शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

१० लाखांसाठी मॅनेजरकडून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; तक्रार दाखल होताच झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 15:16 IST

लग्नाच्या १७ वर्षानंतर पतीची कुर्रता वाढली

औरंगाबाद : वाळूज एमआयडीसी भागात असलेल्या एका नामांकित कंपनीच्या व्यवस्थापकाने पत्नीवरच सतत अनैसर्गिक अत्याचार करीत छळ केला. तसेच व्यवसाय टाकण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये घेऊन येण्यासाठी मानसिक छळ, मारहाण केली. या प्रकरणी पत्नीने छावणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अत्याचारासह छळाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

जून २००४ मध्ये लग्न झालेल्या भाग्यश्री (नाव बदलले) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा पती गिरीश (नाव बदलले) हे वाळूज एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीत मॅनेजर आहेत. दोघांना एक मुलगा आहे. लग्नानंतर काही दिवस दिल्लीमध्ये नोकरी केल्यानंतर गिरीशची औरंगाबादेत २००८ मध्ये बदली झाली. तेव्हापासून तिघेजण सोबत राहत असत. मागील काही दिवसांपासून गिरीशला व्यवसाय सुरू करायचा असल्यामुळे तो पत्नी भाग्यश्रीला माहेरहून दहा लाख रुपये घेऊन येण्यासाठी छळ करीत होता. या त्रासाला कंटाळून भाग्यश्रीने १६ जुलै रोजी माहेर गाठले.

माहेरी दोघांच्या कुटुंबातील नातेवाईकांची १७ जुलै रोजी बैठक झाली. या बैठकीत गिरीशने यापुढे छळ करणार नाही, असा शब्द दिला. त्यामुळे भाग्यश्री पुन्हा त्याच दिवशी औरंगाबादत आल्या. त्याच रात्री ११ वाजेच्या सुमारास पुन्हा गिरीशने पैशासाठी वाद सुरू केले. या वादात भाग्यश्री यांना बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्यावर खोलीमध्ये ओढत नेऊन गिरीशने अनैसर्गिक अत्याचार केले. यापूर्वीही त्याने अनेकवेळा इच्छेविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार केले होते. त्यामुळे पतीसोबत राहण्यास भीती वाटत असल्यामुळे त्यांनी पोलिसात फोन केला. तेव्हा पतीने घरातील दोन लाख रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक निरीक्षक मनिषा हिवराळे करीत आहेत.

१७ वर्षांनंतर वादभाग्यश्री व गिरीश यांच्या लग्नाला १७ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यांना एक मुलगाही आहे. एवढ्या कालावधीनंतर दोघांमध्ये वाद सुरु झाले. तसेच पतीच्या विरोधात अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद