शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

'अतिवृष्टीग्रस्तांना भरपाईची प्रतीक्षाच'; प्रशासन आणि जिल्हा बँकेच्या विसंगत भूमिकेचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 19:45 IST

जिल्हा बँकेच्या संचालकांनी आम्हाला धनादेशाद्वारे रक्कम न देता खात्यावर थेट आरटीजीएस करा ही भुमीका घेऊन धनादेश न स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

- श्रीकांत पोफळेकरमाड (औरंगाबाद ) : खरिप हंगामाची सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्ठीची नुकसान भरपाई खात्यावर जमा होण्याची शेतकरी दिवाळीच्या पूर्वीपासून प्रतीक्षेत आहे. जिल्हा बँक व जिल्हा प्रशासन यांच्या आपसातील विसंगत भूमिकेमुळे औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळायला उशीर होत असल्याचे चित्र आहे. यामुळे औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार. 

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात आले होते. त्यानुसार औरंगाबाद तहसील मार्फत जिल्हा बँकेला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी व धनादेश देखील देण्यात आले होते. मात्र जिल्हा बँकेच्या संचालकांनी आम्हाला धनादेशाद्वारे रक्कम न देता खात्यावर थेट आरटीजीएस करा ही भुमीका घेऊन धनादेश न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे धनादेश पुन्हा तहसील कार्यालयात पाठवण्यात आले. कारण सोयगाव व फुलंब्री तालुक्याला पैसे आरटीजीएस द्वारे दिल्या गेले. तहसीलदार ज्योती पवार यांनी जिल्हाधिकारी यांना धनादेश परत मिळाल्यासंदर्भात कल्पना दिली. त्याची जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेत. बैठकीमध्ये जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक आर.आर. शिंदे यांना हे धनादेश स्वीकारून मदत तात्काळ पोहोचविण्यास संदर्भात पावले उचलण्याचे आदेश दिले. त्यानंतर तहसीलमार्फत पुन्हा हे धनादेश व त्यासोबत शेतकऱ्यांची यादी जिल्हा बँकेला पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली. या सर्व प्रक्रियेमुळे व जिल्हा बँक व जिल्हा प्रशासन यांच्या विसंगत भूमिकेमुळे औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी तर सोडा दिवाळीनंतर जवळपास आठवडा उलटत आला तरी देखील मिळालेली नसल्याने बळीराजा हवालदिलं झाला आहे.

लवकर मदत देण्यासाठी 'आरटीजीएस'चा आग्रहतहसीलमार्फत आम्हाला एसबीआयचा धनादेश दिला हा धनादेश वटण्यासाठी किमान चार दिवस लागणार होते. शेतकऱ्यांना मोबदला दिवाळीपूर्वी देण्याची आम्ही संपूर्ण तयारी केली होती. जर जिल्हा बँकेने आरटीजीएसद्वारे पैसे दिले असते तर आम्हाला शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी पैसे जमा करता आले असते. याच भूमिकेतून आम्ही धनादेश परत करून आरटीजीएसचा असा आग्रह केला. सोयगाव व फुलंब्री तालुक्याला यांनी आरटीजीएस द्वारे पैसे पाठवलेले आहेत.- जावेद पटेल , संचालक, जिल्हा बँक

धनादेश आणि याद्या दिल्या नुकसान भरपाईचा मोबदला देण्यासाठी आम्ही ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची यादी व धनादेश यापूर्वीही देत आलो. त्याच पद्धतीने आम्ही जिल्हा बँकेत धनादेश व याद्या पाठवल्या होत्या. मात्र जिल्हा बँकेने या याद्या व धनादेश परत केल्या. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर पुन्हा या याद्या व धनादेश जिल्हा बँकेने स्वीकारण्याचा निर्णय घेतला.- जोती पवार,​ तहसीलदार, औरंगाबाद

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद