श्रावणात वैशाख वणवा

By Admin | Updated: August 23, 2015 00:03 IST2015-08-22T23:39:46+5:302015-08-23T00:03:46+5:30

सोमनाथ खताळ , बीड पावसाने अखडता हात घेतल्यामुळे यावर्षीच्या श्रावण महिन्यावर दुष्काळाची छाया स्पष्ट दिसू लागली आहे. बीड तालुक्यातील कपीलधार,

Vaishakh in Shravan | श्रावणात वैशाख वणवा

श्रावणात वैशाख वणवा


सोमनाथ खताळ , बीड
पावसाने अखडता हात घेतल्यामुळे यावर्षीच्या श्रावण महिन्यावर दुष्काळाची छाया स्पष्ट दिसू लागली आहे. बीड तालुक्यातील कपीलधार, पाटोद्याजवळील सौताडा याठिकाणीच धबधबे कोरडेठाक पडली आहेत. तर इतर शिवालये व विविध देवस्थाने तहानलेली आहेत. यामुळे पवित्र स्रान करण्याची संधी मिळणार नसल्याने भाविकांचा हिरमोड होत आहे.
बीडमधील कंकालेश्वर, कपिलधार येथील मन्मथस्वामींचे मंदिर, पाटोदा तालुक्यातील सौताडा, गोरक्षनाथ टेकडी, परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर आदी ठिकाणी नुसते देवस्थानच नाही तर प्रेक्षणीय स्थळे आहेत. परंतु यावर्षी पाऊस कमी झाल्याने ना धबधब्यांना पाणी आले ना प्रेक्षणीय स्थळांमध्ये हिरवळ दिसते. त्यामुळे देवांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा हिरमोड होत आहे.
‘वैद्यनाथा’ शेजारील तिर्थ कोरडेठाक
बारा ज्योतीर्लींगापैकी एक असणारे परळी येथील प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी बारा महिने भाविकांची गर्दी असते. श्रावण महिन्यात भाविकांची थोडी गर्दी वाढते. येथे दर्शनासाठी जाण्यापूर्वी मंदिराच्या उजव्या बाजुला असणाऱ्या तिर्थात भाविक अंघोळ करायचे. परंतु येथे असणाऱ्या हरीहर, मार्तंडे आणि अमृतेश्वर या तीन तिर्थापैकी हरीहर व मार्तंडे हे दोन्ही तिर्थ कोरडेठाक पडले आहेत तर अमृतेश्वर मध्ये ओंजळभर पाणी आहे. याच पाण्यात हातपाय धुवून भाविक दर्शनाला जातात. दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या बाजुला असणाऱ्या मेरू पर्वतावर भाविक जात असत. येथून संपूर्ण शहराचे दर्शन घडते. परंतु पावसाअभावी येथील हिरवळ गायब झाली असून पर्यटकांसह भाविकांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसते.
सौताड्यात गार्डन आहे
पण पाणी नाही
सौताडा येथील धबधब्याचाही आनंद यावर्षी घेता आला नाही. या धबधब्यात पाणीच वाहिले नाही. तिसऱ्या सोमवारी रामेश्वर मंदिरात मोठी यात्रा भरते. सुमारे पाच लाख भाविक येथे दर्शनासाठी येतात. महिनाभर ही यात्रा चालते. परंतु धबधब्यात पाणीच नसल्याने भाविकांसह पर्यटकांमध्ये उत्साह नाही.
दीपमाळमधील सुशोभिकरण वाळले
बीड शहरातील खंडोबा मंदिर व दिपमाळीचे बांधकाम हे पुरातन आहे. येथेही भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येतात. सध्या या मंदिराची रंगरंगोटी सुरू आहे. पाणी नसल्याने परिसरातील गार्डन वाळले आहे.
गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन येथील गोदावरी नदीच्या काठावर वसलेले शनि मंदिराच्या दर्शनासाठी येणारे भाविकही कमी झाले आहेत. गोदावरील स्रान करून ते दर्शनासाठी जात असतात.
४परंतु नदीचे पात्र महिन्यापूर्वीच आटल्याने कोठेतरी साचलेल्या डबक्यांमध्ये अंघोळ करण्याची वेळ भाविक व पर्यटकांवर आली आहे. बाजुलाच असणारे गार्डनही पाण्याावाचून वाळल्याचे दिसते.

Web Title: Vaishakh in Shravan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.