शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

शेती उत्तमच! टोमॅटो, कारल्याच्या उत्पादनातून वरूड काजीकरांची कोट्यवधींची कमाई

By बापू सोळुंके | Updated: July 1, 2023 12:40 IST

कृषी दिन विशेष : विविध राज्यांतील व्यापारी येतात, थेट बांधावरून नेतात माल; पाकिस्तानलाही शेतीमालाची निर्यात

छत्रपती संभाजीनगर : शेती परवडत नाही, कर्जबाजारी झालो म्हणून येथील एकाही शेतकऱ्याने गळ्याला फास लावून आत्महत्या केलेली नाही. एवढेच नव्हे तर उत्तम शेती आणि दुय्यम नोकरी असेच वरूड काजी येथील शेतकरी सांगतात. कारण येथील शेतकरी टोमॅटो आणि कारल्याच्या उत्पादनातून दरवर्षी कोट्यवधींचे उत्पन्न घेतात. येथील टोमॅटो आणि कारल्यांना देशासह अन्य देशांतूनही मागणी आहे.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यामुळे महाराष्ट्रात हरित क्रांती झाली. यामुळे १ जुलै रोजी त्यांची जयंती राज्यात कृषी दिन म्हणून साजरी होते. छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या पाच ते सात किलोमीटर अंतरावर वरूड काजी हे सात हजार लोकसंख्येचे गाव. येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत भाजीपाला लागवडीला प्राधान्य दिले. दरवर्षी सातशे ते हजार एकरवर शेतकरी टोमॅटोची लागवड करीत असतात. विशेष म्हणजे बाराही महिने ते टोमॅटोचे पीक घेतात. गतवर्षी आणि याही वर्षी टोमॅटोचे दर प्रचंड घसरले. यामुळेे येथील शेतकऱ्यांनी टोमॅटोसोबतच कारल्याच्या शेतीला प्राधान्य दिले. सध्या वरूडला सुमारे ४०० एकरवर टोमॅटो आणि ३०० एकरवर कारल्याची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे. येथील शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्री करण्यासाठी कोणत्याही बाजारपेठेत जावे लागत नाही तर व्यापारीच येऊन खरेदी करतात. या गावातून रोज १३ ते १५ ट्रक टोमॅटो आणि कारले विविध राज्यांत जातात.

पाकिस्तानमध्येही व्हायची टोमॅटोची निर्यातभारत आणि पाकिस्तानची आयात, निर्यात सध्या बंद आहे. याचा फटका वरूड काजीच्या शेतकऱ्यांना बसल्याचे शेतकरी सांगतात. सरकारने निर्यातबंदी करण्यापूर्वी येथील टोमॅटोची शेतकऱ्यांनी दुबई आणि पाकिस्तानला निर्यात केली होती, असे शेतकरी सांगतात.

दर अस्थिर झाले तरी लाखोंची कमाईआम्ही खूप कमी रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर करतो. दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थानमधील व्यापारी आमच्या बांधावर येतात. टोमॅटोचे दर अस्थिर असले तरी आम्हाला सरासरी ४० लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. तसेच कारल्यातूनही एकरी १० ते ११ लाखांचे उत्पन्न मिळू शकेल. डाळिंबातूनही मिळणारे उत्पन्न वेगळे असेल.- संजय दांडगे, शेतकरी

टोमॅटो आणि कारल्यास प्राधान्यज्यांची शेती पावसावर अवलंबून आहेत तेही आणि ज्यांच्याकडे बारा महिने सिंचनाची सोय आहेत तेही शेतकरी नियमित टोमॅटो आणि कारल्याची शेती करतात. यातून लाखोंचे उत्पादन होते.- योगेश दांडगे, शेतकरी

विदेशातही जातो माल आमचे गाव अनेक वर्षांपासून टोमॅटो उत्पादनासाठी संपूर्ण देशभरातील व्यापाऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. आमचा माल विदेशातही जातो.-डॉ. दिलावर बेग, सरपंच

 

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादvegetableभाज्या