शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भविष्यात राष्ट्रवादापेक्षा स्वहिताच्या विचारधारेचा शहरी नक्षलवाद आव्हानात्मक: आशीष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:57 IST

हिंदुत्व व हिंदू वेगळे आहेत, अशा विचारधारेचे प्रश्न शहरी नक्षलीवादामुळे समोर येत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : जाती-जातीत, धर्मा-धर्मांत वाद लावून राष्ट्रवादापेक्षा स्वहिताच्या राजकीय विचारधारेचा प्रवास हा शहरी नक्षलवादच आहे. भविष्यात या नक्षलवादाला राेखणे हे आव्हान आपल्यासमोर असेल, असे मत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी व्यक्त केले. तापडिया नाट्यमंदिरात मराठवाडा युवक विकास मंडळ आयोजित स्व. प्रल्हाद अभ्यंकर व्याख्यानमालेत समारोपप्रसंगी ते ‘राष्ट्रवादी विचारधारेचा राजकीय प्रवास’ या विषयावर बोलत हाेते. विचार मंचावर उद्योजक राहुल पगारिया, अरविंद केंद्रे यांची उपस्थिती होती.

मंत्री शेलार म्हणाले, शहरी नक्षलवाद सुरू झाला आहे. मतांचे राजकारण करून जाती-जातीमध्ये भांडणे लावली जात आहेत. यासाठी विविध माध्यमांतून व्यवस्थेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत. हिंदुत्व व हिंदू वेगळे आहेत, अशा विचारधारेचे प्रश्न शहरी नक्षलीवादामुळे समोर येत आहेत. जाणता राजा म्हणवून घेणारे नेते टिळक-फुले पगडीवर बोलतात. रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कसे होतील, असे वाद पुढे आणले जातात. जाती-जातींमध्ये तेढ हा शहरी नक्षलवादाचा सर्वात मोठा धोका आहे. जातीचा अधिकार मिळावा; परंतु तो व्यवस्थेतून मिळाला पाहिजे. गांधीवाद सोडून परिवार कायम सत्तेत राहण्यासाठी काँग्रेसने सत्ता मिळविली. हे वर्ष संघ कार्याचे १००वे वर्ष असून, राष्ट्रवादी विचारधारेवर संघाचे कार्य आहे. यावेळी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, दयाराम बसैये, उद्योजक विवेक देशपांडे, लता दलाल, माधुरी अदवंत आदींची उपस्थिती होती.

ठाकरे गट, मनसेवर टीका..प्रतिक्रियावादी राजकारणावरून ठाकरे गट व मनसेवरही टीका करीत शेलार म्हणाले, हा नेता असा बोलला की, त्यावर यांची प्रतिक्रिया लगेच असते किंवा त्यांच्या नेत्यांची भाषणे पाहा, राष्ट्रवादी विचारधारेचा कुठेही लवलेश नसतो.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरBJPभाजपा