शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

‘मधमेश्वर’चे पाणी ‘जायकवाडी’च्या दिशेने झेपावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:12 IST

औरंगाबाद : निळवंडेतून जायकवाडीसाठी येणारे पाणी पुनदगावनंतर अखेर सोमवारी मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले. मधमेश्वर बंधाºयातून ४५९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. विसर्ग अंत्यत कमी असल्याने पाण्याचा प्रवाहदेखील अतिशय संथ असल्याने सायंकाळपर्यंत पाणी जायकवाडीत पोहोचले नव्हते.

औरंगाबाद : निळवंडेतून जायकवाडीसाठी येणारे पाणी पुनदगावनंतर अखेर सोमवारी मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले. मधमेश्वर बंधाºयातून ४५९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. विसर्ग अंत्यत कमी असल्याने पाण्याचा प्रवाहदेखील अतिशय संथ असल्याने सायंकाळपर्यंत पाणी जायकवाडीत पोहोचले नव्हते.

निळवंडेतून पाणी सोडल्यानंतर जवळपास १६ बंधारे पार करून सहाव्या दिवशी मधमेश्वर बंधाºयातून विसर्ग झाला. मधमेश्वरनंतर बंधारा नाही. मधमेश्वर ते जायकवाडी हे अंतर जवळपास १७ कि.मी.चे आहे. निळवंडेतून सहाव्या दिवशीही सोमवारी २ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता, तर ओझर बंधाºयातून १४७६ क्युसेकने विसर्ग कायम होता. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास निळवंडेचे पाणी मधमेश्वर बंधाºयात पोहोचले. याठिकाणी बंधाºयाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले होते.

त्यामुळे येथून नाथसागराकडे पाणी रवाना झाले. दुपारपर्यंत या ठिकाणाहून ३२९ क्युसेकने विसर्ग सुरू होता. सायंकाळी सहा वाजता विसर्गात काही प्रमाणात वाढ झाली. हा विसर्ग ४५९ क्युसेकपर्यंत पोहोचला. मधमेश्वरपासून जायकवाडीचे अंतर कमी असूनही सायंकाळपर्यंत पाणी पोहोचलेले नव्हते. जायकवाडीत मंगळवार सकाळपासून पाणी वाढण्यास सुरुवात होईल, असे लाभक्षेत्र विकास प्राधिक रणाचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले.

दोन हजारांवरून चारशेवर विसर्गनिळवंडेतून सतत सहा दिवसांपासून २ हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे; परंतु मधमेश्वर बंधाºयातून ४५९ क्युसेकने विसर्ग होत आहे. त्यामुळे पाणी वळविल्याने आणि चोरल्याने ही स्थिती झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नाथसागरात अतिशय संथगतीने आवक होणार असल्याने जायकवाडीत पाण्याची कितपत भर पडेल, याविषयी चिंता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पAurangabadऔरंगाबाद