शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

लाँग मार्चमुळे नामांतराचा प्रश्न देशभरात; स्वाभिमान जागा झाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 6:50 PM

लढा नामविस्ताराचा : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासून प्रेरणा घेऊन मी नामांतरासाठी ११ नोव्हेंबर १९७९ रोजी लाँग मार्च काढला. त्यामुळे सारे समाजमन ढवळून निघाले. नामांतराचा प्रश्न देशभरात गेला आणि दलित, बौद्ध व आंबेडकरी समाजाच्या मनात स्वाभिमान जागा झाला. 

- स. सो. खंडाळकर

नामांतराचा लढा हा कुठल्या भौतिक स्वार्थासाठी नव्हता तर तो लोकशाहीच्या इभ्रतीचा लढा होता. १६ वर्षांच्या संघर्षानंतर हा लढा यशस्वी झाला. लोकशाहीचा विजय झाला, असे मी मानतो’ असे लाँग मार्चचे प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले. विद्यापीठ नामांतर रौप्यमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते लोकमतशी बोलत होते. प्रा.कवाडे हे आज महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. 

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. ‘लाँग मार्चचे प्रणेते, कट्टर नामांतरवादी नेते’ अशीच त्यांची आजही ओळख आहे. जहाल भाषणांमुळे त्याकाळी ते अत्यंत लोकप्रिय ठरले होते. महाराष्ट्रातील तत्कालीन ३३ जिल्ह्यांपैकी प्रा.कवाडे यांच्यावर २० जिल्ह्यांमध्ये प्रवेश व भाषणबंदी होती. तर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त रिबेरो यांनी त्यांच्यावर सहा महिने मुंबईत प्रवेशबंदी घातली होती. 

२७ जुलै १९७८ रोजी मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा ठराव  विधानसभेत मंजूर झाला आणि त्याची बातमी जशी पसरली, तसा मराठवाड्यात उद्रेक सुरू झाला. बौद्ध, दलित जनतेच्या वस्त्यांवर हल्ले सुरू झाले. जाळपोळ सुरू झाली. पोचीराम कांबळे, जनार्दन मवाडे यांना ठार करण्यात आले. पण शासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही. दलितांचे संरक्षण केले नाही म्हणून मी नागपुरात पहिला मोर्चा काढला. मोर्चाहून लोक परत जात होते, तेव्हा नागपूरच्या इंदोरा भागात पोलिसांनी गोळीबार केला. त्यात ११ भीमसैनिक ठार झाले, अशी माहिती देऊन कवाडे यांनी सांगितले की, पुढे महाराष्ट्र राज्य मराठवाडा विद्यापीठ नामांतर कृती समिती स्थापन करून नामांतराच्या मुद्यावरून सुरूअसलेला अन्याय मी जगाच्या व देशाच्या लक्षात आणून देण्याचा निर्णय घेतला आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवरून लाँग मार्च सुरू झाला. 

२८ नोव्हेंबर १९७९ रोजी सिंदखेडराजाजवळ राहेरी गावात हा लाँग मार्च अडवण्यात आला. पोलिसांनी या गावाला वेढा घातला. रात्री ११ वा. लाठीहल्ला सुरू करण्यात आला आणि भीमसैनिकांना ताब्यात घेऊन राज्यातील विविध तुरुंगांमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली. मला अमरावतीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांनी छळले नसेल, त्याहीपेक्षा जास्त त्रास मला देण्यात आला. 

औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेशबंदी असतानाही प्रा. जोगेंद्र कवाडे सभा घेऊन निघून जातात, याचा राग मनात धरून कश्यप हे पोलीस आयुक्त  असताना नागसेनवनात दलित मुक्ती सेनेचे अधिवेशन सुरू असताना माझ्यावर असाच लाठीहल्ला करण्यात आला. त्याच्या जखमा मनामनातून अद्यापही मिटल्या नाहीत. मानवी मूल्यांसाठी आम्ही हा लढा लढला. शिवबा, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेचा हा लढा होता. त्यात विजय झाला, याचा आनंद आहे. नामांतर लढ्यात भीमसैनिकांनी जी कुर्बानी दिली त्याला इतिहासात तोड नाही. जगाच्या इतिहासात ही अभूतपूर्व घटना होय, अशी प्रतिक्रिया कवाडे यांनी नोंदविली. 

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनJogendra kawadeजोगेंद्र कवाडेDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद