शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचे संकट गहिरे, वाघूर नदीचे पात्र टोकरून ग्रामस्थांकडून भागवली जातेय तहान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 12:21 IST

सोयगाव तालुक्यातील गावांमधील गंभीर स्थिती; सावरखेडा येथील ग्रामस्थ पाण्याच्या शोधार्थ गावाच्या बाजूला असलेल्या नदीत खड्डे करून पाणी घेत आहेत.

- यादवकुमार शिंदेसोयगाव : तालुक्यातील सावरखेडा (पांढरी), लेनापूर, दत्तवाडी या तीन गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नसल्याने ग्रामस्थांवर वाघूर नदीपात्र टोकरून खड्डे करीत पाणी शोधून तहान भागविण्याची वेळ आली आहे.

सोयगाव तालुक्यातील अजिंठा लेणीच्या पायथ्याशी वसलेल्या सावरखेडा (पांढरी), दत्त वाडी, लेनापूर या तीन गावांची एकच सावरखेडा ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. या गावांना ग्रामपंचायतीच्या गाव शिवारातील विहिरीतून जलकुंभाच्या माध्यमातून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. दोन महिन्यांपुर्वी सदरील विहिर कोरडी पडल्याने ही नळ योजना बंद झाली. त्यामुळे या गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. गावात पाणीच नसल्याने येथील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करीत आहेत. 

येथील ग्रामपंचायतीने विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव सोयगाव पंचायत समितीला १५ दिवसांपूर्वी पाठविला होता. पंचायत समितीने बुधवारी याबाबत पडताळणी केली असता ग्रामपंचायतीने ज्या विहिरीच्या अधिग्रहणाची शिफारस केली आहे, ती विहीरच कोरडी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकावर ताशेरे मारून प्रशासनाने हा प्रस्ताव परत ग्रा. पं.ला पाठविला आहे.

निवडणुकीमुळे प्रस्तावाकडे दुर्लक्षप्रशासन लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने सावरखेडा ग्रामपंचायतीने १५ दिवसांपूर्वी विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव सोयगाव पंचायत समितीला पाठविला होता; परंतु अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने या प्रस्तावाकडे कोणीही लक्ष दिले नाही. बुधवारी याबाबत ओरड वाढल्यानंतर प्रस्ताव पाहून पडताळणी केली. तेव्हा ग्रा. पं.नेही कोरडी असलेल्या विहिरीच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव पाठवल्याचे निदर्शनास आले.

दुषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यातसावरखेडा (पांढरी), लेनापूर, दत्तवाडी येथील ग्रामस्थ गाव शिवारातील वाघूर नदीपात्रात खड्डे करून पाणी घेत आहेत. हे पाणी दुषित आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. असे असतानाही नाविलाजाने येथील ग्रामस्थ तहान भागविण्यासाठी हे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत.

सावरखेडा (पांढरी), लेनापूर, दत्तवाडी ग्रुप ग्रा.पं.ची लोकसंख्या: १ हजार ५००

‘लोकमत’ची भूमिकानिवडणुकीच्या गदारोळात ग्रामीण भागातील पाणी प्रश्नाकडे नेते आणि प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचेच सावरखेडा (पांढरी), लेनापूर, दत्तवाडीमधील पाणीटंचाईमधून लक्षात येते. ज्या विहिरीचा अधिग्रहण प्रस्ताव पाठवला ती विहीर कोरडी असल्याचे लक्षात आले. हा प्रशासकीय यंत्रणेतला कोडगेपणाच म्हणावा लागेल. पाण्यासाठी ओरड करून एकीकडे नागरिकांचा घसा कोरडा पडला असताना दुसरीकडे निवडणुकीच्या धामधुमीत लाखोंचे मद्य रिचवले गेल्याचेही जनतेने पाहिले. निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपयांचे पाट वाहिले गेले. या प्रचंड अशा रकमेतूृन अनेक गावांची तहान भागवता आली असती. मात्र, पाण्यासाठी जनतेच्या डोळ्यात आलेले अश्रू पुसण्याची दृष्टी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे नसल्याचेच यानिमित्ताने समोर आले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई