शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

अवकाळीने शेतकऱ्यांचा घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:07 AM

वैजापूर तालुक्यात अडीच हजार हेक्टरला फटका वैजापूर : गेल्या दोन दिवसांत तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने २,५७६ हेक्टर क्षेत्रावरील रबी ...

वैजापूर तालुक्यात अडीच हजार हेक्टरला फटका

वैजापूर : गेल्या दोन दिवसांत तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने २,५७६ हेक्टर क्षेत्रावरील रबी पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील २९ गावांतील रबीच्या बागायती व जिरायती क्षेत्रावर पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

शहर व ग्रामीण भागात गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. अनेक ठिकाणी सोंंगणीला आलेला गहू व मका पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. याशिवाय कांदा, हरभरा व फळ पिकांचेही नुकसान झाले.

गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील बहुतांश तलाव भरलेले आहेत. या पाण्याचा उपयोग पिण्यासोबतच सिंचनासाठी होत असल्याने यावर्षीच्या रबी हंगामात शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, कांदा व हरभरा आदी पिकांची लागवड केली आहे. महसूल व कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. त्यानुसार गुरुवारी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील १,८०३ हेक्टर बागायती क्षेत्रावरील व ७७३ हेक्टर जिरायत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर तातडीने संपर्क साधून नुकसानीबाबत कळवावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले आहे.