शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

औरंगाबादकरांवर जल संकट; पाणीपट्टी थकल्याने २७ डिसेंबरपासून जायकवाडीहून पाणी होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 19:22 IST

पाटबंधारे विभागाने पालिकेला २०१५ पासून १७ नोटिसा पाठवून पाणीपट्टी भरण्यास सांगितले.

ठळक मुद्देमनपावर नामुष्कीचे संकट पाणीपट्टी थकल्याने पाटबंधारे विभागाने बजावली अंतिम नोटीस

औरंगाबाद : आर्थिक संकटात सापडलेल्या मनपावर आणखी एक नामुष्की ओढावली आहे. जायकवाडी धरणातून दररोज उपसा करण्यात येणाऱ्या पाण्याचे बिल तब्बल १० कोटींहून अधिक थकले आहे. तब्बल १७ नोटिसा पाठविल्यानंतरही महापालिकेने पाणीपट्टी भरण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने महापालिकेला अंतिम नोटीस पाठवून २७ डिसेंबरपासून चक्क पाणीपुरवठाच बंद करण्याचा इशारा दिला आहे.

जायकवाडी धरणातून महापालिकेने शहरासाठी वार्षिक ११३.२८ दलघमी एवढे पाणी आरक्षित केले आहे. रोज १५० एमएलडी पाणी मनपा धरणातून घेत आहे. मनपा प्रशासन जेवढे पाणी धरणातून घेत आहे, त्याची पाणीपट्टीही पाटबंधारे विभागाला भरणे आवश्यक आहे. महिन्याला सुमारे १८ ते २० लाख रुपये जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून आकारले जाते. दरमहा ही रक्कम पाटबंधारे विभागाकडे भरणे अभिप्रेत आहे. मात्र, मागील पाच वर्षांपासून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यासंबंधीची संचिका लेखा विभागाकडे पाठविली आहे. अद्यापही लेखा विभागाकडून ही रक्कम अदा केली नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.

दरम्यान, पाटबंधारे विभागाने पालिकेला २०१५ पासून १७ नोटिसा पाठवून पाणीपट्टी भरण्यास सांगितले. महापालिकेने नेहमी या नोटिसीला केराची टोपली दाखविली. परिणामी, नोव्हेंबर २०१८ पर्यंत १० कोटी ६८ लाख ६० हजार रुपये पाणीपट्टीपोटी भरावे, अशी नोटीस पाटबंधारे विभागाने बजावली आहे. पाणीपट्टी तात्काळ अदा न केल्यास २७ डिसेंबरपासून पाणी कपात करण्यास सुरुवात केली जाईल. ३१ डिसेंबरला पूर्ण पाणी उपसाच बंद करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये बजावले आहे. पाण्याचा उपसा बंद केल्यानंतर शहरवासीयांची जी गैरसोय होणार आहे, त्यास पूर्णत: पालिका जबाबदार राहील, असेही बजावले आहे. पाणीपुरवठा बंद करण्याची नोटीस प्राप्त झाल्यानंतरही मनपा कुंभकर्णी झोपेत आहे. मागील दोन महिन्यांपासून कंत्राटदारांना एक छदामही अदा करण्यात आलेला नाही. तिजोरीत ३० ते ३५ कोटी रुपये पडून आहेत. शहराचे पाणी बंद होऊ नये म्हणून पाणीपट्टी भरण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही, हे विशेष.

२४ तास मनपाकडून उपसाशहरातील १६ लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी महापालिका जायकवाडी येथून ७०० आणि १४०० मि. मी. व्यासाच्या दोन जलवाहिन्यांद्वारे २४ तास पाण्याचा उपसा करीत आहे. पाणीपुरवठ्याच्या दोन्ही योजनांसाठी सहा पंप २४ तास चालवावे लागतात. 

पाणी कपातीचा कार्यक्रम२७ डिसेंबर - जायकवाडीत पाण्याचा उपसा दोन तास बंद केला जाईल.२८ डिसेंबर - चार तासांसाठी उपसा बंद केला जाणार आहे.२९ डिसेंबर -सहा तास उपसा बंद राहील.३० डिसेंबर - आठ तास पाण्याचा उपसा बंद राहील.३१ डिसेंबर - पाणी उपसा पूर्णत: बंद केला जाईल. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी