शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

छत्रपती संभाजीनगरवर जलसंकट; तब्बल १२ तास जायकवाडीतून पाणीपुरवठा होता बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 18:39 IST

उन्हाळा सुरू झाल्यापासून शहराच्या पाणीपुरवठ्यात वारंवार जलवाहिनी फुटण्यासह तांत्रिक बिघाड निर्माण होत आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविणाऱ्या १२०० मिमीच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह सोमवारी रात्री ८:३० वाजता ट्रकचा धक्का लागल्याने लिकेज झाला. प्रशासनाने तत्काळ मध्यरात्री ११ वाजेपासून दुरुस्तीचे काम हाती घेऊन मंगळवारी सकाळी ११ वाजता काम पूर्ण केले. यासाठी तब्बल १२ तास शहराचा पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे शहरात जलसंकट निर्माण झाले.

उन्हाळा सुरू झाल्यापासून शहराच्या पाणीपुरवठ्यात वारंवार जलवाहिनी फुटण्यासह तांत्रिक बिघाड निर्माण होत आहे. चार दिवसांपासून नवीन ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी बंद आहे. त्यामुळे दररोज किमान २० एमएलडी पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच सोमवारी रात्री ८:३० वाजता फारोळा येथे नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या जीव्हीपीआर कंपनीच्या सिमेंट मिक्सरने मनपाच्या १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्हला जोरदार धडक दिली. त्यामुळे व्हॉल्व्हमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली. पाणी शेजारील एका कंपनीत शिरल्याने एक प्लांट बंद झाला. परिस्थिती लक्षात घेऊन मनपाने त्वरित जायकवाडी येथून पाण्याचा उपसा बंद केला. उपअभियंता किरण धांडे, बाविस्कर यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. १२ तासांनंतर जायकवाडी येथील पहिला उपसा पंप सुरू केला. त्यानंतर शहरात पाणी येण्यासाठी सायंकाळ झाली. शहरातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक अगोदरच कोलमडलेले असताना पुन्हा एक दिवस उशिराने शहराला पाणीपुरवठा होणार आहे.

पाणीपुरवठ्यावर परिणामएअर व्हॉल्व्हच्या कामामुळे शहराची मुख्य जलवाहिनी १२ तास बंद ठेवावी लागली. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून, ज्या वसाहतींना आठ दिवसांपूर्वी पाणी मिळाले होते, त्या वसाहतींना पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.-के. एम. फालक, कार्यकारी अभियंता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका