शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

वाळूज दंगलीचे खटले जलदगती न्यायालयात चालविणार : मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 18:04 IST

दंगलखोरांना लवकरात लवकर शासन व्हावे, यासाठी या दंगलीचे खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

औरंगाबाद : ९ आॅगस्ट रोजी वाळूज औद्योगिक वसाहतीत झालेल्या दंगलीतील अनेक आरोपी अजूनही जेलमध्ये आहेत. दंगलखोरांना लवकरात लवकर शासन व्हावे, यासाठी या दंगलीचे खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. शहरात झालेल्या विविध दंगलीची चौकशीचे काय झाले, या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात फडणवीस यांनी औरंगाबाद ग्रामीण आणि शहर पोलीस दलातील अधिकाऱ्यांसोबत गुन्हे आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, सर्व पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलीस उपाधीक्षक आणि शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

गुन्हे आढावा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दोषसिद्धीचे प्रमाण, गुन्हे उघडीस येण्याचे प्रमाण आणि महिलाविषयक गुन्हे का वाढत आहेत, या प्रमुख मुद्यांवर आढावा घेण्यात आला. यात औरंगाबाद ग्रामीण पोलीस राज्यातील पहिल्या चारमध्ये आहेत. शहर पोलिसांची कामगिरी चांगली आहे. मात्र, त्यात अधिक चांगले काम होऊ शकते. 

मोबाईल आणि दुचाकी चोऱ्यांचा तपास गांभीर्याने करामोबाईल, दुचाकी चोरी तक्रारदारांसाठी महत्त्वाचा विषय असतो. यामुळे अशा गुन्ह्यांचा तपास गांभीर्याने करून तक्रारदारांना त्यांचा मुद्देमाल परत कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करा. चोरट्यांना शोधून काढले पाहिजे आणि तक्रारदाराला त्याचा माल परत केला पाहिजे. फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने तपास गुणात्मक कसा होईल, यावर तपास अधिकाऱ्यांनी जोर देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीWaluj MIDCवाळूज एमआयडीसीMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदCourtन्यायालयPoliceपोलिस