शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शेती उत्तमच! टोमॅटो, कारल्याच्या उत्पादनातून वरूड काजीकरांची कोट्यवधींची कमाई

By बापू सोळुंके | Updated: July 1, 2023 12:40 IST

कृषी दिन विशेष : विविध राज्यांतील व्यापारी येतात, थेट बांधावरून नेतात माल; पाकिस्तानलाही शेतीमालाची निर्यात

छत्रपती संभाजीनगर : शेती परवडत नाही, कर्जबाजारी झालो म्हणून येथील एकाही शेतकऱ्याने गळ्याला फास लावून आत्महत्या केलेली नाही. एवढेच नव्हे तर उत्तम शेती आणि दुय्यम नोकरी असेच वरूड काजी येथील शेतकरी सांगतात. कारण येथील शेतकरी टोमॅटो आणि कारल्याच्या उत्पादनातून दरवर्षी कोट्यवधींचे उत्पन्न घेतात. येथील टोमॅटो आणि कारल्यांना देशासह अन्य देशांतूनही मागणी आहे.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यामुळे महाराष्ट्रात हरित क्रांती झाली. यामुळे १ जुलै रोजी त्यांची जयंती राज्यात कृषी दिन म्हणून साजरी होते. छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या पाच ते सात किलोमीटर अंतरावर वरूड काजी हे सात हजार लोकसंख्येचे गाव. येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत भाजीपाला लागवडीला प्राधान्य दिले. दरवर्षी सातशे ते हजार एकरवर शेतकरी टोमॅटोची लागवड करीत असतात. विशेष म्हणजे बाराही महिने ते टोमॅटोचे पीक घेतात. गतवर्षी आणि याही वर्षी टोमॅटोचे दर प्रचंड घसरले. यामुळेे येथील शेतकऱ्यांनी टोमॅटोसोबतच कारल्याच्या शेतीला प्राधान्य दिले. सध्या वरूडला सुमारे ४०० एकरवर टोमॅटो आणि ३०० एकरवर कारल्याची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे. येथील शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्री करण्यासाठी कोणत्याही बाजारपेठेत जावे लागत नाही तर व्यापारीच येऊन खरेदी करतात. या गावातून रोज १३ ते १५ ट्रक टोमॅटो आणि कारले विविध राज्यांत जातात.

पाकिस्तानमध्येही व्हायची टोमॅटोची निर्यातभारत आणि पाकिस्तानची आयात, निर्यात सध्या बंद आहे. याचा फटका वरूड काजीच्या शेतकऱ्यांना बसल्याचे शेतकरी सांगतात. सरकारने निर्यातबंदी करण्यापूर्वी येथील टोमॅटोची शेतकऱ्यांनी दुबई आणि पाकिस्तानला निर्यात केली होती, असे शेतकरी सांगतात.

दर अस्थिर झाले तरी लाखोंची कमाईआम्ही खूप कमी रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर करतो. दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थानमधील व्यापारी आमच्या बांधावर येतात. टोमॅटोचे दर अस्थिर असले तरी आम्हाला सरासरी ४० लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. तसेच कारल्यातूनही एकरी १० ते ११ लाखांचे उत्पन्न मिळू शकेल. डाळिंबातूनही मिळणारे उत्पन्न वेगळे असेल.- संजय दांडगे, शेतकरी

टोमॅटो आणि कारल्यास प्राधान्यज्यांची शेती पावसावर अवलंबून आहेत तेही आणि ज्यांच्याकडे बारा महिने सिंचनाची सोय आहेत तेही शेतकरी नियमित टोमॅटो आणि कारल्याची शेती करतात. यातून लाखोंचे उत्पादन होते.- योगेश दांडगे, शेतकरी

विदेशातही जातो माल आमचे गाव अनेक वर्षांपासून टोमॅटो उत्पादनासाठी संपूर्ण देशभरातील व्यापाऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. आमचा माल विदेशातही जातो.-डॉ. दिलावर बेग, सरपंच

 

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादvegetableभाज्या