शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांवर जल संकट; पाणीपट्टी थकल्याने २७ डिसेंबरपासून जायकवाडीहून पाणी होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 19:22 IST

पाटबंधारे विभागाने पालिकेला २०१५ पासून १७ नोटिसा पाठवून पाणीपट्टी भरण्यास सांगितले.

ठळक मुद्देमनपावर नामुष्कीचे संकट पाणीपट्टी थकल्याने पाटबंधारे विभागाने बजावली अंतिम नोटीस

औरंगाबाद : आर्थिक संकटात सापडलेल्या मनपावर आणखी एक नामुष्की ओढावली आहे. जायकवाडी धरणातून दररोज उपसा करण्यात येणाऱ्या पाण्याचे बिल तब्बल १० कोटींहून अधिक थकले आहे. तब्बल १७ नोटिसा पाठविल्यानंतरही महापालिकेने पाणीपट्टी भरण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने महापालिकेला अंतिम नोटीस पाठवून २७ डिसेंबरपासून चक्क पाणीपुरवठाच बंद करण्याचा इशारा दिला आहे.

जायकवाडी धरणातून महापालिकेने शहरासाठी वार्षिक ११३.२८ दलघमी एवढे पाणी आरक्षित केले आहे. रोज १५० एमएलडी पाणी मनपा धरणातून घेत आहे. मनपा प्रशासन जेवढे पाणी धरणातून घेत आहे, त्याची पाणीपट्टीही पाटबंधारे विभागाला भरणे आवश्यक आहे. महिन्याला सुमारे १८ ते २० लाख रुपये जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून आकारले जाते. दरमहा ही रक्कम पाटबंधारे विभागाकडे भरणे अभिप्रेत आहे. मात्र, मागील पाच वर्षांपासून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यासंबंधीची संचिका लेखा विभागाकडे पाठविली आहे. अद्यापही लेखा विभागाकडून ही रक्कम अदा केली नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.

दरम्यान, पाटबंधारे विभागाने पालिकेला २०१५ पासून १७ नोटिसा पाठवून पाणीपट्टी भरण्यास सांगितले. महापालिकेने नेहमी या नोटिसीला केराची टोपली दाखविली. परिणामी, नोव्हेंबर २०१८ पर्यंत १० कोटी ६८ लाख ६० हजार रुपये पाणीपट्टीपोटी भरावे, अशी नोटीस पाटबंधारे विभागाने बजावली आहे. पाणीपट्टी तात्काळ अदा न केल्यास २७ डिसेंबरपासून पाणी कपात करण्यास सुरुवात केली जाईल. ३१ डिसेंबरला पूर्ण पाणी उपसाच बंद करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये बजावले आहे. पाण्याचा उपसा बंद केल्यानंतर शहरवासीयांची जी गैरसोय होणार आहे, त्यास पूर्णत: पालिका जबाबदार राहील, असेही बजावले आहे. पाणीपुरवठा बंद करण्याची नोटीस प्राप्त झाल्यानंतरही मनपा कुंभकर्णी झोपेत आहे. मागील दोन महिन्यांपासून कंत्राटदारांना एक छदामही अदा करण्यात आलेला नाही. तिजोरीत ३० ते ३५ कोटी रुपये पडून आहेत. शहराचे पाणी बंद होऊ नये म्हणून पाणीपट्टी भरण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही, हे विशेष.

२४ तास मनपाकडून उपसाशहरातील १६ लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी महापालिका जायकवाडी येथून ७०० आणि १४०० मि. मी. व्यासाच्या दोन जलवाहिन्यांद्वारे २४ तास पाण्याचा उपसा करीत आहे. पाणीपुरवठ्याच्या दोन्ही योजनांसाठी सहा पंप २४ तास चालवावे लागतात. 

पाणी कपातीचा कार्यक्रम२७ डिसेंबर - जायकवाडीत पाण्याचा उपसा दोन तास बंद केला जाईल.२८ डिसेंबर - चार तासांसाठी उपसा बंद केला जाणार आहे.२९ डिसेंबर -सहा तास उपसा बंद राहील.३० डिसेंबर - आठ तास पाण्याचा उपसा बंद राहील.३१ डिसेंबर - पाणी उपसा पूर्णत: बंद केला जाईल. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी