शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

विधानसभा निवडणूक १९६२ : गोविंदभाई व रफिक झकेरिया यांच्यात औरंगाबादेत चुरशीची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 13:38 IST

संयुक्त महाराष्ट्र राज्याची १९६२ मध्ये पहिली निवडणूक 

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यातील १० पैकी ९ जागा काँग्रेसला

- शांतीलाल गायकवाड 

औरंगाबाद : भारत स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाड्याचा राजकीय प्रवास पहिल्या विधानसभा निवडणुकीत हैदराबाद स्टेट, दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत द्विभाषिक मुंबई राज्य व तिसऱ्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र असा झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या मराठी भाषिक राज्याच्या पहिल्या निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातील १० पैकी ९ जागा हस्तगत करून राष्ट्रीय काँग्रेसने वरचष्मा राखला. त्यात औरंगाबाद विधानसभा निवडणूक डॉ. रफिक झकेरिया व मराठवाडा मुक्ती लढ्याचे स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्यामुळे चुरशीची झाली. त्यात डॉ. रफिक झकेरिया विजयी झाले होेते. 

मूळचे कोकणातील रहिवासी , उच्च शिक्षित डॉ. झकेरिया रफिक बालूमिया हे पंडित नेहरू यांच्या आग्रहास्तव औरंगाबादेत आले. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. त्यांचे प्रतिस्पर्धी गोविंदभाई श्रॉफ हे अपक्ष लढत होते. १९५१ मध्ये झालेली पहिली निवडणूक गोविंदभार्इंनी प्रजावाणीतर्फे याच मतदारसंघातून लढविली होती. तेव्हाही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. डॉ. झकेरिया यांनी १८ हजार ७६७ मते घेत गोविंदभार्इंवर ३ हजार ९५४ मतांनी विजय मिळविला. गोविंदभार्इंना १४ हजार ८१३ मते मिळाली होती. विजयी डॉ. झकेरिया यांना मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नगरविकास खात्याचे मंत्रीपद दिले. पुढे डॉ. झकेरिया यांनी मागास औरंगाबादचा रचनात्मक विकास घडवून आणला. 

सिल्लोडमधून  काळे विजयीस्वातंत्र्य चळवळीतील धुरंधर बाबूराव काळे यांना काँग्रेसने सिल्लोडमधून उमेदवारी दिली होती. काळे यांनी सीपीआयच्या करुणा चंद्रगुप्त यांचा पराभव केला. काळे यांनी २६ हजार १७१ मते घेत तब्बल १६ हजार ९८० मतांनी चंद्रगुप्त यांना मात दिली होती. पुढे  काळे जालना जिल्ह्याचे खासदारही झाले. 

संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत २६४ आमदारमुंबईसह तयार झालेल्या संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निवडणुकीत विधानसभेचे २६४ मतदारसंघ होते. त्यातील २१५ जागा जिंकून यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्रिंबक भराडे विधानसभा अध्यक्ष झाले. पुढे यशवंतरावांना दिल्लीत जावे लागले. त्यांची जागा मारोतराव कन्नमवार यांनी घेतली; परंंतु ३७० दिवसांच्या कारभारानंतर त्यांचे कार्यालयातच अकाली निधन झाले व वसंतराव नाईक मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यांनी महाराष्ट्रात हरितक्रांती व औद्योगिक क्रांतीही घडविली. 

जिल्ह्यात दोन महिला उमेदवार, एक पराभूतया निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने प्रत्येकी एका महिलेला उमेदवारी दिली होती. इतर सर्वच पक्षांनी केवळ पुरुषांनाच उमेदवारी दिली. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण १० मतदारसंघांतून ३२ उमेदवार रिंगणात होते. त्यात सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून सीपीआच्या करुणा चंद्रगुप्त व वैजापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या गिरजाबाई मच्ंिछद्रनाथ या महिला लढत होत्या. करुणा चंद्रगुप्त यांचा काँग्रेस उमेदवार बाबूराव काळे यांनी पराभव केला, तर गिरजाबाई मच्छिंद्रनाथ यांनी पीएसपीचे उमेदवार किशोर रामेश्वर पवार यांचा पराभव करून विधानसभा गाठली. वैजापूर मतदारसंघाच्या पहिल्या आमदार आशाताई वाघमारे ठरल्या होत्या. दुसऱ्या निवडणुकीत आशातार्इंचा पराभव झाला. वैजापूरकरांनी गिरजाबाई यांच्या रूपाने दुसऱ्यांदा एका महिलेची आमदार म्हणून निवड केली होती. 

औरंगाबाद जिल्ह्यातील आमदारविधानसभा मतदारसंघ    विजयी उमेदवार    पक्ष    मतदानऔरंगाबाद    झकेरिया रफिक बालूमिया    काँग्रेस     १८,७६७पैठण    कल्याणराव पंढरीनाथ    काँग्रेस    १६,९८०गंगापूर    यमाजीराव म्हातारराव    काँग्रेस    २०,६००वैजापूर    गिरजाबाई मच्छिंद्रनाथ    काँग्रेस    २३,८३०कन्नड    काकासाहेब भिकनराव    काँग्रेस    २१,९२६सिल्लोड    बाबूराव जंगलू काळे     काँग्रेस    २६,१७१अंबड    नानासाहेब सावळीराम    काँग्रेस    १०,८३८जालना    दत्तात्रयराव देशपांडे    काँग्रेस    ११,५२४बदनापूर(राखीव)    धकाळेश्वर मकाजी    काँग्रेस    १६,३५७भोकरदन    भाऊराव नरसिंगराव    पीडल्ब्यूपी    ३२,१६१

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभा