शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

शेतकऱ्यांना मॉडर्न मार्केटची प्रतीक्षा

By admin | Updated: November 29, 2014 00:31 IST

औरंगाबाद : मॉडर्न मार्केट उभारण्यासाठी कृषी पणन मंडळाने कृ.उ.बा. समितीची जाधववाडी येथील ५० एकर जमीन संपादन केली होती.

औरंगाबाद : मॉडर्न मार्केट उभारण्यासाठी कृषी पणन मंडळाने कृ.उ.बा. समितीची जाधववाडी येथील ५० एकर जमीन संपादन केली होती. मात्र, ५ वर्षे झाली तरी अजूनही येथे कंपाऊंड वॉल बांधण्याशिवाय दुसरे काम झाले नाही. एकीकडे किराणा मार्केट, फूल बाजार, कडबा व गुरांचा बाजार सुरूकरण्यासाठी बाजार समितीकडे जागा नाही. दुसरीकडे ५० एकर जमीन पडीत असून वेळेवर मॉडर्न मार्केटची उभारणी सुरू न झाल्याने येथील विकास खुंटला आहे. आज मॉडर्न मार्केट सुरू झाले असते, तर दुष्काळातही शेतकऱ्यांच्या शेतीमालास चांगला भाव मिळाला असता. कृषी उत्पन्न बाजार समितीने स्टेट बँक आॅफ इंडियामधून घेतलेल्या कर्जाची रक्कम थकल्याने बँकेने डीआरटी न्यायालयात धाव घेतली व न्यायालयाने बाजार समितीची गट क्र. ०१, ०२ (जाधववाडी) व हर्सूल येथील १३५ व १३७ मधील एकूण १५.१५ हेक्टर जागेचा लिलाव करण्याचे आदेश दिले. मात्र, राज्य कृषी पणन मंडळाने १४ कोटी ३३ लाख रुपये बाजार समितीच्या वतीने न्यायालयात भरले आणि बाजार समितीची जागा वाचविली. या बदल्यात बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाने जाधववाडीतील १५.१५ हेक्टर जमीन देण्याचा निर्णय ७ जून २०१० रोजी घेतला. या जागेची किंमत २५ कोटी ७५ लाख ५० हजार रुपये ठरविण्यात आली. उर्वरित रक्कम पणन मंडळाने द्यावी, असा संचालक मंडळाने ठराव पास केला. सुरुवातीला कृषी पणन मंडळाने जाधववाडीत प्रथम टर्मिनल मार्केट बनविण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ५० एकर जागा बाजार समितीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कृ.उ.बा.कडे केली होती. बाजाराचा विकास होणार असल्याने कृ.उ.बा.ने उर्वरित जागा पणन मंडळाला दिली. कृषी पणन मंडळाने जाधववाडीत मॉडर्न मार्केट उभारण्याची घोषणा केली. यानंतर पणन मंडळाचे सरव्यवस्थापक मिलिंद आकरे व शिष्टमंडळाने २ डिसेंबर २०१२ रोजी बाजार समितीला भेट दिली होती. येथील जागेची पाहणी करून मॉडर्न मार्केटचा खाजगी कंपनीकडून आराखडा तयार करून घेण्यात येणार होता. मात्र, अजूनही मॉडर्न मार्केटच्या उभारणीसाठी कोणतीच हालचाल कृषी पणन मंडळाने केली नाही.