शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"युती झाली नाही तर उद्धव ठाकरे यांनाही ‘ईडी’त अडकवतील!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 22:14 IST

‘ना वंशाचा, ना रक्ताचा, ना घराण्याचा... पाहिजे फक्त बाबासाहेबांच्या विचारांचा’

ठळक मुद्दे‘सेव्ह रिझर्व्हेशन, सेव्ह कॉन्स्टिट्यूशन’चा नारा 

औरंगाबाद : भाजप-शिवसेनेची युती होणारच आहे. युती झाली नाही तर उद्धव ठाकरे यांना भाजप ईडीत अडकवेल, असा उपरोधिक टोला आज येथे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला. दुपारी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. ‘ना वंशाचा, ना रक्ताचा, ना घराण्याचा... पाहिजे फक्त बाबासाहेबांच्या विचारांचा’ हे ब्रीद घेऊन आता आम्ही समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे भीमराज्य आणण्यासाठी रिपब्लिकन ब्रदरहूड निर्माण करण्यासाठी रिपब्लिकन जनशक्ती महाआघाडी निर्माण करीत आहोत. त्याचा पहिला मेळावा उद्या, दि. २६ आॅगस्ट रोजी नाशिकला होत असल्याची माहिती त्यांनी दिली. या मेळाव्यास रिपब्लिकन पक्षाचे सर्व घटक, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक सदस्य लक्षमण माने, गंगाधर गाडे, सूर्यकांता गाडे, रमेश गायकवाड, उपेंद्र शेंडे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

‘सेव्ह मेरिट... सेव्ह नेशन’ या मोहिमेचे बोलविते धनी डॉ. मोहन भागवत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गनिमी काव्याचा वापर करून ही मोहीम सुरू केली आहे. त्यांना संविधानाची आणि आरक्षणाची समीक्षा हवी असेल तर मग आमचे उत्तर हे आहे की, आधी तुमच्या धर्मव्यवस्थेची समीक्षा करा, ब्राह्मणवादी व्यवस्थेची समीक्षा करा. माणुसकीहीन धर्मव्यवस्थेतूनच आरक्षण आले ना? धर्मव्यवस्थेची चिकित्सा करून आरक्षणाला हात लावा. अलीकडेच  मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला तर हा विरोध नाही ना? आरक्षित वर्गाला अस्वस्थ करून ठेवलेकी तो विकासापासून दूर जाईल, असे हे षड्यंत्र दिसते. 

‘मंदिर आरक्षण हटाव... देश बचाव’ असा नारा देत कवाडे यांनी सांगितले की, देशभरातील मंदिरांमध्येही सवर्णांमधील ओबीसी व बहुजनांनाही पुजारीपणाचे आरक्षण मिळाले पाहिजे. आता या मागणीसाठी लवकरच आंदोलन सुरू होणार आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर घणाघाती टीका केली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीअंताचे स्वप्न पाहिले होते. जातीय समीकरणाचे राजकारण करून त्यालाच बाळासाहेब छेद देत आहेत. पत्रपरिषदेस चरणदास इंगोले, अनिल तुरुकमारे, अशोक जाधव, लक्ष्मण कांबळे, राहुल पडघन, प्रकाश जाधव, सागर कुलकर्णी, आनंद लोखंडे, रामदास लोखंडे आदींची उपस्थिती होती. 

वंचित आघाडीचे स्वागतवंचित बहुजन आघाडी काँग्रेसबरोबर येत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करू; पण स्वत: मुख्यमंत्रीपदाची इच्छा बाळासाहेब आंबेडकरांनी  व्यक्त करण्यापेक्षा काँग्रेसने असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरले असते, असा टोला त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना मारला. 

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडेUddhav Thackerayउद्धव ठाकरेvidhan sabhaविधानसभाBJPभाजपा