सेनेतील संघटनात्मक बदल रखडल्याने बेचैनी
By Admin | Updated: May 17, 2016 00:32 IST2016-05-17T00:15:25+5:302016-05-17T00:32:43+5:30
विकास राऊत ल्ल औरंगाबाद शिवसेनेतील नवीन संघटनात्मक बदल रखडल्यामुळे इच्छुकांमध्ये प्रचंड अस्वस्थता वाढली आहे. वरिष्ठ पातळीवरील गटबाजीमुळे हा सगळा खेळ

सेनेतील संघटनात्मक बदल रखडल्याने बेचैनी
विकास राऊत ल्ल औरंगाबाद
शिवसेनेतील नवीन संघटनात्मक बदल रखडल्यामुळे इच्छुकांमध्ये प्रचंड अस्वस्थता वाढली आहे. वरिष्ठ पातळीवरील गटबाजीमुळे हा सगळा खेळ सुरू असल्यामुळे बैचेन कार्यकर्त्यांची मानसिकता सैरभैर झाली आहे. काही मतदारसंघांतील पदाधिकारी भाजपच्या संपर्कात येण्याचे प्रमाण वाढण्यामागे संघटनात्मक बदल लांबल्याचे कारण असल्याची चर्चा आहे.
पालकमंत्री रामदास कदम, खा.चंद्रकांत खैरे असे दोन गट सध्या तरी पक्षात आहेत. महानगरप्रमुखपदाची प्रदीप जैस्वाल यांच्याकडे जबाबदारी असली तरी अलीकडच्या काळात संघटनेवर त्या पदाची फारशी पकड राहिलेली नाही. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे पक्षाच्या कुठल्याही वादात पडू इच्छित नाहीत. तर दुसरे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी हे ग्रामीण तालुक्यांत अडकून आहेत. (पान २ वर)
निर्णय लांबणीवर
पक्षातील एका मुंबईतील पदाधिकाऱ्याने मध्यंतरी खा.खैरे आणि सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांच्या झालेल्या शब्दयुद्धावर प्रतिक्रिया देताना सांगितले होते, पक्षात असे वाद होत असल्यामुळे फेरबदल केले तर जुने पदाधिकारी भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसमावेशक आणि सर्वांच्या मर्जीने निर्णय घ्यावा लागेल.
खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख आणि पालकमंत्री यांच्यात एकमत होत नाही तोवर बदल होणे शक्य नाही, असेही त्या पदाधिकाऱ्याने सांगितले होते.