शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

वर्धन घोडे खून खटला : आरोपींना फाशी की जन्मठेप; शुक्रवारी होणार निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 15:53 IST

दोषी ठरविलेल्या आरोपींनी विचारपूर्वक योजना आखून थंड डोक्याने (कोल्ड ब्लडेड) वर्धनचा खून केला.

ठळक मुद्देअभियोग पक्षाकडून ‘फाशी’ची विनंती वैद्यकीय तपासणीनंतर शिक्षेची बचाव पक्षाची विनंती

औरंगाबाद : ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी वर्धन घोडे या दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून खून केल्याच्या आरोपाखाली सत्र न्यायालयाने सोमवारी (दि.१० डिसेंबर) दोषी ठरविलेले आरोपी अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे या दोघांनी विचारपूर्वक योजना आखून थंड डोक्याने (कोल्ड ब्लडेड) वर्धनचा खून केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांनुसार हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ गुन्हा असल्यामुळे आरोपींना मरेपर्यंत ‘फाशी’ देण्याची विनंती अभियोग पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी मंगळवारी (दि.११ डिसेंबर) केली.  

तर आरोपी अभिलाष हा ‘फिटस्’चा (एपिलेप्सी) रुग्ण आहे. त्या भरात काय केले, हे त्याला समजत नाही. त्याची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश द्यावा, तोपर्यंत शिक्षेबाबतचा आदेश तहकूब करावा, अशी विनंती बचाव पक्षातर्फे वरिष्ठ वकील प्रकाश परांजपे यांनी केली. आरोपींना ‘फाशी’ किंवा ‘जन्मठेप’ याबाबत सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांच्या न्यायालयात १४ डिसेंबर रोजी आदेश होणार आहे.

या गाजलेल्या खटल्यात आरोपींना काय शिक्षा द्यावी यावर उभय पक्षांचा युक्तिवाद झाला. विशेष सरकारी वकील मिसर यांनी न्यायालयास विनंती केली की, वर्धन घोडेचा खून हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ गुन्हा आहे. १० वर्षांच्या मुलाच्या (वर्धन) शरीरावर तब्बल ३१ घाव होते. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. समाजासाठी ही अतिशय विघातक गोष्ट आहे. वडील नसलेल्या १० वर्षांच्या असहाय मुलाचा आरोपींनी खून केला. आरोपींनी आर्थिकदृष्ट्या सधन कोण याची पाहणी (रेकी) करून वर्धनची निवड केली. त्याचा विश्वास संपादन केला. ‘खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये पीडिताचे (व्हिक्टिम) अपहरण करून मग पैशांची मागणी केली जाते. प्रस्तुत प्रकरणात आरोपींनी आधी वर्धनचे अपहरण करून दौलताबाद घाटात त्याचा खून केला. प्रेताची विल्हेवाट न लावता डिकीत प्रेत ठेवून संशय येऊ नये यासाठी कॉलनीत परत आले. खंडणी उकळणे हाच आरोपींचा उद्देश होता. ‘वाचण्याची संधी नसलेल्या अल्पवयीन मुलाचा खून करणे’ हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ आणि समाजाला काळिमा फासणारा गुन्हा आहे. 

आजकाल समाजात असे अनेक गुन्हे घडत आहेत. चांगल्या घरातील तरुण मुले एखाद्याचे अपहरण करून खून करतात. याला आळा घालणे जरूरी आहे; अन्यथा  समाजावर याचा विपरीत परिणाम होईल, असे कृत्य करणाऱ्या आरोपींना जगण्याचा हक्क नाही. त्यांना मरेपर्यंत ‘फाशी’ द्या, अशी विनंती मिसर यांनी केली.

अवघ्या १० वर्षांच्या वर्धनचा खून हा टी.व्ही. सिरियल्सचा विपरीत परिणाम आहे. याला कुठे तरी थांबविणे जरूरी आहे, अशी विनंती करून अ‍ॅड. मिसर यांनी आपल्या युक्तिवादाच्या पुष्ट्यर्थ सर्वोच्च न्यायालयाच्या बच्चनसिंग विरुद्ध पंजाब सरकार आणि मच्छीसिंग विरुद्ध पंजाब सरकार या निवाड्यांचा संदर्भ दिला. आरोपीला ‘फाशी’ किंवा ‘जन्मठेप’ केव्हा द्यावी याबाबत या निवाड्यांमध्ये मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली आहेत. ‘आरोपीला ठोठाविलेल्या जन्मठेपेनंतरही तो सुधारण्यापलीकडचा असेल, तरच त्याला ‘फाशी’ द्यावी, अशी सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत.

बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. प्रकाश परांजपे यांनी न्यायालयास विनंती केली की, आरोपीला ‘फिटस्’चे झटके येतात. त्या भरात काय केले, हे त्याला समजत नाही. त्याची कृतीही भा.दं.वि. कलम ८४ नुसार ‘मनोविकल व्यक्तीची कृती’ असू शकते. त्याला पुन्हा वैद्यकीय तपासणीसाठी पाठवा, तोपर्यंत शिक्षेबाबतचा आदेश तहकूब करा, अशी विनंती त्यांनी केली. बचाव पक्षाच्या या विनंतीला अभियोग पक्षातर्फे अ‍ॅड. मिसर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, अभिलाषचा डॉ. उकडगावकर यांच्याकडे उपचार चालू होता. त्याच्या उपचाराबाबतची सर्व कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत. डॉक्टरांच्या मते ‘फिटस्’चा झटका काही सेकंद अथवा काही मिनिटेच येतो व नंतर कमी होतो. रुग्ण फारतर बेशुद्ध होऊ शकतो. प्रस्तुत प्रकरणातील घटनाक्रम तब्बल चार तासांचा आहे.