शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

टँकरमुळे उद्योगांवर पाणी कपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:45 IST

जिल्ह्यात कमी प्रमाणात झालेला पाऊस, आटलेली भूजल पातळी, जोत्याखाली चाललेले जलाशय, यामुळे औरंगाबाद तालुक्यासह पूर्ण जिल्हा पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करीत आहे. टँकरवर ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा अवलंबून असल्यामुळे औद्योगिक वसाहतींतील जलकुंभांवरून टँकरचा भरणा केला जात आहे, परिणामी औद्योगिक वसाहतींचे पाणी ५० टक्क्यांनी कपात झाले आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासन घेणार निर्णय : औद्योगिक वसाहतीतील जलकुंभावर टँकरची गर्दी

औरंगाबाद : जिल्ह्यात कमी प्रमाणात झालेला पाऊस, आटलेली भूजल पातळी, जोत्याखाली चाललेले जलाशय, यामुळे औरंगाबाद तालुक्यासह पूर्ण जिल्हा पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करीत आहे. टँकरवर ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा अवलंबून असल्यामुळे औद्योगिक वसाहतींतील जलकुंभांवरून टँकरचा भरणा केला जात आहे, परिणामी औद्योगिक वसाहतींचे पाणी ५० टक्क्यांनी कपात झाले आहे.एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला वास्तव सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याबाबत काहीही निर्णय अजून तरी झालेला नाही. अनियोजित पाणी कपातीबाबत सोमवारी एमआयडीसीअधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची होणारी बैठक रद्द झाली, आता मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे याप्रकरणी बैठक होणार आहे.एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाकडून समजलेली माहिती अशी, शेंद्रा, वाळूज औद्योगिक वसाहतीतील जलकुंभांवर टँकरचालक पाण्याची लेव्हल येऊ देत नाहीत. शेंद्रा येथील जलकुंभावर सरपंचांपासून सगळ्यांचीच गर्दी असते. जिल्हा प्रशासन एमआयडीसीवर सर्व जबाबदारी टाकून मोकळे झाले आहे. शेंद्रा येथील पाणीपुरवठा क्षमता कमी आहे. याची जाणीव जिल्हा प्रशासनाला करून दिलेली आहे. एमआयडीसीवरील भार कमी केला नाही तर उद्योगांना पाणी असताना त्रास सहन करावा लागेल. टँकरचालक जलकुंभाचा ताबा घेऊन एमआयडीसीच्या २ कर्मचाºयांवर दादागिरी करतात. ११४ टँकरचालक आणि क्लीनरची गर्दी रोजची आहे.एप्रिल महिन्यापर्यंत उद्योगांना त्रासपिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची जिल्हा प्रशासनाची भूमिका योग्य आहे; परंतु त्यासाठी उद्योगांच्या पाण्याचे काय करायचे, याबाबत प्रशासन काहीही सांगत नाही. टँकरभरणा केंद्र वाढवून कसे जमेल. ३.८३ एमएलडी पाणी टँकरसाठी जात आहे. ११४ टँकरच्या २२८ फेºया होतात. २४ हजार लिटरचे १६० टँकर आहेत. शेंद्रा येथे ५ ते ७ एमएलडी पाण्याची क्षमता आहे. अर्धे पाणी टँकरला दिल्यानंतर उद्योगांना किती द्यायचे, जालन्याकडे किती पाठवायचे, असा प्रश्न एमआयडीसी पाणीपुरवठा विभागासमोर आहे. एप्रिल महिन्यापर्यंत काही तालुक्यांसाठी पर्यायी व्यवस्था होईल, तोपर्यंत उद्योगांना त्रास होईल, असे एमआयडीसी सूत्रांनी सांगितले.चारा छावण्यांचा भार एमआयडीसीवरजिल्ह्याला दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून, ५५७ गावे व २२२ वाड्यांवर राहणाºया १२ लाख ५६ हजार नागरिकांना ८०१ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. औरंगाबाद तालुक्यातील ८३, फुलंब्रीतील ३९, पैठण ८६, गंगापूर १२२, वैजापूर ९१, खुलताबाद १९, कन्नड ४१, सिल्लोड ७८, तर सोयगाव तालुक्यातील तीन गावांमध्ये टँकर सुरू आहेत. त्यातच चारा छावण्यांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी एमआयडीसीवर देण्यात आली आहे.फिलिंग स्टेशन वाढवून काय होणारजायकवाडी मृत जलसाठ्याकडे जाण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे एमआयडीसीच्या जॅकवेल, पंपिंगची अडचण येणार आहे. एमआयडीसीच्या पाणी क्षमतेचा विचार जिल्हा प्रशासनाने करणे गरजेचे आहे. धरणातच पाणी कमी झाले तर देणार कुठून, असा प्रश्न आहे. ब्रह्मगव्हाण येथे डब्ल्यूपीटी पंपिंग करून चिकलठाण्यापर्यंत पाणी आणले जाते. ते पंपिंग करून शेंद्र्याकडे पाठविले जाते. १०० कि़मी.चे एमआयडीसीचे नेटवर्क आहे. त्यातून २०० कि़मी.च्या परिसरात पाणीपुरवठा करावा लागतो.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईMIDCएमआयडीसी