शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

टँकरमुळे उद्योगांवर पाणी कपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:45 IST

जिल्ह्यात कमी प्रमाणात झालेला पाऊस, आटलेली भूजल पातळी, जोत्याखाली चाललेले जलाशय, यामुळे औरंगाबाद तालुक्यासह पूर्ण जिल्हा पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करीत आहे. टँकरवर ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा अवलंबून असल्यामुळे औद्योगिक वसाहतींतील जलकुंभांवरून टँकरचा भरणा केला जात आहे, परिणामी औद्योगिक वसाहतींचे पाणी ५० टक्क्यांनी कपात झाले आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासन घेणार निर्णय : औद्योगिक वसाहतीतील जलकुंभावर टँकरची गर्दी

औरंगाबाद : जिल्ह्यात कमी प्रमाणात झालेला पाऊस, आटलेली भूजल पातळी, जोत्याखाली चाललेले जलाशय, यामुळे औरंगाबाद तालुक्यासह पूर्ण जिल्हा पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करीत आहे. टँकरवर ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा अवलंबून असल्यामुळे औद्योगिक वसाहतींतील जलकुंभांवरून टँकरचा भरणा केला जात आहे, परिणामी औद्योगिक वसाहतींचे पाणी ५० टक्क्यांनी कपात झाले आहे.एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला वास्तव सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याबाबत काहीही निर्णय अजून तरी झालेला नाही. अनियोजित पाणी कपातीबाबत सोमवारी एमआयडीसीअधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची होणारी बैठक रद्द झाली, आता मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे याप्रकरणी बैठक होणार आहे.एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाकडून समजलेली माहिती अशी, शेंद्रा, वाळूज औद्योगिक वसाहतीतील जलकुंभांवर टँकरचालक पाण्याची लेव्हल येऊ देत नाहीत. शेंद्रा येथील जलकुंभावर सरपंचांपासून सगळ्यांचीच गर्दी असते. जिल्हा प्रशासन एमआयडीसीवर सर्व जबाबदारी टाकून मोकळे झाले आहे. शेंद्रा येथील पाणीपुरवठा क्षमता कमी आहे. याची जाणीव जिल्हा प्रशासनाला करून दिलेली आहे. एमआयडीसीवरील भार कमी केला नाही तर उद्योगांना पाणी असताना त्रास सहन करावा लागेल. टँकरचालक जलकुंभाचा ताबा घेऊन एमआयडीसीच्या २ कर्मचाºयांवर दादागिरी करतात. ११४ टँकरचालक आणि क्लीनरची गर्दी रोजची आहे.एप्रिल महिन्यापर्यंत उद्योगांना त्रासपिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची जिल्हा प्रशासनाची भूमिका योग्य आहे; परंतु त्यासाठी उद्योगांच्या पाण्याचे काय करायचे, याबाबत प्रशासन काहीही सांगत नाही. टँकरभरणा केंद्र वाढवून कसे जमेल. ३.८३ एमएलडी पाणी टँकरसाठी जात आहे. ११४ टँकरच्या २२८ फेºया होतात. २४ हजार लिटरचे १६० टँकर आहेत. शेंद्रा येथे ५ ते ७ एमएलडी पाण्याची क्षमता आहे. अर्धे पाणी टँकरला दिल्यानंतर उद्योगांना किती द्यायचे, जालन्याकडे किती पाठवायचे, असा प्रश्न एमआयडीसी पाणीपुरवठा विभागासमोर आहे. एप्रिल महिन्यापर्यंत काही तालुक्यांसाठी पर्यायी व्यवस्था होईल, तोपर्यंत उद्योगांना त्रास होईल, असे एमआयडीसी सूत्रांनी सांगितले.चारा छावण्यांचा भार एमआयडीसीवरजिल्ह्याला दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून, ५५७ गावे व २२२ वाड्यांवर राहणाºया १२ लाख ५६ हजार नागरिकांना ८०१ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. औरंगाबाद तालुक्यातील ८३, फुलंब्रीतील ३९, पैठण ८६, गंगापूर १२२, वैजापूर ९१, खुलताबाद १९, कन्नड ४१, सिल्लोड ७८, तर सोयगाव तालुक्यातील तीन गावांमध्ये टँकर सुरू आहेत. त्यातच चारा छावण्यांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी एमआयडीसीवर देण्यात आली आहे.फिलिंग स्टेशन वाढवून काय होणारजायकवाडी मृत जलसाठ्याकडे जाण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे एमआयडीसीच्या जॅकवेल, पंपिंगची अडचण येणार आहे. एमआयडीसीच्या पाणी क्षमतेचा विचार जिल्हा प्रशासनाने करणे गरजेचे आहे. धरणातच पाणी कमी झाले तर देणार कुठून, असा प्रश्न आहे. ब्रह्मगव्हाण येथे डब्ल्यूपीटी पंपिंग करून चिकलठाण्यापर्यंत पाणी आणले जाते. ते पंपिंग करून शेंद्र्याकडे पाठविले जाते. १०० कि़मी.चे एमआयडीसीचे नेटवर्क आहे. त्यातून २०० कि़मी.च्या परिसरात पाणीपुरवठा करावा लागतो.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईMIDCएमआयडीसी