शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

‘मधमेश्वर’चे पाणी ‘जायकवाडी’च्या दिशेने झेपावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:12 IST

औरंगाबाद : निळवंडेतून जायकवाडीसाठी येणारे पाणी पुनदगावनंतर अखेर सोमवारी मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले. मधमेश्वर बंधाºयातून ४५९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. विसर्ग अंत्यत कमी असल्याने पाण्याचा प्रवाहदेखील अतिशय संथ असल्याने सायंकाळपर्यंत पाणी जायकवाडीत पोहोचले नव्हते.

औरंगाबाद : निळवंडेतून जायकवाडीसाठी येणारे पाणी पुनदगावनंतर अखेर सोमवारी मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले. मधमेश्वर बंधाºयातून ४५९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. विसर्ग अंत्यत कमी असल्याने पाण्याचा प्रवाहदेखील अतिशय संथ असल्याने सायंकाळपर्यंत पाणी जायकवाडीत पोहोचले नव्हते.

निळवंडेतून पाणी सोडल्यानंतर जवळपास १६ बंधारे पार करून सहाव्या दिवशी मधमेश्वर बंधाºयातून विसर्ग झाला. मधमेश्वरनंतर बंधारा नाही. मधमेश्वर ते जायकवाडी हे अंतर जवळपास १७ कि.मी.चे आहे. निळवंडेतून सहाव्या दिवशीही सोमवारी २ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता, तर ओझर बंधाºयातून १४७६ क्युसेकने विसर्ग कायम होता. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास निळवंडेचे पाणी मधमेश्वर बंधाºयात पोहोचले. याठिकाणी बंधाºयाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले होते.

त्यामुळे येथून नाथसागराकडे पाणी रवाना झाले. दुपारपर्यंत या ठिकाणाहून ३२९ क्युसेकने विसर्ग सुरू होता. सायंकाळी सहा वाजता विसर्गात काही प्रमाणात वाढ झाली. हा विसर्ग ४५९ क्युसेकपर्यंत पोहोचला. मधमेश्वरपासून जायकवाडीचे अंतर कमी असूनही सायंकाळपर्यंत पाणी पोहोचलेले नव्हते. जायकवाडीत मंगळवार सकाळपासून पाणी वाढण्यास सुरुवात होईल, असे लाभक्षेत्र विकास प्राधिक रणाचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले.

दोन हजारांवरून चारशेवर विसर्गनिळवंडेतून सतत सहा दिवसांपासून २ हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे; परंतु मधमेश्वर बंधाºयातून ४५९ क्युसेकने विसर्ग होत आहे. त्यामुळे पाणी वळविल्याने आणि चोरल्याने ही स्थिती झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नाथसागरात अतिशय संथगतीने आवक होणार असल्याने जायकवाडीत पाण्याची कितपत भर पडेल, याविषयी चिंता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पAurangabadऔरंगाबाद