शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षा नियोजित वेळीच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 19:22 IST

आजच्या बैठकीत परीक्षा नियोजित वेळीच घेण्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. जयश्री सुर्यवंशी यांनी दिली.

ठळक मुद्देपरीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय ३१ आक्टोंबर रोजी पहिला पेपर

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नियोजित परीक्षा दिवाळीनंतर घेण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती. यामुळे परीक्षा दिवाळीपूर्वी होणारी की नंतर याविषयी मागील तीन दिवसांपासून संभ्रम निर्माण झाला होता. यावर निर्णय घेण्यासाठी आज परीक्षा मंडळाची बैठक घेण्यात आली. यात परीक्षा नियोजित वेळीच घेण्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. जयश्री सुर्यवंशी यांनी दिली.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने एम.ए., एम.कॉम., एम.एसस्सी., एमबीए आदी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३१ आक्टोंबरपासून सुरू करण्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. या परीक्षा ४ नोव्हेंबरपर्यंत घेण्याचे नियोजन होते. त्यानंतर ५ ते ११ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीसाठी सुट्या देण्यात आल्या होत्या. मात्र सम्यक विद्यार्थी आंदोलनचे डॉ. कुणाल खरात यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना सोबत घेत दिवाळीनंतर परीक्षा घेण्याची मागणी केली होती. मात्र कुलगुरू दौ-यावर असल्यामुळे त्यावर निर्णय होत नव्हता.

कुलगुरू गुरूवारी (दि.२५) विद्यापीठात परल्यानंतर तात्काळ परीक्षा मंडळाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे, प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, परीक्षा संचालक डॉ. जयश्री सुर्यवंशी, सदस्य डॉ. गोविंद काळे यांच्यासह चारही अधिष्ठाता उपस्थित होते. या बैठकीत पदव्युत्तरच्या परीक्षा दिवाळीनंतर घेतल्यास पुढील सत्र सुरू करण्यास उशिर होत आहे. यातच अभियांत्रिकीच्या परीक्षाही पुढे ढकलाव्या लागण्याची शक्यता असल्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याचा निर्णय बहुमताने घेतल्याची माहिती डॉ. सुर्यवंशी यांनी दिली. दरम्यान सम्यक विद्यार्थी आंदोलनचे डॉ. कुणाल खरात यांनी प्रकुलगुरूंची भेट घेत दिवाळीनंतर परीक्षा घेण्याची विनंती केली. मात्र तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्यामुळे प्रकुलगुरूंनी विद्यार्थ्यांनी समजावून सांगितले. यानंतर डॉ. खरात यांच्यासह विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

३६ हजार विद्यार्थी देणार परीक्षापदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३१ आक्टोंबर या नियोजित वेळेनुसारच सुरू होणार आहेत.  या परीक्षेला ३६ हजार विद्यार्थी ६१ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी भरारी पथकाऐवजी बैठ पथक देण्याचा विचार सुरू असल्याचेही डॉ. सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :dr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीexamपरीक्षाStudentविद्यार्थी