शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

उद्योगांवरील पाणीकपात तूर्तास टळली हाच दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 15:24 IST

. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यामुळे औरंगाबाद शहर व इतर औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांवर पाणीकपातीचे संकट घोंगावत होते.

ठळक मुद्दे जायकवाडी जलाशयात ३१.५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या काहीही निर्णय होणार नसल्याचे उद्योजकांना सांगितल्यामुळे तूर्तास पाणीकपात टळली आहे. 

औरंगाबाद : जायकवाडी जलाशयात ३१.५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यामुळे औरंगाबाद शहर व इतर औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांवर पाणीकपातीचे संकट घोंगावत होते. उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याशी गेल्या आठवड्यात औपचारिक चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या काहीही निर्णय होणार नसल्याचे उद्योजकांना सांगितल्यामुळे तूर्तास पाणीकपात टळली आहे. 

२०१५ साली उद्योगांचे १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग यांनी घेतला होता. ती कपात जून २०१६ पर्यंत कायम होती. यंदा कमी पाऊस झाल्यामुळे जायकवाडीतील पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. जून २०१९ पर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे ही तारेवरची कसरत असणार आहे. त्यामुळे जूनअखेरपर्यंत पाणीपुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन नियोजन करीत आहे. जायकवाडी धरणातून अंदाजे लहान-मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. 

शिवाय दोन लाख शेतकरीदेखील अवलंबून आहेत. औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतील गावे, औद्योगिक वसाहतींसाठी पाणी आरक्षित आहे. शहराला रोज १५० ते १६० एमएलडी पाणीपुरवठा होतो आहे, तर उद्योगांना ५२ एमएलडी पाणी उपसा होतो. औरंगाबादला रोज २ द.ल.घ.मी पाणी लागते. 

उद्योग संघटनेचे मत असेमसिआ या उद्योजक संघटनेचे अध्यक्ष किशोर राठी म्हणाले, सध्या उद्योगांना पाणीपुरवठा बऱ्यापैकी होतो आहे. शनिवारी अडचण येते, त्यामुळे टँकरने पाणी मागवावे लागते. शुक्रवारी वीज वितरण कंपनीचे शटडाऊन होते, त्यामुळे शनिवारी एमआयडीसीचे जलकुंभ भरत नाहीत. रविवारी सुरळीत पाणीपुरवठा केला जातो. उद्योगांची पाणीकपात होण्यासारखी परिस्थिती सध्या तरी नाही, त्यामुळे प्रशासन याबाबत सध्या काही निर्णय घेणार नाही, अशी माहिती उद्योगवर्तुळात आहे. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीMASSIA marathwada small scale industries associationमराठवाडा लघु उद्योग संघटना (मसिआ)