शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

औरंगाबादकरांवर जल संकट; पाणीपट्टी थकल्याने २७ डिसेंबरपासून जायकवाडीहून पाणी होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 19:22 IST

पाटबंधारे विभागाने पालिकेला २०१५ पासून १७ नोटिसा पाठवून पाणीपट्टी भरण्यास सांगितले.

ठळक मुद्देमनपावर नामुष्कीचे संकट पाणीपट्टी थकल्याने पाटबंधारे विभागाने बजावली अंतिम नोटीस

औरंगाबाद : आर्थिक संकटात सापडलेल्या मनपावर आणखी एक नामुष्की ओढावली आहे. जायकवाडी धरणातून दररोज उपसा करण्यात येणाऱ्या पाण्याचे बिल तब्बल १० कोटींहून अधिक थकले आहे. तब्बल १७ नोटिसा पाठविल्यानंतरही महापालिकेने पाणीपट्टी भरण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने महापालिकेला अंतिम नोटीस पाठवून २७ डिसेंबरपासून चक्क पाणीपुरवठाच बंद करण्याचा इशारा दिला आहे.

जायकवाडी धरणातून महापालिकेने शहरासाठी वार्षिक ११३.२८ दलघमी एवढे पाणी आरक्षित केले आहे. रोज १५० एमएलडी पाणी मनपा धरणातून घेत आहे. मनपा प्रशासन जेवढे पाणी धरणातून घेत आहे, त्याची पाणीपट्टीही पाटबंधारे विभागाला भरणे आवश्यक आहे. महिन्याला सुमारे १८ ते २० लाख रुपये जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून आकारले जाते. दरमहा ही रक्कम पाटबंधारे विभागाकडे भरणे अभिप्रेत आहे. मात्र, मागील पाच वर्षांपासून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यासंबंधीची संचिका लेखा विभागाकडे पाठविली आहे. अद्यापही लेखा विभागाकडून ही रक्कम अदा केली नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.

दरम्यान, पाटबंधारे विभागाने पालिकेला २०१५ पासून १७ नोटिसा पाठवून पाणीपट्टी भरण्यास सांगितले. महापालिकेने नेहमी या नोटिसीला केराची टोपली दाखविली. परिणामी, नोव्हेंबर २०१८ पर्यंत १० कोटी ६८ लाख ६० हजार रुपये पाणीपट्टीपोटी भरावे, अशी नोटीस पाटबंधारे विभागाने बजावली आहे. पाणीपट्टी तात्काळ अदा न केल्यास २७ डिसेंबरपासून पाणी कपात करण्यास सुरुवात केली जाईल. ३१ डिसेंबरला पूर्ण पाणी उपसाच बंद करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये बजावले आहे. पाण्याचा उपसा बंद केल्यानंतर शहरवासीयांची जी गैरसोय होणार आहे, त्यास पूर्णत: पालिका जबाबदार राहील, असेही बजावले आहे. पाणीपुरवठा बंद करण्याची नोटीस प्राप्त झाल्यानंतरही मनपा कुंभकर्णी झोपेत आहे. मागील दोन महिन्यांपासून कंत्राटदारांना एक छदामही अदा करण्यात आलेला नाही. तिजोरीत ३० ते ३५ कोटी रुपये पडून आहेत. शहराचे पाणी बंद होऊ नये म्हणून पाणीपट्टी भरण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही, हे विशेष.

२४ तास मनपाकडून उपसाशहरातील १६ लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी महापालिका जायकवाडी येथून ७०० आणि १४०० मि. मी. व्यासाच्या दोन जलवाहिन्यांद्वारे २४ तास पाण्याचा उपसा करीत आहे. पाणीपुरवठ्याच्या दोन्ही योजनांसाठी सहा पंप २४ तास चालवावे लागतात. 

पाणी कपातीचा कार्यक्रम२७ डिसेंबर - जायकवाडीत पाण्याचा उपसा दोन तास बंद केला जाईल.२८ डिसेंबर - चार तासांसाठी उपसा बंद केला जाणार आहे.२९ डिसेंबर -सहा तास उपसा बंद राहील.३० डिसेंबर - आठ तास पाण्याचा उपसा बंद राहील.३१ डिसेंबर - पाणी उपसा पूर्णत: बंद केला जाईल. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी