शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका सभागृहात अभूतपूर्व गदारोळ; प्रथमच करावे लागले पोलिसांना पाचारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 18:56 IST

गदारोळ करणाऱ्या २0 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्दचा ठराव

ठळक मुद्देएमआयएमच्या सदस्यांची उचलबांगडीखासदारांच्या अभिनंदन ठरावाला बगलसंपूर्ण प्रकरणात काँग्रेस-राष्ट्रवादी अलिप्त

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गदारोळ उडाला. इतिहासात पहिल्यांदाच सभागृहात पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि ठिय्या आंदोलन करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकांची उचलबांगडी करून त्यांना सभागृहाबाहेर काढत २० सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव संमत झाला. या सर्व गदारोळाचे कारण होते नवनिर्वाचित खा.इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन ठरावाला सत्ताधारी शिवसेना-भाजपने दिलेली बगल. 

गदारोळामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांच्या आदेशाने व उपमहापौर, सभागृह नेत्यांच्या सूचक, अनुमोदनाने सदस्यत्व निलंबनाचा ठराव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय झत्तला. गुरुवारच्या मनपा सर्वसाधारण सभेत युती आणि एमआयएमचे नगरसेवक आमने-सामने आल्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सभागृहात साडेतीन तास ठिय्या देऊन महापौरांविरोधात घोषणा देणाऱ्या ६ ठिय्येकरी नगरसेवकांची पोलिसांनी उचलबांगडी करून त्यांना सभागृहाबाहेर नेले. यामध्ये एमआयएमच्या विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांनादेखील पोलिसांनी सभागृहाबाहेर काढले. पालिका सभेच्या कामकाजात पहिल्यांदाच २० नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव पारित करण्यात आला असून, पोलिसांनी सभागृहातून नगरसेवकांची उचलबांगडी करण्याची घटनाही पहिल्यांदाच घडली. 

दोन दिवसांपूर्वी खा. जलील यांना सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील वाघांच्या बछड्यांच्या नामकरण सोहळ्यात सत्ताधाऱ्यांनी डावलले होते. तेव्हा एमआयएम नगरसेवकांनी महापौर, प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले. त्याचे पडसाद गुरुवारच्या सभेत उमटले. सभेच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांनी खा. जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तुम्ही येण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील सर्व खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव घेतल्याचे सांगत बोर्डे यांची मागणी महापौरांनी फेटाळली. भाजप नगरसेवकांनी शहरातील पाणीटंचाईवर चर्चेची मागणी केली. महापौरांचे दुर्लक्ष व अवमानाच्या भावनेतून एमआयएम नगरसेवक अभिनंदन ठरावासाठी आक्रमक झाले, तर भाजप नगरसेवकांनीही पाण्यासाठी आवाज मोठा केला. भाजप आणि एमआयएम, असा संघर्ष होऊन सभेत वादाची ठिणगी पडली. पाण्यासाठी भाजपचे राजू शिंदे, प्रमोद राठोड यांनी राजदंड पळविला. मात्र, महापौरांच्या सूचनेवरून तो पुन्हा जागेवर ठेवला. भाजप नगरसेवकांनी पाण्यासाठी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या दिला, तर एमआयएम नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर अभिनंदन ठरावासाठी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्र्यंबक तुपे, विकास जैन, राजू वैद्य आदी महापौरांच्या बचावासाठी घोषणायुद्धात उतरले. हताश होऊन महापौरांनी सभेचे कामकाज थांबविले.

त्यानंतर लगेचच सभा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एमआयएम नगरसेवकांनी अभिनंदन ठरावासाठी घोषणेचा आवाज चढविला. त्यामुळे ठिय्या देणाऱ्या सहा नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द करीत त्यांना सभागृहाबाहेर जाण्याचा आदेश महापौरांनी दिल्याने एमआयएमचे सर्व नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. महापौरांनी पुन्हा सभा तहकूब केली. ‘महापौरांचे करायचे काय, महापौर हाय... हाय...’ अशा घोषणा देत एमआयएम नगरसेवकांनी मनपा दणाणून सोडली. प्रत्युत्तरात शिवसेना-भाजप नगरसेवकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘महापौर जिंदाबाद’, अशा घोषणा सुरूच होत्या.

पोलिसांना पहिल्यांदाच सभागृहात पाचारण घोषणायुद्ध थांबत नसल्याने प्रशासनाने सिटीचौक पोलिसांना पाचारण केले. पालिकेच्या सभागृहात येऊन पोलिसांनी एमआयएम नगरसेवकांना सभागृहातून बाहेर जाण्याचे आवाहन करण्याची घटना पहिल्यांदाच घडली. लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरू आहे, कारवाईचे परिणाम वाईट होतील, असा इशारा विरोधी पक्षनेत्या बोर्डे, नगरसेवकांनी पोलिसांना दिला.४ या पेचामुळे पोलिसांनी प्रशासनाकडून कारवाईसाठी लेखी पत्राची मागणी केली. नगरसचिवांनी कारवाईसाठी पोलिसांना लेखी पत्र दिल्यानंतर पोलीस बळाचा वापर करीत नगरसेवकांची उचलबांगडी करून त्यांना सभागृहाबाहेर काढले. महिला नगरसेविका स्वत: होऊन बाहेर पडल्या. हे सगळे काही पहिल्यांदाच घडले.

महापौरांनी मतदारांचा अवमान केला नूतन खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव न घेता महापौरांनी जातीयवाद करीत खा. जलील यांना मतदान करणाऱ्या मतदारांचा अवमान केला आहे. लोकशाही मार्गाने सभागृहात आंदोलन केले. मात्र, विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यात आला. यापुढे महापौरांची दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांनी महापौरांना दिले, तसेच सभेत काही महत्त्वपूर्ण आर्थिक विषय होते. शहरातील रस्त्यांची कामे निकृष्ट पद्धतीने सुरू असून, यावर आम्ही सभागृहात जाब विचारणार होतो; परंतु महापौरांनी मनमानी करीत आम्हाला सभागृहाबाहेर काढल्याचा आरोप एमआयएम पक्षाचे गटनेते नासेर सिद्दीकी यांनी केला.

एमआयएमने केले राजकारण एमआयएमने सर्वसाधारण सभेत गदारोळ करून शहराची प्रतिमा मलिन केली. क्षुल्लक कारणाचे एमआयएमने राजकारण केले. देशातील सर्व खासदारांचे अभिनंदन केले. मात्र, एमआयएमने पाणी प्रश्नावर चर्चा सुरू असताना वाद घातला. असंसदीय बोलून सभागृहात गदारोळ करणे यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपा