तीन वर्षांपासून लाभार्थ्यांना प्रतीक्षा

By Admin | Updated: April 6, 2016 00:22 IST2016-04-06T00:22:40+5:302016-04-06T00:22:40+5:30

बाळासाहेब जाधव , लातूर राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानांतर्गत टंचाई परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी शासनाकडून ठिबक सिंचनासाठी अनुदान देण्याचे नियोजन करण्यात आले़

Waiting for beneficiaries for three years | तीन वर्षांपासून लाभार्थ्यांना प्रतीक्षा

तीन वर्षांपासून लाभार्थ्यांना प्रतीक्षा


बाळासाहेब जाधव , लातूर
राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानांतर्गत टंचाई परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी शासनाकडून ठिबक सिंचनासाठी अनुदान देण्याचे नियोजन करण्यात आले़ २०१२-१३ मध्ये ७ हजार ५०० लाभार्थ्यांचा आकडा सांगितला जात असला तरी दोन लाभार्थ्यांचे १ लाख ५५ हजार अनुदान तब्बल तीन वर्षांनंतरही मिळालेले नाही़ त्यामुळे या लाभार्थ्यांना अद्यापही अनुदानाची प्रतिक्षा आहे़
राष्ट्रीय सुक्ष्म सिंचन अभियानाअंतर्गत ठिबकसिंचनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रतिलाभार्थी अनुदान देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली़ यामध्ये २०१२-१३ मध्ये ७ हजार १६० लाभार्थ्यांपैकी ७ हजार १५८ लाभार्थ्यांना २२ कोटी ९० लाखांचे अनुदान वाटप करण्यात आले़ परंतू त्याच कालावधीत बहुतांश लाभार्थी या ठिबक सिंचनच्या अनुदानापासून वंचित राहीले आहेत़
कृषी विभागाकडून ठिबक सिंचनाच्या लाभार्थ्यातून फक्त २ लाभार्थी या अनुदानापासून वंचित राहीले असल्याचा दावा केला जात असला तरी त्या कालावधीतही अनेक लाभार्थी वंचित राहीले असल्याने त्यांना ऐन दुष्काळी परिस्थितीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ शासनाकडून ठिबक सिंचनचे अनुदान दर तीन तहिन्यांना वाटप केले जात असल्याचा दावा केला जात असला तरी तब्बल तीन वर्षांनंतरही वंचित लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नसल्याने कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या कामातही पारदर्शकता नसल्याचे समोर आले आहे़
त्यामुळे कृषी विभागाच्या इतर योजनेपेक्षा ठिबक सिंचनच्या अनुदानावरच कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे़ त्यामुळे तब्बल तीन वर्षानंतरही दोन लाभार्थ्यांचे १ लाख ५५ हजारांचे अनुदान अद्यापही रखडल्याचे निष्पन्न झाले आहे़

Web Title: Waiting for beneficiaries for three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.