शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

उर्दू माध्यमाच्या शाळेत ‘मराठी’ विषय नापास!

By admin | Updated: January 28, 2017 23:57 IST

जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खाजगी उर्दू माध्यमाच्या शाळांतील मराठी वर्गाला घरघर लागली आहे

राजेश भिसे जालनाजिल्ह्यातील जिल्हा परिषद व खाजगी उर्दू माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मराठी भाषा अवगत व्हावी, त्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये व्याकरणासह इतर भाषेच्या बाबतीत अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने सुरू केलेल्या मराठी वर्गाला घरघर लागली आहे. निधीचे कारण देत मानधन रखडल्याने मराठी वर्ग बंद असून, दोन वर्षांपासून चाचणी घेण्यात न आल्याने उर्दू माध्यमातील शाळांत मराठी विषय नापास झाला, असे खेदाने म्हणावे लागेल.उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे. त्यांना एमपीएससी सारख्या स्पर्धा परिक्षांमध्ये मराठी भाषा जड जाऊ नसे, तसेच त्यांचा या परिक्षांमध्ये टक्का वाढावा, या उदात्त हेतूने राज्य शासनाने मे २००५ मध्ये मराठी भाषा फाऊंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागावी हाही उद्देश यामागे होता. परंतु कालांतराने याच्या अंमलबजावणीत शासकीय यंत्रणाच अडथळा ठरू लागल्याचे प्रकर्षाने दिसून येते. तब्बल दोन वर्षांपासून जिल्ह्यातील उर्दू माध्यमातील २० शाळांमध्ये मराठी विषयाची चाचणीच घेण्यात आली नसल्याचे आढळून आले आहे. कारण काय तर शिक्षकांचे मानधन देण्यात आले नाही. गेल्या शैक्षणिक वर्षापासून माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या अखत्यारित असलेली ही योजना आता प्रौढ निरंतर शिक्षण विभागाकडे देण्यात आली. पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित येणारे मानसेवी शिक्षकांचे मानधन आता पुण्याच्या प्रौढ निरंतर शिक्षण संचालनालयाकडे वर्ग केले. परंतु कामकाज सुकर होण्याऐवजी ते अधिक किचकट झाल्याचा अनुभव यानिमित्ताने येत आहे. प्रौढ निरंतर विभागाकडे अद्याप निधी उपलब्ध झालेला नाही. यासाठी वारंवार जिल्हाधिकारी आणि अल्पसंख्याक विभागाकडे पाठपुरावा करण्यात आलेला आहे. परंतु निधी मिळाला नसल्याचे प्रौढ निरंतर विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रौढ निरंतर शिक्षण विभागाकडून मानधन दिले जाते. याबाबत कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा केला गेला. मात्र, दुर्दैवाने याला यश मिळू शकले नाही आणि उर्दू भाषकांच्या शाळेत मराठी वर्ग बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसून येते. इतर भाषकांना मराठी भाषा अवगत व्हावी, मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी एकीकडे शासन कोट्यवधी खर्च करत असताना दुसरीकडे उर्दू माध्यमातील शाळांत मराठी भाषा शिकवणीकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा हेतू यंत्रणेतील काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेमुळे सफल होत नसल्याचे दिसून येते. या गंभीर स्थितीकडे जिल्हा प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी लक्ष देतील का, हाच खरा सवाल आहे. उच्चपातळीवर या योजनेचे अवलोकन होणे गरजेचे आहे. तरच आगामी काळात मराठीचा प्रसार योग्य गतीने होऊन भाषा अधिक समृद्ध होईल आणि अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.