शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

विधानसभा निवडणूक १९६२ : गोविंदभाई व रफिक झकेरिया यांच्यात औरंगाबादेत चुरशीची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 13:38 IST

संयुक्त महाराष्ट्र राज्याची १९६२ मध्ये पहिली निवडणूक 

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यातील १० पैकी ९ जागा काँग्रेसला

- शांतीलाल गायकवाड 

औरंगाबाद : भारत स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाड्याचा राजकीय प्रवास पहिल्या विधानसभा निवडणुकीत हैदराबाद स्टेट, दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत द्विभाषिक मुंबई राज्य व तिसऱ्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र असा झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या मराठी भाषिक राज्याच्या पहिल्या निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातील १० पैकी ९ जागा हस्तगत करून राष्ट्रीय काँग्रेसने वरचष्मा राखला. त्यात औरंगाबाद विधानसभा निवडणूक डॉ. रफिक झकेरिया व मराठवाडा मुक्ती लढ्याचे स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्यामुळे चुरशीची झाली. त्यात डॉ. रफिक झकेरिया विजयी झाले होेते. 

मूळचे कोकणातील रहिवासी , उच्च शिक्षित डॉ. झकेरिया रफिक बालूमिया हे पंडित नेहरू यांच्या आग्रहास्तव औरंगाबादेत आले. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. त्यांचे प्रतिस्पर्धी गोविंदभाई श्रॉफ हे अपक्ष लढत होते. १९५१ मध्ये झालेली पहिली निवडणूक गोविंदभार्इंनी प्रजावाणीतर्फे याच मतदारसंघातून लढविली होती. तेव्हाही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. डॉ. झकेरिया यांनी १८ हजार ७६७ मते घेत गोविंदभार्इंवर ३ हजार ९५४ मतांनी विजय मिळविला. गोविंदभार्इंना १४ हजार ८१३ मते मिळाली होती. विजयी डॉ. झकेरिया यांना मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नगरविकास खात्याचे मंत्रीपद दिले. पुढे डॉ. झकेरिया यांनी मागास औरंगाबादचा रचनात्मक विकास घडवून आणला. 

सिल्लोडमधून  काळे विजयीस्वातंत्र्य चळवळीतील धुरंधर बाबूराव काळे यांना काँग्रेसने सिल्लोडमधून उमेदवारी दिली होती. काळे यांनी सीपीआयच्या करुणा चंद्रगुप्त यांचा पराभव केला. काळे यांनी २६ हजार १७१ मते घेत तब्बल १६ हजार ९८० मतांनी चंद्रगुप्त यांना मात दिली होती. पुढे  काळे जालना जिल्ह्याचे खासदारही झाले. 

संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत २६४ आमदारमुंबईसह तयार झालेल्या संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निवडणुकीत विधानसभेचे २६४ मतदारसंघ होते. त्यातील २१५ जागा जिंकून यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्रिंबक भराडे विधानसभा अध्यक्ष झाले. पुढे यशवंतरावांना दिल्लीत जावे लागले. त्यांची जागा मारोतराव कन्नमवार यांनी घेतली; परंंतु ३७० दिवसांच्या कारभारानंतर त्यांचे कार्यालयातच अकाली निधन झाले व वसंतराव नाईक मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यांनी महाराष्ट्रात हरितक्रांती व औद्योगिक क्रांतीही घडविली. 

जिल्ह्यात दोन महिला उमेदवार, एक पराभूतया निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने प्रत्येकी एका महिलेला उमेदवारी दिली होती. इतर सर्वच पक्षांनी केवळ पुरुषांनाच उमेदवारी दिली. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण १० मतदारसंघांतून ३२ उमेदवार रिंगणात होते. त्यात सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून सीपीआच्या करुणा चंद्रगुप्त व वैजापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या गिरजाबाई मच्ंिछद्रनाथ या महिला लढत होत्या. करुणा चंद्रगुप्त यांचा काँग्रेस उमेदवार बाबूराव काळे यांनी पराभव केला, तर गिरजाबाई मच्छिंद्रनाथ यांनी पीएसपीचे उमेदवार किशोर रामेश्वर पवार यांचा पराभव करून विधानसभा गाठली. वैजापूर मतदारसंघाच्या पहिल्या आमदार आशाताई वाघमारे ठरल्या होत्या. दुसऱ्या निवडणुकीत आशातार्इंचा पराभव झाला. वैजापूरकरांनी गिरजाबाई यांच्या रूपाने दुसऱ्यांदा एका महिलेची आमदार म्हणून निवड केली होती. 

औरंगाबाद जिल्ह्यातील आमदारविधानसभा मतदारसंघ    विजयी उमेदवार    पक्ष    मतदानऔरंगाबाद    झकेरिया रफिक बालूमिया    काँग्रेस     १८,७६७पैठण    कल्याणराव पंढरीनाथ    काँग्रेस    १६,९८०गंगापूर    यमाजीराव म्हातारराव    काँग्रेस    २०,६००वैजापूर    गिरजाबाई मच्छिंद्रनाथ    काँग्रेस    २३,८३०कन्नड    काकासाहेब भिकनराव    काँग्रेस    २१,९२६सिल्लोड    बाबूराव जंगलू काळे     काँग्रेस    २६,१७१अंबड    नानासाहेब सावळीराम    काँग्रेस    १०,८३८जालना    दत्तात्रयराव देशपांडे    काँग्रेस    ११,५२४बदनापूर(राखीव)    धकाळेश्वर मकाजी    काँग्रेस    १६,३५७भोकरदन    भाऊराव नरसिंगराव    पीडल्ब्यूपी    ३२,१६१

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभा