शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

'अतिवृष्टीग्रस्तांना भरपाईची प्रतीक्षाच'; प्रशासन आणि जिल्हा बँकेच्या विसंगत भूमिकेचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 19:45 IST

जिल्हा बँकेच्या संचालकांनी आम्हाला धनादेशाद्वारे रक्कम न देता खात्यावर थेट आरटीजीएस करा ही भुमीका घेऊन धनादेश न स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

- श्रीकांत पोफळेकरमाड (औरंगाबाद ) : खरिप हंगामाची सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्ठीची नुकसान भरपाई खात्यावर जमा होण्याची शेतकरी दिवाळीच्या पूर्वीपासून प्रतीक्षेत आहे. जिल्हा बँक व जिल्हा प्रशासन यांच्या आपसातील विसंगत भूमिकेमुळे औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळायला उशीर होत असल्याचे चित्र आहे. यामुळे औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार. 

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात आले होते. त्यानुसार औरंगाबाद तहसील मार्फत जिल्हा बँकेला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी व धनादेश देखील देण्यात आले होते. मात्र जिल्हा बँकेच्या संचालकांनी आम्हाला धनादेशाद्वारे रक्कम न देता खात्यावर थेट आरटीजीएस करा ही भुमीका घेऊन धनादेश न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे धनादेश पुन्हा तहसील कार्यालयात पाठवण्यात आले. कारण सोयगाव व फुलंब्री तालुक्याला पैसे आरटीजीएस द्वारे दिल्या गेले. तहसीलदार ज्योती पवार यांनी जिल्हाधिकारी यांना धनादेश परत मिळाल्यासंदर्भात कल्पना दिली. त्याची जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेत. बैठकीमध्ये जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक आर.आर. शिंदे यांना हे धनादेश स्वीकारून मदत तात्काळ पोहोचविण्यास संदर्भात पावले उचलण्याचे आदेश दिले. त्यानंतर तहसीलमार्फत पुन्हा हे धनादेश व त्यासोबत शेतकऱ्यांची यादी जिल्हा बँकेला पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली. या सर्व प्रक्रियेमुळे व जिल्हा बँक व जिल्हा प्रशासन यांच्या विसंगत भूमिकेमुळे औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी तर सोडा दिवाळीनंतर जवळपास आठवडा उलटत आला तरी देखील मिळालेली नसल्याने बळीराजा हवालदिलं झाला आहे.

लवकर मदत देण्यासाठी 'आरटीजीएस'चा आग्रहतहसीलमार्फत आम्हाला एसबीआयचा धनादेश दिला हा धनादेश वटण्यासाठी किमान चार दिवस लागणार होते. शेतकऱ्यांना मोबदला दिवाळीपूर्वी देण्याची आम्ही संपूर्ण तयारी केली होती. जर जिल्हा बँकेने आरटीजीएसद्वारे पैसे दिले असते तर आम्हाला शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी पैसे जमा करता आले असते. याच भूमिकेतून आम्ही धनादेश परत करून आरटीजीएसचा असा आग्रह केला. सोयगाव व फुलंब्री तालुक्याला यांनी आरटीजीएस द्वारे पैसे पाठवलेले आहेत.- जावेद पटेल , संचालक, जिल्हा बँक

धनादेश आणि याद्या दिल्या नुकसान भरपाईचा मोबदला देण्यासाठी आम्ही ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची यादी व धनादेश यापूर्वीही देत आलो. त्याच पद्धतीने आम्ही जिल्हा बँकेत धनादेश व याद्या पाठवल्या होत्या. मात्र जिल्हा बँकेने या याद्या व धनादेश परत केल्या. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर पुन्हा या याद्या व धनादेश जिल्हा बँकेने स्वीकारण्याचा निर्णय घेतला.- जोती पवार,​ तहसीलदार, औरंगाबाद

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद