शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय दर्जा मिळविण्याकडे विद्यापीठाची वाटचाल

By admin | Updated: August 23, 2014 00:49 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ५६ वर्षांच्या कार्यकाळात अनेक स्थित्यंतरे पाहिली.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ५६ वर्षांच्या कार्यकाळात अनेक स्थित्यंतरे पाहिली. सुरुवातीला अवघ्या ३ हजार विद्यार्थी व ९ महाविद्यालयांपासून सुरू झालेल्या या विद्यापीठाच्या कार्यकक्षेत आज ३९२ महाविद्यालये व ३ लाख ५० हजार विद्यार्थी आहेत. २३ आॅगस्ट १९५८ रोजी मराठवाड्यात हे पहिले विद्यापीठ सुरू झाले. तेव्हा विद्यापीठाच्या कार्यकक्षेत मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी आणि नांदेड हे पाच जिल्हे होते. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीची पायाभरणी झाली.
मराठवाडा हा तसा सर्वच दृष्ट्या मागास असलेला विभाग होता. विद्यापीठ स्थापन करण्यासाठी किमान १०० महाविद्यालये असावीत. या विभागात तेव्हा उच्चशिक्षण देणारी मिलिंद महाविद्यालयाबरोबर अवघी ५ महाविद्यालयेच होती. त्यामुळे तेव्हाच्या प्रधान सचिवांनी औरंगाबादेत विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव फेटाळला. ही बाब मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना समजली, तेव्हा त्यांनी मराठवाड्यात विद्यापीठ असायलाच हवे. महाविद्यालये नसतील तर तिथे महाविद्यालये वाढवा, अशी भूमिका घेत औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर त्यांनी बुद्धलेणीच्या अलीकडे जवळपास ७५० एकर जमीन विद्यापीठासाठी दिली. सुरुवातीला या विद्यापीठाचा कारभार सध्याच्या जिल्हा परिषद इमारतीत सुरू झाला.
सुरुवातीचे कुलगुरू म्हणून एस. आर. डोंगरकेरी यांनी १९ जून १९५८ ते १८ जून १९६४ पर्यंत कार्यभार सांभाळला. त्यानंतर ५६ वर्षांच्या काळात या विद्यापीठाला १५ कुलगुरू मिळाले. १९७१ ते १९७४ या कालावधीत कुलगुरू म्हणून डॉ. आर. पी. नाथ यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांनी नाट्यशास्त्र आणि वृत्तपत्रविद्या हे दोन विभाग सुरू केले. त्यानंतर १९७८ साली वसंतराव काळे यांनी विद्यापीठाच्या अधिसभेत नामांतराचा ठराव पारित केला. त्यानंतर विधानसभा व विधान परिषदेतही नामांतराच्या ठरावास अनुकूलता दर्शविण्यात आली आणि मराठवाड्यात रातोरात दंगली सुरू झाल्या. संपूर्ण मराठवाडा आगीत धुमसत होता. याचा परिणाम अध्ययन व अध्यापन तसेच संशोधनावर झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आपल्या ५६ वर्षांच्या कार्यकाळात मर्यादित साधन, सुविधांच्या माध्यमातून गरूडझेप घेतली. विद्यार्थी हा केंद्रबिंदू डोळ्यासमोर ठेवून विद्यापीठाने नावीन्यपूर्ण संशोधन व अध्ययनाला महत्त्व तर दिलेच, याशिवाय संशोधन हे समाजाच्या समृद्धीसाठी हवे, हा मंत्र कायम जपण्याचा प्रयत्न केलेला आहे.
१४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचे नामकरण आणि त्याचबरोबर विभाजनही झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नावाने सुरू झालेल्या या विद्यापीठाच्या विभाजनानंतर जवळपास निम्मी पदेही कमी झाली. आजच्या तारखेत या विद्यापीठात शिक्षकांची २५० पदे मंजूर असून, त्यापैकी ७० पदे रिक्त आहेत. महाविद्यालये वाढली. विद्यार्थ्यांची संख्या वाढली. वेगवेगळे विभाग, नवनवीन अभ्यासक्रम या विद्यापीठात सुरू झाले. तत्कालीन कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी या विद्यापीठाला नॅकचा ‘अ’ दर्जा मिळवून दिला. आताचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे हे या विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मागील ५६ वर्षांत विद्यापीठाने प्रगतीचे अनेक टप्पे गाठले असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या नावाने आज हे विद्यापीठ आहे. त्यांच्या नावाला शोभेल असा लौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढविण्यासाठी आगामी ५ वर्षांमध्ये ‘रोड मॅप’ आखण्यासाठी कुलगुरू डॉ. चोपडे हे कटिबद्ध आहेत.
प्राणीशास्त्र विभाग हा देशातील पहिल्या क्रमांकाचा
१९८३ मध्ये विद्यापीठाचा रौप्यमहोत्सव झाला. त्यानंतर १९८४ मध्ये विद्यापीठात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र हे स्वतंत्र विभाग सुरू झाले. आजघडीला या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभाग हा देशातील राज्य विद्यापीठांमध्ये पहिल्या क्रमांकाचा आहे.