शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

महावितरणचा ‘फ्रँचायजी’चा प्रयोग तूर्त टळला; दूरगामी नियोजनाचे संचालकांकडून सादरीकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 1:39 PM

राज्यभरातील शहरे व ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत करणे, खंडित करणे, दुरुस्ती, बिलाची वसुली, मीटर रीडिंग, वीजचोरी रोखणे आदी कामांचे दूरगामी नियोजन करण्यात आल्याचे वीज कर्मचारी संघटनांच्या बैठकीत महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी दिले. त्यामुळे औरंगाबाद व जळगाव शहरातील वीजपुरवठ्याचे काम खाजगी संस्थेकडे (फ्रँचायजी) देण्याच्या हालचाली तूर्तास टळल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

ठळक मुद्देमहावितरण कंपनीतील प्रमुख सहा कर्मचारी संघटनांच्या कृती समितीसमोर मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार कर्मचार्‍यांकडे सोपविण्यात येणार्‍या जबाबदारीचे सादरीकरण केले. येत्या १ एप्रिलपासून महावितरणच्या संचलन व सुव्यवस्थेसाठी स्वतंत्र तीन विभाग अस्तित्वात येणार आहेत. कर्मचार्‍यांची कपात न करता आहे त्या कर्मचार्‍यांची विभागणी तीन विभागांत केली जाणार आहे.

औरंगाबाद : राज्यभरातील शहरे व ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत करणे, खंडित करणे, दुरुस्ती, बिलाची वसुली, मीटर रीडिंग, वीजचोरी रोखणे आदी कामांचे दूरगामी नियोजन करण्यात आल्याचे वीज कर्मचारी संघटनांच्या बैठकीत महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी दिले. त्यामुळे औरंगाबाद व जळगाव शहरातील वीजपुरवठ्याचे काम खाजगी संस्थेकडे (फ्रँचायजी) देण्याच्या हालचाली तूर्तास टळल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महावितरण कंपनीतील प्रमुख सहा कर्मचारी संघटनांच्या कृती समितीसमोर मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार कर्मचार्‍यांकडे सोपविण्यात येणार्‍या जबाबदारीचे सादरीकरण केले. येत्या १ एप्रिलपासून महावितरणच्या संचलन व सुव्यवस्थेसाठी स्वतंत्र तीन विभाग अस्तित्वात येणार आहेत. कर्मचार्‍यांची कपात न करता आहे त्या कर्मचार्‍यांची विभागणी तीन विभागांत केली जाणार आहे. सुपरवायझर केडरमधील कर्मचारी प्रत्यक्षात फिल्डवरील कामासाठी नियुक्त केले जातील. वीज ग्राहकांना दरमहा बिलासंबंधीचा संदेश मोबाईलवरच दिला जाईल. यापुढे एप्रिलपासून तांत्रिक कामगार ज्या विभागात कार्यरत असतील त्यांच्यावर त्याच कामांची जबाबदारी राहील. शहरी व निमशहरी भागात विद्युत पुरवठ्यासंबंधीची दुरुस्ती, दुरुस्तीसाठी विद्युत पुरवठा बंद ठेवणे, बिल न भरणार्‍या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करणे, बिल भरल्यास पुन्हा वीज जोडणे आदी कामांसाठी स्वतंत्र पथके कार्यरत केली जातील. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ग्रामीण भागात त्याची अंमलबजावणी केली जाईल.

भविष्यात मीटर प्रयोगशाळा अस्तित्वात आणण्याचा महावितरणचा मानस आहे. १ एप्रिलपासून सहायक अभियंता हे बिलिंग विभागाचे प्रमुख असतील. त्यांच्यावरच यापुढे ग्राहकांच्या बिलासंबंधीच्या तक्रारी, मीटर रीडिंग, वीज चोरीचे बिल, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जबाबदारी असेल. ग्रामीण उपविभागात बिलिंग व महसूलसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत केली जाणार आहे. बहुतेक सर्वच कामे आॅनलाईन होतील. त्यामुळे प्रचलित टिपणी लिहिण्याची कामे इतिहासजमा होतील. 

तांत्रिक कामगार समाधानीमहावितरणने तब्बल ५७ वर्षांनंतर कर्मचार्‍यांच्या कामाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला असून, तांत्रिक कामगारांवरील मोठा ताण यामुळे कमी होणार आहे. महावितरणच्या कार्यपद्धतीची पुनर्रचना राज्यातील १६ झोन, ४४ सर्कल, १४० विभाग, ६६३ उपविभाग व ३२२८ शाखा कार्यालयांमध्ये होणार आहे. महावितरणच्या या निर्णयामुळे तांत्रिक कामगार संघटनेचे अध्यक्ष एन. के. मगर, सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन, भाऊसाहेब भाकरे, टी. डी. कोल्हे, आर. पी. थोरात आदींनी समाधान व्यक्त केले आहे. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबाद