शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वाळूज दंगलीचे खटले जलदगती न्यायालयात चालविणार : मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 18:04 IST

दंगलखोरांना लवकरात लवकर शासन व्हावे, यासाठी या दंगलीचे खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

औरंगाबाद : ९ आॅगस्ट रोजी वाळूज औद्योगिक वसाहतीत झालेल्या दंगलीतील अनेक आरोपी अजूनही जेलमध्ये आहेत. दंगलखोरांना लवकरात लवकर शासन व्हावे, यासाठी या दंगलीचे खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. शहरात झालेल्या विविध दंगलीची चौकशीचे काय झाले, या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात फडणवीस यांनी औरंगाबाद ग्रामीण आणि शहर पोलीस दलातील अधिकाऱ्यांसोबत गुन्हे आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, सर्व पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलीस उपाधीक्षक आणि शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

गुन्हे आढावा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दोषसिद्धीचे प्रमाण, गुन्हे उघडीस येण्याचे प्रमाण आणि महिलाविषयक गुन्हे का वाढत आहेत, या प्रमुख मुद्यांवर आढावा घेण्यात आला. यात औरंगाबाद ग्रामीण पोलीस राज्यातील पहिल्या चारमध्ये आहेत. शहर पोलिसांची कामगिरी चांगली आहे. मात्र, त्यात अधिक चांगले काम होऊ शकते. 

मोबाईल आणि दुचाकी चोऱ्यांचा तपास गांभीर्याने करामोबाईल, दुचाकी चोरी तक्रारदारांसाठी महत्त्वाचा विषय असतो. यामुळे अशा गुन्ह्यांचा तपास गांभीर्याने करून तक्रारदारांना त्यांचा मुद्देमाल परत कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करा. चोरट्यांना शोधून काढले पाहिजे आणि तक्रारदाराला त्याचा माल परत केला पाहिजे. फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने तपास गुणात्मक कसा होईल, यावर तपास अधिकाऱ्यांनी जोर देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीWaluj MIDCवाळूज एमआयडीसीMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदCourtन्यायालयPoliceपोलिस