शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

औरंगाबाद जिल्ह्यात अघोषित संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:12 AM

पारा वाढला : उन्हाच्या तडाख्यामुळे बाजारपेठेवर परिणाम; ेदुपारनंतर सर्वत्र शुकशुकाट, पर्यटनस्थळांकडे पर्यटकांची पाठ

औरंगाबाद : सूर्य आग ओकू लागल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अघोषित संचारबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढच होत असल्याने दुपारनंतर रस्त्यांवर शुकशुकाट दिसत असून, याचा बाजारपेठेलाही फटका बसला आहे. बहुतांश शेतकरी सकाळी ११ वाजेच्या आतच आपली कामे उरकत असून, ग्रामस्थही नियमित कामे याच वेळेत आटोपून दुपारी घरातच राहणे पसंत करीत आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील बहुतांश पर्यटनस्थळांकडे उन्हामुळे पर्यटकांनी पाठ फिरविल्याने स्थानिक व्यावसायिकांवर संक्रांत आली आहे.खुलताबादेतील पर्यटनस्थळे ओसखुलताबाद : तापमान जवळपास ४३ अंशांवर पोहोचल्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी घरातच राहणे पसंत केल्यामुळे शुक्रवारी खुलताबादेतील पर्यटनस्थळांसह देवस्थान परिसरात शुकशुकाट दिसून आला. यामुळे व्यावसायिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिरात पर्यटक व भाविकांची नेहमी गर्दी असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्याने पर्यटक, भाविकांची संख्या रोडावली आहे. परिणामी गर्दी नसल्याने हॉटेल व्यावसायिक, खेळणी व पुस्तक विके्र ते, फळविक्रेते यांच्या व्यवसायांवर परिणाम झाला आहे.देशात सर्वत्र तापमानात प्रचंड वाढ झाल्याने देशी पर्यटक पर्यटनासाठी बाहेर निघत नसल्यामुळे एक महिना तरी अशीच परिस्थिती राहणार असून, जूननंतर पर्यटन हंगाम सुरू होईल, असे वेरूळ लेणी परिसरातील व्यावसायिकांनी सांगितले. खुलताबाद, वेरूळ, दौलताबाद, म्हैसमाळ आदी पर्यटनस्थळे वाढत्या तापमानामुळे ओस पडली आहते. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. सध्या वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिरात व खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात दर्शनासाठी आंंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांतून शिर्डी येथे जाणारे तुरळक भाविक दिसून येत आहेत.-------------

टॅग्स :Sun strokeउष्माघातtourismपर्यटन