शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
5
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
6
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
7
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
8
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
9
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
10
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
11
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
12
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
13
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
14
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
15
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
16
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
17
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
18
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
19
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
20
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

'त्याच्या' अंतिम प्रवासाने तोडल्या धर्माच्या भिंती; माणुसकीची ओल अजून आटली नाही हीच जग रीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 16:55 IST

या बंगाली कारागिराने आधार कार्ड काढले नाही. घरीच निधन झाल्याने हॉस्पिटलमधील कागदपत्र नव्हते. यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी दिली जात नव्हती. 

ठळक मुद्देएकतेचे दर्शन : बंगाली सुवर्ण कारागिराच्या मुलाचे शहरात निधन बंगाली कारागीर दुलाल घोडाई यांचा मुलगा सुभोह याच्या पार्थिवाला मुस्लीम बांधवांनी खांदा दिला.

औरंगाबाद : देशात हिंदू विरुद्ध मुस्लीम अशा पेटवलेल्या राजकारणातून दुरावलेली मने आणि त्यात कोरोनाने भरलेल्या दहशतीमुळे सर्वच माणसं एकमेकांपासून अंतर राखत आहेत. औरंगाबादमध्ये मात्र, धर्माधर्मात उभारलेल्या भिंती पाडून माणसं माणसांच्या मदतीला धावत आहेत. एका बंगाली हिंदू कारागिराच्या अपंग मुलाचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्यांच्या मदतीला कुणीच नसल्याचे पाहून तिरडीला खांदा देण्यास काही मुस्लिम बांधव पुढे आले. त्यांनी हिंदू रीतीरिवाजानुसार त्याच्यावर संस्कार केले.

बंगाली सुवर्ण कारागीर दुलाल घोडाई हे मागील २५ वर्षांपासून सराफा रोडवर फ्लॅटमध्ये राहतात. त्यांना दोन मुलं असून त्यातील एक सुभोह घोडाई हा १५ वर्षाचा दिव्यांग मुलगा. मागील काही वर्षांपासून तो आजाराने पलंगावरच पडून होता. त्याचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्याचा मृत्यू कोविडने झाला असावा या भीतीने परिसरातील व्यक्ती मदतीला आले नाहीत. मात्र, त्यांचे दोन - तीन नातलग आले. या बंगाली कारागिराने आधार कार्ड काढले नाही. घरीच निधन झाल्याने हॉस्पिटलमधील कागदपत्र नव्हते. यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी दिली जात नव्हती. 

ही माहिती दुलाल घोडाई यांचे मित्र नूर इस्लाम शेख यांना कळली. ते सुद्धा मूळचे कोलकाता येथीलच. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते आलीम बेग यांना सोबत घेऊन घोडाई यांचे घर गाठले व त्यांना धीर दिला. सिटी चौक पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. मनपात जाऊन अंत्यसंस्काराची परवानगी आणली. दुपारी स्वर्गरथ आणला. हिंदू रीतीरिवाज पाळून पार्थिवाला अंघोळ घातली. तिरडी बांधली. घोडाई यांच्या नातेवाईकांसोबत पाच ते सहा मुस्लीम बांधवांनी तिरडीला खांदा दिला. अंत्ययात्रा कैलासनगर स्मशानभूमीत आणून पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दुलाल घोडाई यांनी अभिमानाने सांगितले की, नूर इस्लाम शेख, आलीम बेग हे माझे मित्रच नसून भाऊ आहेत. हे वाक्य ऐकून सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

दरी कमी करण्याचा प्रयत्नऔरंगाबादमध्ये मध्यंतरी झालेल्या दंगलीमुळे शहराचे नाव बदनाम झाले होते. काळ पुढे चालला तसे शहरात हिंदू- मुस्लीम यांच्यातील दरी कमी करण्याचे प्रयत्न होत आहे. हिंदुंच्या अंत्यसंस्काराला मुस्लीम बांधव व मुस्लीम बांधवांच्या दफन विधीला हिंदू बांधव जात आहेत व एकमेकांना धीर देत आहेत.- आलीम बेग, सामाजिक कार्यकर्ते

कोरोना काळात मानवतेचे दर्शनराजकारणी कितीही प्रयत्न करो पण शहरातीलच नव्हे तर देशातील एकात्मता, अखंडता, सर्वधर्मसमभाव यास तोडू शकणार नाही. मानवता धर्मच कोरोना काळात एकमेकांच्या सुखदुःखात कामी येत आहे.- नूर इस्लाम खान

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूcultureसांस्कृतिक