शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहतींवर दोन दिवस जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:56 IST

शेंद्रा, चिकलठाणा, औरंगाबाद, जालना औद्योगिक वसाहतीला १ जून रोजी पाणीपुरवठा होणार नाही, तर २ जून रोजी दुपारनंतर कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेंद्रा, चिकलठाणा, औरंगाबाद, जालना औद्योगिक वसाहतीला १ जून रोजी पाणीपुरवठा होणार नाही, तर २ जून रोजी दुपारनंतर कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. सलग दोन दिवस औद्योगिक वसाहतींवर जलसंकटाचा फेरा राहणार आहे. एकतर पंधरा दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यातच एमआयडीसीने ७०० मि.मी.च्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे ठरविल्यामुळे औद्योगिक वसाहतींना पाणीटंचाई भासत आहे.एमआयडीसी चिकलठाणा, शेंद्रा, वाळूज ईएसआर, पैठण येथील जलकुंभावर टँकरने पाणीपुरवठा केला जातो आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागला असून, २१ मेपासून उद्योजक संघटना एमआयडीसीसोबत बैठका घेऊन तोडगा काढण्याची मागणी करीत आहे. ६ एमएलडी पाणीपुरवठा करण्याचा भार एमआयडीसीवर पडल्यामुळे पाणीपुरवठा विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. २०० हून अधिक टँकर एमआयडीसीच्या जलकुंभावरून भरले जात आहेत. पूर्ण क्षमतेने पाणी उपसा १००० मि. मी. व्यासाची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने ७२ एमएलडी पाण्याचा उपसा सध्या करते आहे.एमआयडीसीने कळविले आहे की, महामंडळाच्या ७०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीची देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे औरंगाबाद, चिकलठाणा, शेंद्रा व जालना औद्योगिक क्षेत्रास होणारा पाणीपुरवठा १ जून रोजी बंद राहील. तसेच २ जून रोजी ३ वाजेनंतर कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे कार्यकारी अभियंता रवींद्र कुलकर्णी यांनी कळविले आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपात