शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचे संकट गहिरे, वाघूर नदीचे पात्र टोकरून ग्रामस्थांकडून भागवली जातेय तहान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 12:21 IST

सोयगाव तालुक्यातील गावांमधील गंभीर स्थिती; सावरखेडा येथील ग्रामस्थ पाण्याच्या शोधार्थ गावाच्या बाजूला असलेल्या नदीत खड्डे करून पाणी घेत आहेत.

- यादवकुमार शिंदेसोयगाव : तालुक्यातील सावरखेडा (पांढरी), लेनापूर, दत्तवाडी या तीन गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नसल्याने ग्रामस्थांवर वाघूर नदीपात्र टोकरून खड्डे करीत पाणी शोधून तहान भागविण्याची वेळ आली आहे.

सोयगाव तालुक्यातील अजिंठा लेणीच्या पायथ्याशी वसलेल्या सावरखेडा (पांढरी), दत्त वाडी, लेनापूर या तीन गावांची एकच सावरखेडा ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. या गावांना ग्रामपंचायतीच्या गाव शिवारातील विहिरीतून जलकुंभाच्या माध्यमातून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. दोन महिन्यांपुर्वी सदरील विहिर कोरडी पडल्याने ही नळ योजना बंद झाली. त्यामुळे या गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. गावात पाणीच नसल्याने येथील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करीत आहेत. 

येथील ग्रामपंचायतीने विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव सोयगाव पंचायत समितीला १५ दिवसांपूर्वी पाठविला होता. पंचायत समितीने बुधवारी याबाबत पडताळणी केली असता ग्रामपंचायतीने ज्या विहिरीच्या अधिग्रहणाची शिफारस केली आहे, ती विहीरच कोरडी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकावर ताशेरे मारून प्रशासनाने हा प्रस्ताव परत ग्रा. पं.ला पाठविला आहे.

निवडणुकीमुळे प्रस्तावाकडे दुर्लक्षप्रशासन लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने सावरखेडा ग्रामपंचायतीने १५ दिवसांपूर्वी विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव सोयगाव पंचायत समितीला पाठविला होता; परंतु अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने या प्रस्तावाकडे कोणीही लक्ष दिले नाही. बुधवारी याबाबत ओरड वाढल्यानंतर प्रस्ताव पाहून पडताळणी केली. तेव्हा ग्रा. पं.नेही कोरडी असलेल्या विहिरीच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव पाठवल्याचे निदर्शनास आले.

दुषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यातसावरखेडा (पांढरी), लेनापूर, दत्तवाडी येथील ग्रामस्थ गाव शिवारातील वाघूर नदीपात्रात खड्डे करून पाणी घेत आहेत. हे पाणी दुषित आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. असे असतानाही नाविलाजाने येथील ग्रामस्थ तहान भागविण्यासाठी हे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत.

सावरखेडा (पांढरी), लेनापूर, दत्तवाडी ग्रुप ग्रा.पं.ची लोकसंख्या: १ हजार ५००

‘लोकमत’ची भूमिकानिवडणुकीच्या गदारोळात ग्रामीण भागातील पाणी प्रश्नाकडे नेते आणि प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचेच सावरखेडा (पांढरी), लेनापूर, दत्तवाडीमधील पाणीटंचाईमधून लक्षात येते. ज्या विहिरीचा अधिग्रहण प्रस्ताव पाठवला ती विहीर कोरडी असल्याचे लक्षात आले. हा प्रशासकीय यंत्रणेतला कोडगेपणाच म्हणावा लागेल. पाण्यासाठी ओरड करून एकीकडे नागरिकांचा घसा कोरडा पडला असताना दुसरीकडे निवडणुकीच्या धामधुमीत लाखोंचे मद्य रिचवले गेल्याचेही जनतेने पाहिले. निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपयांचे पाट वाहिले गेले. या प्रचंड अशा रकमेतूृन अनेक गावांची तहान भागवता आली असती. मात्र, पाण्यासाठी जनतेच्या डोळ्यात आलेले अश्रू पुसण्याची दृष्टी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे नसल्याचेच यानिमित्ताने समोर आले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई