शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

महापालिका सभागृहात अभूतपूर्व गदारोळ; प्रथमच करावे लागले पोलिसांना पाचारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 18:56 IST

गदारोळ करणाऱ्या २0 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्दचा ठराव

ठळक मुद्देएमआयएमच्या सदस्यांची उचलबांगडीखासदारांच्या अभिनंदन ठरावाला बगलसंपूर्ण प्रकरणात काँग्रेस-राष्ट्रवादी अलिप्त

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गदारोळ उडाला. इतिहासात पहिल्यांदाच सभागृहात पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि ठिय्या आंदोलन करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकांची उचलबांगडी करून त्यांना सभागृहाबाहेर काढत २० सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव संमत झाला. या सर्व गदारोळाचे कारण होते नवनिर्वाचित खा.इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन ठरावाला सत्ताधारी शिवसेना-भाजपने दिलेली बगल. 

गदारोळामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांच्या आदेशाने व उपमहापौर, सभागृह नेत्यांच्या सूचक, अनुमोदनाने सदस्यत्व निलंबनाचा ठराव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय झत्तला. गुरुवारच्या मनपा सर्वसाधारण सभेत युती आणि एमआयएमचे नगरसेवक आमने-सामने आल्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सभागृहात साडेतीन तास ठिय्या देऊन महापौरांविरोधात घोषणा देणाऱ्या ६ ठिय्येकरी नगरसेवकांची पोलिसांनी उचलबांगडी करून त्यांना सभागृहाबाहेर नेले. यामध्ये एमआयएमच्या विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांनादेखील पोलिसांनी सभागृहाबाहेर काढले. पालिका सभेच्या कामकाजात पहिल्यांदाच २० नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव पारित करण्यात आला असून, पोलिसांनी सभागृहातून नगरसेवकांची उचलबांगडी करण्याची घटनाही पहिल्यांदाच घडली. 

दोन दिवसांपूर्वी खा. जलील यांना सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील वाघांच्या बछड्यांच्या नामकरण सोहळ्यात सत्ताधाऱ्यांनी डावलले होते. तेव्हा एमआयएम नगरसेवकांनी महापौर, प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले. त्याचे पडसाद गुरुवारच्या सभेत उमटले. सभेच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांनी खा. जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तुम्ही येण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील सर्व खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव घेतल्याचे सांगत बोर्डे यांची मागणी महापौरांनी फेटाळली. भाजप नगरसेवकांनी शहरातील पाणीटंचाईवर चर्चेची मागणी केली. महापौरांचे दुर्लक्ष व अवमानाच्या भावनेतून एमआयएम नगरसेवक अभिनंदन ठरावासाठी आक्रमक झाले, तर भाजप नगरसेवकांनीही पाण्यासाठी आवाज मोठा केला. भाजप आणि एमआयएम, असा संघर्ष होऊन सभेत वादाची ठिणगी पडली. पाण्यासाठी भाजपचे राजू शिंदे, प्रमोद राठोड यांनी राजदंड पळविला. मात्र, महापौरांच्या सूचनेवरून तो पुन्हा जागेवर ठेवला. भाजप नगरसेवकांनी पाण्यासाठी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या दिला, तर एमआयएम नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर अभिनंदन ठरावासाठी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्र्यंबक तुपे, विकास जैन, राजू वैद्य आदी महापौरांच्या बचावासाठी घोषणायुद्धात उतरले. हताश होऊन महापौरांनी सभेचे कामकाज थांबविले.

त्यानंतर लगेचच सभा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एमआयएम नगरसेवकांनी अभिनंदन ठरावासाठी घोषणेचा आवाज चढविला. त्यामुळे ठिय्या देणाऱ्या सहा नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द करीत त्यांना सभागृहाबाहेर जाण्याचा आदेश महापौरांनी दिल्याने एमआयएमचे सर्व नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. महापौरांनी पुन्हा सभा तहकूब केली. ‘महापौरांचे करायचे काय, महापौर हाय... हाय...’ अशा घोषणा देत एमआयएम नगरसेवकांनी मनपा दणाणून सोडली. प्रत्युत्तरात शिवसेना-भाजप नगरसेवकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘महापौर जिंदाबाद’, अशा घोषणा सुरूच होत्या.

पोलिसांना पहिल्यांदाच सभागृहात पाचारण घोषणायुद्ध थांबत नसल्याने प्रशासनाने सिटीचौक पोलिसांना पाचारण केले. पालिकेच्या सभागृहात येऊन पोलिसांनी एमआयएम नगरसेवकांना सभागृहातून बाहेर जाण्याचे आवाहन करण्याची घटना पहिल्यांदाच घडली. लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरू आहे, कारवाईचे परिणाम वाईट होतील, असा इशारा विरोधी पक्षनेत्या बोर्डे, नगरसेवकांनी पोलिसांना दिला.४ या पेचामुळे पोलिसांनी प्रशासनाकडून कारवाईसाठी लेखी पत्राची मागणी केली. नगरसचिवांनी कारवाईसाठी पोलिसांना लेखी पत्र दिल्यानंतर पोलीस बळाचा वापर करीत नगरसेवकांची उचलबांगडी करून त्यांना सभागृहाबाहेर काढले. महिला नगरसेविका स्वत: होऊन बाहेर पडल्या. हे सगळे काही पहिल्यांदाच घडले.

महापौरांनी मतदारांचा अवमान केला नूतन खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव न घेता महापौरांनी जातीयवाद करीत खा. जलील यांना मतदान करणाऱ्या मतदारांचा अवमान केला आहे. लोकशाही मार्गाने सभागृहात आंदोलन केले. मात्र, विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यात आला. यापुढे महापौरांची दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांनी महापौरांना दिले, तसेच सभेत काही महत्त्वपूर्ण आर्थिक विषय होते. शहरातील रस्त्यांची कामे निकृष्ट पद्धतीने सुरू असून, यावर आम्ही सभागृहात जाब विचारणार होतो; परंतु महापौरांनी मनमानी करीत आम्हाला सभागृहाबाहेर काढल्याचा आरोप एमआयएम पक्षाचे गटनेते नासेर सिद्दीकी यांनी केला.

एमआयएमने केले राजकारण एमआयएमने सर्वसाधारण सभेत गदारोळ करून शहराची प्रतिमा मलिन केली. क्षुल्लक कारणाचे एमआयएमने राजकारण केले. देशातील सर्व खासदारांचे अभिनंदन केले. मात्र, एमआयएमने पाणी प्रश्नावर चर्चा सुरू असताना वाद घातला. असंसदीय बोलून सभागृहात गदारोळ करणे यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपा