शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षा नियोजित वेळीच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 19:22 IST

आजच्या बैठकीत परीक्षा नियोजित वेळीच घेण्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. जयश्री सुर्यवंशी यांनी दिली.

ठळक मुद्देपरीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय ३१ आक्टोंबर रोजी पहिला पेपर

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नियोजित परीक्षा दिवाळीनंतर घेण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती. यामुळे परीक्षा दिवाळीपूर्वी होणारी की नंतर याविषयी मागील तीन दिवसांपासून संभ्रम निर्माण झाला होता. यावर निर्णय घेण्यासाठी आज परीक्षा मंडळाची बैठक घेण्यात आली. यात परीक्षा नियोजित वेळीच घेण्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. जयश्री सुर्यवंशी यांनी दिली.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने एम.ए., एम.कॉम., एम.एसस्सी., एमबीए आदी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३१ आक्टोंबरपासून सुरू करण्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. या परीक्षा ४ नोव्हेंबरपर्यंत घेण्याचे नियोजन होते. त्यानंतर ५ ते ११ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीसाठी सुट्या देण्यात आल्या होत्या. मात्र सम्यक विद्यार्थी आंदोलनचे डॉ. कुणाल खरात यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना सोबत घेत दिवाळीनंतर परीक्षा घेण्याची मागणी केली होती. मात्र कुलगुरू दौ-यावर असल्यामुळे त्यावर निर्णय होत नव्हता.

कुलगुरू गुरूवारी (दि.२५) विद्यापीठात परल्यानंतर तात्काळ परीक्षा मंडळाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे, प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, परीक्षा संचालक डॉ. जयश्री सुर्यवंशी, सदस्य डॉ. गोविंद काळे यांच्यासह चारही अधिष्ठाता उपस्थित होते. या बैठकीत पदव्युत्तरच्या परीक्षा दिवाळीनंतर घेतल्यास पुढील सत्र सुरू करण्यास उशिर होत आहे. यातच अभियांत्रिकीच्या परीक्षाही पुढे ढकलाव्या लागण्याची शक्यता असल्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याचा निर्णय बहुमताने घेतल्याची माहिती डॉ. सुर्यवंशी यांनी दिली. दरम्यान सम्यक विद्यार्थी आंदोलनचे डॉ. कुणाल खरात यांनी प्रकुलगुरूंची भेट घेत दिवाळीनंतर परीक्षा घेण्याची विनंती केली. मात्र तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्यामुळे प्रकुलगुरूंनी विद्यार्थ्यांनी समजावून सांगितले. यानंतर डॉ. खरात यांच्यासह विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

३६ हजार विद्यार्थी देणार परीक्षापदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३१ आक्टोंबर या नियोजित वेळेनुसारच सुरू होणार आहेत.  या परीक्षेला ३६ हजार विद्यार्थी ६१ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी भरारी पथकाऐवजी बैठ पथक देण्याचा विचार सुरू असल्याचेही डॉ. सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :dr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीexamपरीक्षाStudentविद्यार्थी