शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

लहरी निसर्ग! जूनमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत चारच दिवस पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:15 IST

लहरी निसर्गाचा पेरण्यावर मोठा परिणाम; मे महिन्यात सरासरी १५ दिवस पाऊस

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात जून महिन्यातील पूर्वार्धातील १५ पैकी चार दिवस पावसाने हजेरी लावली. ११ दिवस कोरडे गेले आहेत. याचा परिणाम पेरण्यांवर होतो आहे.

जूनच्या तुलनेत मे महिन्यात मात्र अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीच पाणी केले. ३१ पैकी सरासरी १५ दिवस पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने घेतली आहे. १४ मि.मी. पाऊस मे महिन्यात होणे अपेक्षित असताना १५० मि.मी. पाऊस झाला. १०८३ टक्के इतका हा पाऊस असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मागील वर्षी म्हणजेच १५ जून २०२४ पर्यंत ११९ मि.मी. पावसाची नोंद जिल्ह्यात झाली होती. यंदा ११.३ मि.मी.पाऊस १५ जूनपर्यंत झाला आहे. ९० टक्के पावसाची तूट आहे. ५८१.७ मि.मी. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान आहे.

दरम्यान, रविवारी शहर व परिसरात ४.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. कमाल तापमान ३२.४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४.१ अंश सेल्सिअस होते. हवेतील आर्द्रता ९५ टक्के होती.मे महिन्यात सुमारे १५ दिवस पाऊस बरसला. जिल्ह्यात १५० मि.मी. पावसाची नोंद झाली. साधारणत: १५ मि.मी. पाऊस जिल्ह्यात अपेक्षित असतो. मे महिन्यातील अवकाळी पावसानंतर जून महिन्यात नियमित पावसाळा लागूनही पाऊस होत नसल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांवर परिणाम झाला आहे.

१५ जूनपर्यंत पावसाचे दिवस...१५ जून : ४.४ मि.मी.१३ जून : ५.८ मि.मी.१२ जून : १८ मि.मी.५ जून : ३.७ मि.मी.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र