शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Uddhav Thackeray: ‘तेव्हा भाजपाने गणेशोत्सवादिवशीच भारत बंद केला, हे यांचं हिंदुत्व’, उद्धव ठाकरेंनी इतिहास काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 21:48 IST

Uddhav Thackeray Aurangabad Sabha: औरंगाबादमध्ये शिवसेनेने जबरदस्त शक्तिप्रदर्शन करत आयोजित केलेल्या या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या हिंदुत्वाचे वाभाडे काढले. तसेच एकदा महागाईविरोधात भाजपाने गणेशोत्सवादिवशीच भारत बंदची घोषणा केली होती, हेच यांचं हिंदुत्व का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

औरंगाबाद - राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आज भाजपावर चौफेर हल्ला चढवला. औरंगाबादमध्ये शिवसेनेने जबरदस्त शक्तिप्रदर्शन करत आयोजित केलेल्या या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या हिंदुत्वाचे वाभाडे काढले. तसेच एकदा महागाईविरोधात भाजपाने गणेशोत्सवादिवशीच भारत बंदची घोषणा केली होती, हेच यांचं हिंदुत्व का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने एकदा भारत बंद नारा दिला होता.  शिवसेनासोबत होती म्हणून, नाहीतर त्यांची बंद करण्याची ताकद नाही. बंद घोषित करण्यासाठी जो दिवस निवडला, तो दिवस नेमका गणपतींच्या आगमनाचा होता. शिवसेनाप्रमुखांना मी विचारलं, तेव्हा ते आपण या बंदमध्ये सहभाही व्हायचं नाही, असं ते म्हणाले. त्यानंतर मी  सुषमा स्वराज यांना फोन केला. त्यांना म्हटलं बंद दिवशी गणेशोत्स्व आहे. त्यामुळे आमची अडचण होणार आहे. तर त्या म्हणाल्या, गणपती तर दहा दिवस असतो. तेव्हा मी सांगितलं गणपतींच्या आगमनापासून आनंदोत्सवास सुरुवात होते.  आपण नाही म्हणालो. माफ करा आम्ही या बंदमध्ये सहभागी होऊ शकत नाही, असं सांगितलं, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

त्यावेळी तुम्ही ना हिंदूचे सण बघत नव्हतात, ना लोकांचा आनंद बघत होता. केवळ राजकारण करायचं म्हणून तुम्ही भारत बंद करत होता. भारत बंद म्हणजे बंद. गणपती आले काय गेले काय, हिंदूंचा सण आहे, काही का असेना आम्ही बंद करणार, अशी तुमची भूमिका होती. बाळासाहेबांची शिवसेना होती म्हणून तेव्हा हा बंद झाला नाही. शिवसेना नसती तर काय झालं असतं देव जाणो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

पेट्रोल वाढीनंतर बैलगाडीतून जाणारी अटलजींची भाजपा आज कुठे गेली. हेच तुम्हाला हवे होते का?  प्रवक्ते वाचाळपणे बोलतात. देशाची अब्रू गेली भाजपची नाही. मी विचारतो भाजपला अरे कुठे नेऊन ठेवणार आहात भारत आणि महाराष्ट्र माझा. तुम्ही शिवसेनेला नाही हिंदुत्वाला बदनाम करताय. शिवसेनेचे विचार तुम्ही काढू शकणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठामपणे सांगितले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादBJPभाजपा