अवैैध प्रवासी वाहनांनी चाकूरच्या रस्त्यावर कोंडी
By Admin | Updated: June 11, 2014 00:27 IST2014-06-10T23:45:39+5:302014-06-11T00:27:04+5:30
चाकूर : एस़टी़महामंडळातील कर्मचारी वर्ग प्रवाशांच्या सोयीसाठी बस थांब्यावर एस़टी़ न थांबविता इतरत्र बस थांबवून प्रवासी घेत असल्याने काही प्रवाशांची गैैरसोय होत आहे़

अवैैध प्रवासी वाहनांनी चाकूरच्या रस्त्यावर कोंडी
चाकूर : बहुजन हिताय्, बहुजन सुखाय असे ब्रिदवाक्य घेऊन प्रवाशांची सोय करू पाहणाऱ्या एस़टी़महामंडळातील कर्मचारी वर्ग प्रवाशांच्या सोयीसाठी बस थांब्यावर एस़टी़ न थांबविता इतरत्र बस थांबवून प्रवासी घेत असल्याने काही प्रवाशांची गैैरसोय होत आहे़ तसेच थांबा सोडून गाड्या इतरत्र लावत असल्याने स्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे़
चाकूर तालुक्यातील चापोली, लातूर रोड, घरणी आष्टा, म्हाळंग्रा या बसस्थानकावर असा प्रसंग अधिक प्रमाणात दिसून येतो़ एस़टी़चा प्रवास बहुजन हिताय्, बहुजन सुखाय् या ब्रिद वाक्याप्रमाणे सुखद प्रवास असल्याचे समजून ज्येष्ठ नागरिक एस़टी़लाच प्राधान्य देतात़ सध्या उन्हाळी सुटी व लगीनसराईचे दिवस असल्याने बरेच नागरिक सहकुटुंब फिरायला जातात तर काही नागरिक नातेवार्ईक मित्र परिवारांच्या भेटीला जातात़ त्यातच लगीनसराई असल्यामुळे लग्नाला जाण्यासाठीही ग्रामीण भागातून एस़टी़चाच आधार घ्यावा लागत आहे़ दिवसेंदिवस एस़टी़च्या प्रवासी संख्येतही वाढ होत असल्याचे दिसत आहे़ परंतु, महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ चाकुरातील बसस्थानकात सायंकाळी ६ नंतर बसेस जात नाहीत़ पर्यायाने प्रवाशांना अवैैध प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे़ तालुक्यातील तेलगाव पाटी ते म्हाळंग्रा हा राज्यमार्ग लातूर ते नांदेड असा आहे़ चापोली येथील बऱ्याच बसेस थांब्यावर थांबत नाहीत़ त्यामुळे हिंप्पळनेर, आनंदवाडी, आजनसोंडा, शंकरवाडी, उमरगा कोर्ट, हणमंत जवळगा आदी गावांतील प्रवासी एस़टी़अभावी ताटकळत बसतात आणि एस़टी़ आली तरी बसस्थानकात येत नसल्याने प्रवाशांना अवैैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे़ तालुक्यात लातूर रोड येथे दिवसरात्र २० ते २५ रेल्वे गाड्या धावतात़ लातूर रोड परिसरात मोहनाळ, कडमुळी, सावरगाव, सांगवी येथील रेल्वेतून ये-जा करणारे प्रवाशांना बसेस अपुऱ्या पडतात़ परिणामी, खाजगी अवैैध प्रवासी वाहतूक वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे़
आष्टा मोड हे चौरस्त्यावरील गाव असून, येथून नांदेड, लातूर, उदगीर, रेणापूर या तालुक्याकडे जाता येते़ परंतु, येथील थांब्यावर बस थांबत नाहीत़ तसेच आष्टामोड जवळ जानवळ, गांजूर ही गावे आहेत़
आता बसेस स्थानकात़़़
याबाबत चाकूरचे आगारप्रमुख एम़बी़जाधव यांच्याशी संपर्क साधला असता बसस्थानकात बस थांबत नसतील तर संबंधित वाहक-चालकांना सूचना देण्यात येतील़ तरीही प्रश्न तसाच राहिला तर प्रवाशांनी आगारप्रमुखांशी संपर्क साधावा़ त्यानुसार संबंधित वाहक-चालकांवर कार्यवाही केली जाईल़