वेडेवाकडे चौक; वाहतूक समस्या!
By Admin | Updated: May 21, 2014 01:13 IST2014-05-21T01:01:54+5:302014-05-21T01:13:34+5:30
औरंगाबाद : शहरविकास आराखडा तयार करताना प्रत्येक रस्त्यावरील चौकाचे अलाईनमेंट सरळ असावे.

वेडेवाकडे चौक; वाहतूक समस्या!
औरंगाबाद : शहरविकास आराखडा तयार करताना प्रत्येक रस्त्यावरील चौकाचे अलाईनमेंट सरळ असावे. वाहतुकीला कोणताच अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे काम महापालिकेतील नगर नियोजनकारांचे आहे. मागील ३५ वर्षांत तज्ज्ञ नगररचना अधिकार्यांनी ठिकठिकाणी चुका करून ठेवल्या. त्याचे परिणाम आज शहरातील लाखो नागरिकांसह वाहनधारकांना भोगावे लागत आहेत. शहरातील शंभरपैकी ९० चौक वेडेवाकडे आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे. जालना रोडसह विविध भागांतील चौकांची आणि सिग्नलची अवस्था विचित्र आहे. कोणता सिग्नल कधी चालू होईल, कधी बंद होईल, कोणती वाहने कोणत्या दिशेने जातील याचा अजिबात नेम नाही. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. आकाशवाणी, गजानन महाराज मंदिर चौक, सेव्हन हिल, त्रिमूर्ती चौक, जुन्या शहरात शहागंज, मिलकॉर्नर, औरंगपुरा, निराला बाजार अशा ठिकाणी चौकांची रचना बिघडलेली आहे. काही ठिकाणी रस्ते रुंद करून चौक व्यवस्थित करण्याचा प्रयत्न झाला; मात्र शहरात नव्याने वसलेल्या वसाहतींमध्येही अनेक चौकांची रचना चौकासारखी नसल्याचे दिसते. काही चौक त्रिकोणी, पंचकोनी आणि वाकडे-वाकडे झाले. चौक वेळीच दुरुस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा विचित्र चौकांमध्ये वाहतूक पोलिसांचे बुथ कुठे उभे करायचे, वाहतुकीवर व सिग्नल तोडणार्यांवर नियंत्रण कसे ठेवायचे असा प्रश्न वाहतूक पोलिसांसमोर निर्माण झाला आहे. शहरातील काही चौक वगळता बहुतांश चौक नियम आणि गाईडलाईनप्रमाणे नाहीत. एका दिवसात चौक बिघडले नाही. चौकांची अवस्था विचित्र होत असताना महापालिक ा प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले. अनेक ठिकाणी समोरासमोर रस्ते नाहीत. यावर काही उपाययोजना करण्याचा विचार कधी झाला नाही. सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग कुठे असावे, याबाबतही दुर्लक्ष झाले आहे; परंतु वाहतुकीची कोंडी आणि विविध समस्यांबाबत वाहतूक पोलिसांना जबाबदार धरले जाते, असे वाहतूक पोलीस अधिकार्यांनी सांगितले. अनेक चौकात रस्ते समोरासमोर नाहीत. त्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण करून चौक योग्य होतील, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) अजित बोºहाडे यांनी सांगितले. वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने चौकांचा अभ्यास करावा लागेल. चौकांची स्थिती योग्य करण्यासाठी ट्राफिक, ट्रान्स्पोर्ट इंजिनिअर आणि तज्ज्ञांकडून नियोजन केले जाईल, असे महापालिकेचे शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनी सांगितले.