शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

टँकरमुळे उद्योगांवर पाणी कपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:45 IST

जिल्ह्यात कमी प्रमाणात झालेला पाऊस, आटलेली भूजल पातळी, जोत्याखाली चाललेले जलाशय, यामुळे औरंगाबाद तालुक्यासह पूर्ण जिल्हा पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करीत आहे. टँकरवर ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा अवलंबून असल्यामुळे औद्योगिक वसाहतींतील जलकुंभांवरून टँकरचा भरणा केला जात आहे, परिणामी औद्योगिक वसाहतींचे पाणी ५० टक्क्यांनी कपात झाले आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासन घेणार निर्णय : औद्योगिक वसाहतीतील जलकुंभावर टँकरची गर्दी

औरंगाबाद : जिल्ह्यात कमी प्रमाणात झालेला पाऊस, आटलेली भूजल पातळी, जोत्याखाली चाललेले जलाशय, यामुळे औरंगाबाद तालुक्यासह पूर्ण जिल्हा पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करीत आहे. टँकरवर ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा अवलंबून असल्यामुळे औद्योगिक वसाहतींतील जलकुंभांवरून टँकरचा भरणा केला जात आहे, परिणामी औद्योगिक वसाहतींचे पाणी ५० टक्क्यांनी कपात झाले आहे.एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला वास्तव सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याबाबत काहीही निर्णय अजून तरी झालेला नाही. अनियोजित पाणी कपातीबाबत सोमवारी एमआयडीसीअधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची होणारी बैठक रद्द झाली, आता मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे याप्रकरणी बैठक होणार आहे.एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाकडून समजलेली माहिती अशी, शेंद्रा, वाळूज औद्योगिक वसाहतीतील जलकुंभांवर टँकरचालक पाण्याची लेव्हल येऊ देत नाहीत. शेंद्रा येथील जलकुंभावर सरपंचांपासून सगळ्यांचीच गर्दी असते. जिल्हा प्रशासन एमआयडीसीवर सर्व जबाबदारी टाकून मोकळे झाले आहे. शेंद्रा येथील पाणीपुरवठा क्षमता कमी आहे. याची जाणीव जिल्हा प्रशासनाला करून दिलेली आहे. एमआयडीसीवरील भार कमी केला नाही तर उद्योगांना पाणी असताना त्रास सहन करावा लागेल. टँकरचालक जलकुंभाचा ताबा घेऊन एमआयडीसीच्या २ कर्मचाºयांवर दादागिरी करतात. ११४ टँकरचालक आणि क्लीनरची गर्दी रोजची आहे.एप्रिल महिन्यापर्यंत उद्योगांना त्रासपिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची जिल्हा प्रशासनाची भूमिका योग्य आहे; परंतु त्यासाठी उद्योगांच्या पाण्याचे काय करायचे, याबाबत प्रशासन काहीही सांगत नाही. टँकरभरणा केंद्र वाढवून कसे जमेल. ३.८३ एमएलडी पाणी टँकरसाठी जात आहे. ११४ टँकरच्या २२८ फेºया होतात. २४ हजार लिटरचे १६० टँकर आहेत. शेंद्रा येथे ५ ते ७ एमएलडी पाण्याची क्षमता आहे. अर्धे पाणी टँकरला दिल्यानंतर उद्योगांना किती द्यायचे, जालन्याकडे किती पाठवायचे, असा प्रश्न एमआयडीसी पाणीपुरवठा विभागासमोर आहे. एप्रिल महिन्यापर्यंत काही तालुक्यांसाठी पर्यायी व्यवस्था होईल, तोपर्यंत उद्योगांना त्रास होईल, असे एमआयडीसी सूत्रांनी सांगितले.चारा छावण्यांचा भार एमआयडीसीवरजिल्ह्याला दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून, ५५७ गावे व २२२ वाड्यांवर राहणाºया १२ लाख ५६ हजार नागरिकांना ८०१ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. औरंगाबाद तालुक्यातील ८३, फुलंब्रीतील ३९, पैठण ८६, गंगापूर १२२, वैजापूर ९१, खुलताबाद १९, कन्नड ४१, सिल्लोड ७८, तर सोयगाव तालुक्यातील तीन गावांमध्ये टँकर सुरू आहेत. त्यातच चारा छावण्यांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी एमआयडीसीवर देण्यात आली आहे.फिलिंग स्टेशन वाढवून काय होणारजायकवाडी मृत जलसाठ्याकडे जाण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे एमआयडीसीच्या जॅकवेल, पंपिंगची अडचण येणार आहे. एमआयडीसीच्या पाणी क्षमतेचा विचार जिल्हा प्रशासनाने करणे गरजेचे आहे. धरणातच पाणी कमी झाले तर देणार कुठून, असा प्रश्न आहे. ब्रह्मगव्हाण येथे डब्ल्यूपीटी पंपिंग करून चिकलठाण्यापर्यंत पाणी आणले जाते. ते पंपिंग करून शेंद्र्याकडे पाठविले जाते. १०० कि़मी.चे एमआयडीसीचे नेटवर्क आहे. त्यातून २०० कि़मी.च्या परिसरात पाणीपुरवठा करावा लागतो.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईMIDCएमआयडीसी