीदपुरा - ६ दिवसांनंतरच७. गणेश कॉलनी - ८व्या दिवशी पाणी८. टिळकनगर, विश्वभारती कॉलनी - ५ दिवसांनंतर९. संजयनगर, भवानीनगर - ८ दिवसांनंतर१०. बायजीपुरा - ८व्या दिवशी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी