शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

औरंगाबाद विभागात ५० टक्के बालकांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 22:55 IST

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेने २० दिवसांतच ५० टक्क्यांचा पल्ला गाठला आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद विभागातील चार जिल्ह्यांत १२ लाख १७ हजार ७२६ बालकांना लसीकरण झाले आहे. २६ लाख बालकांचे उद्दिष्ट असलेल्या औरंगाबाद विभागात या मोहिमेत २३ लाखांहून अधिक उद्दिष्ट महिनाअखेरीस गाठले जाईल, असे आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले.

ठळक मुद्देगोवर-रुबेला : पोलिओनंतर सर्वात मोठी लसीकरण मोहीम

औरंगाबाद : गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेने २० दिवसांतच ५० टक्क्यांचा पल्ला गाठला आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद विभागातील चार जिल्ह्यांत १२ लाख १७ हजार ७२६ बालकांना लसीकरण झाले आहे. २६ लाख बालकांचे उद्दिष्ट असलेल्या औरंगाबाद विभागात या मोहिमेत २३ लाखांहून अधिक उद्दिष्ट महिनाअखेरीस गाठले जाईल, असे आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले.आरोग्य विभागाकडून २७ नोव्हेंबरपासून ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील बालकांना शासकीय, खासगी शाळा, अंगणवाडी आणि शासकीय रुग्णालयांत गोवर-रुबेला लसीकरण केले जात आहे. भारतात गोवरमुळे दरवर्षी ५० हजार बालकांना जीव गमवावा लागतो, तर रुबेला विषाणूमुळे वारंवार गर्भपात, मेलेले मूल जन्माला येतात. १ लाख मुलांत १५० मुले गतिमंद अथवा आजारांना बळी पडतात. ९० टक्के मुलांना गोवरची बाधा होते. यामध्ये ताप येतो, अंगावर पुरळ उठतात. साधारण ८ दिवसांत गोवर बरा होतो; परंतु अनेक महिने पुरळाचे डाग शरीरावर दिसतात.चार जिल्ह्यांत लसीकरणलसीकरण मोहिमेत जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, महानगरपालिका आरोग्य विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत बालकांना लसीकरण केले जात आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत आतापर्यंत १२ लाखांपेक्षा अधिक बालकांचे लसीकरण झाल्याची माहिती डॉ. लाळे यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यSchoolशाळाStudentविद्यार्थी