शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

वाळूमाफिया समजून गावकऱ्यांनी साध्या वेशातील पोलिसांनाच चोपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 18:58 IST

वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील मालाचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देएकाला अटक; पाच जण पसार  नांदर शिवारातील घटना

पाचोड : अवैधरीत्या वाळूचा उपसा करणाऱ्या वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी गेलेल्या साध्या वेशातील पोलिसांनाच वाळूमाफिया समजून गावकऱ्यांनी त्यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. यात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पैठण तालुक्यातील नांदर परिसरात सोमवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पाचोड पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांना सोमवारी रात्री माहिती मिळाली की, नांदर शिवारातील वीरभद्रा नदीपात्रातून एका ट्रॅक्टरमधून अवैधरीत्या वाळू चोरून नेली जात आहे. मिळालेल्या माहितीवरून सपोनि. येरमे यांनी पोलीस जमादार लक्ष्मण बोराडे व पोलीस हवालदार रमेश जहारवाल यांना घटनास्थळी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. बोराडे आणि जहारवाल या दोघांनी पोलिसाचे वाहन न नेता ते साध्या वेशात दुचाकीने वीरभद्रा नदीपात्राजवळ गेले. तेव्हा एका ट्रॅक्टरमध्ये दोघे जण वाळू टाकत असल्याचे त्यांना दिसले. ते त्यांच्याजवळ जाताच दोन आरोपी ट्रॅक्टर सोडून पळून गेले. 

त्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केले व ते पाचोड पोलीस ठाण्याकडे निघाले असता रात्री १२ वाजेच्या सुमारास नांदर शिवारात काही नागरिकांना ट्रॅक्टरमधून वाळूची तस्करी होत असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी सदर ट्रॅक्टर अडवून पोलीस जमादार बोराडे आणि रमेश जहारवाल यांना काठ्या आणि लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी काहीकाळ मोठा गोंधळ उडाला होता. ‘आम्ही वाळू माफिया नसून पोलीस कर्मचारी आहोत, आम्ही वाळूची चोरून वाहतूक करणाऱ्या वाळूमाफियांवर कारवाई करण्यासाठी आलो आहोत, यामुळे आम्ही साधे कपडे परिधान केले आहेत’, असे सांगून पोलीस कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना ओळखपत्रे दाखविली. 

ओळखपत्र पाहिल्यानंतर ग्रामस्थांनी काँग्रेसचे कार्यकर्ते रवींद्र काळे यांना, तर जखमी पोलीस कर्मचाऱ्यांनी सपोनि. अतुल येरमे यांना मोबाईलवर ही घटना कथन केली. तेव्हा सपोनि. येरमे व रवींद्र काळे यांनी तात्काळ नांदर गावाकडे धाव घेतली. तेथे गावकऱ्यांशी चर्चा करून हे वाळूमाफिया नसून पोलीस असल्याचे सांगितले. त्यानंतर वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेऊन ते पाचोडकडे रवाना झाले व ट्रॅक्टर ठाण्यात आणून जमा केले. मारहाणप्रकरणी सहा ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे. पाच जण पसार झाले आहेत.

परिसरात वाळूतस्करांची दहशतवीरभद्रा नदीपात्रातून वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील मालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाळूमाफियांना धडा शिकवण्यासाठी परिसरातील शेतकरी रात्रभर जागे राहत आहेत.

गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावेमारहाण करणाऱ्या सहा आरोपींविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संभाजी कचरू दिवटे (रा. दावरवाडी) याला पोलिसांनी अटक केली असून, विकास लक्ष्मण जाधव, विलास उत्तम जाधव, अनिल तुकाराम जाधव, भैया गंगाराम साळुंके, आणि विठ्ठल अप्पासाहेब तळपे हे पाच जण पसार झाले आहेत.

टॅग्स :sandवाळूmafiaमाफियाCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस