शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशावर नामुष्की’, मोहम्मद पैगंबरांच्या अवमानावरून उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले खडेबोल, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 21:06 IST

Uddhav Thackeray Aurangabad Sabha: औरंगाबादमध्ये झालेल्या सभेतून भाजपा आणि केंद्र सरकारवर निषाणा साधला आहे. टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशावर नामुष्की ओढवली आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - भाजपामधून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झालेला आहे. तसेच त्यावरून अरब आणि इस्लामिक देशांमध्ये भारताविरोधा संतापाची लाट उसळली आहे. त्यावरून आज औरंगाबादमध्ये झालेल्या सभेतून भाजपा आणि केंद्र सरकारवर निषाणा साधला आहे. टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशावर नामुष्की ओढवली आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

भाजपाचं हिंदुत्व आणि नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या विधानाचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी मुस्लिमांचा द्वेष करण्यास शिकवलेलं नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहोत. आमच्यासाठी देश हाच धर्म आहे. मात्र धर्माचं वेड घेऊन आमच्या अंगावर आलात तर त्याला प्रत्युत्तर दिला.

त्या कुणीतरी भाजपाच्या टिनपाट प्रवक्त्यांनी प्रेषितांचा अवमान केला. आमच्या देवतांचा अवमान केला तर राग येतो. मग त्यांच्या प्रेषितांचा अपमान करण्याची गरज नव्हती. यानंतर अरब देश एकत्र आले. माफी मागण्याची मागणी केली. भारताच्या पंतप्रधानांचा फोटो कचराकुंडीवर लावला. गुन्हा भाजपाच्या प्रवक्त्याने केला. मग त्यासाठी देशावर नामुष्की कशाला. भाजपाची भूमिका ही देशाची भूमिका असू शकत नाही. टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशावर नामुष्की ओढवतेय, हे तुम्हाला मान्य आहे का, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण