शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
4
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
5
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
6
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
7
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या शेणॉय यांचा जागतिक स्तरावर डंका
8
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
9
उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
10
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
11
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
12
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
13
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
14
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
16
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
17
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
18
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
19
रात्री खोकल्याचं औषध प्यायला, पण सकाळी उठलाच नाही; ५ वर्षाच्या मुलाच्या मृत्युनं खळबळ!
20
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 

उद्धव ठाकरेंनी मागितली औरंगाबादकरांची माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:25 IST

शहरातील ६५ दिवसांपासून झालेली कचराकोंडी येत्या आठ दिवसांत फुटेल; परंतु महापालिकेला कचराकोंडी फोडण्यात अपयश आले आहे. औरंगाबादकरांनी शिवसेनेवर टाकलेल्या विश्वासाला तडा गेल्यामुळे त्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जाहीर माफी मागितली.

ठळक मुद्देकचराकोंडी फोडण्यात महापालिकेला अपयश : महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी न देता राज्य शासनाकडूनही कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील ६५ दिवसांपासून झालेली कचराकोंडी येत्या आठ दिवसांत फुटेल; परंतु महापालिकेला कचराकोंडी फोडण्यात अपयश आले आहे. औरंगाबादकरांनी शिवसेनेवर टाकलेल्या विश्वासाला तडा गेल्यामुळे त्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जाहीर माफी मागितली. ते सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे दोन दिवस मराठवाडा दौऱ्यावर असून, ते संघटनात्मक पदाधिकाºयांची मते जाणून घेत आहेत.ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या बैठकीपूर्वी महापौर नंदकुमार घोडेले, खा. चंद्रकांत खैरे, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि मनपा अधिकाºयांची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले की, कचºयाची समस्या बिकट झाली असून, त्याला गती नाही. औरंगाबादवासीयांची माफी मागतो. हे काम शासन, प्रशासनाचे आहे. औरंगाबादकरांनी आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. त्यामुळे त्यांची क्षमा मागतो. आज जी चर्चा झाली आहे, त्यानुसार मनपा अधिकाºयांनी ८ ते १० दिवसांत कचराकोंडी सुटेल, असे आश्वासन दिले आहे. या विषयात राजकारण आणू इच्छित नाही. शहराला मनपा आयुक्त नाही. पोलीस आयुक्त प्रभारी आहेत. जिल्हाधिकाºयांची बदली केली. या सगळ्या बाबींमध्ये मार्ग काढणे सुरू आहे. नागरिकांना त्रास होतो आहे. नागरिकांची पुन्हा एकदा क्षमा मागतो. शहराची कचराकोंडी लवकरच फुटेल. कचरा टाकण्यासाठी जेथे पालिका गेली तेथे विरोध झाला. सर्वांनी सहकार्य करावे.कचराकोंडी सोडविण्यात स्थानिक नेतृत्व अपयशी ठरले आहे काय? यावर ठाकरे म्हणाले की, नाही नेतृत्व अपयशी ठरले नाही; परंतु सर्वांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, यंत्रणा काम करीत असताना शासनाकडून मनपा आयुक्त नाहीत. पूर्ण वेळ पोलीस आयुक्त नाहीत. जिल्हाधिकारी रुजू झालेले नाहीत. मग काम कसे करणार; परंतु ६२ दिवसांत कचरामुक्ती का झाली नाही. यावर ठाकरे म्हणाले की, जनता सध्या कचरामुक्ती मागते आहे. सरकारनेदेखील इतरत्र जागा उपब्ध करून दिली पाहिजे. यंत्रणा, मशिनरी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था शासनाने केली पाहिजे. भाजपने कोंडी केली आहे काय, यावर राजकारण करू इच्छित नसल्याचे ठाकरे म्हणाले. सरकार आणि प्रशासनाने एकत्रित काम करावे.विदर्भात पावसाळी अधिवेशन नकोचपावसाळी अधिवेशन विदर्भाऐवजी मुंबईतच व्हावे. विदर्भासाठी नुसते अधिवेशन घेण्यापेक्षा विदर्भाला अमलात आणू शकाल त्या योजना द्या. जमीन निर्बंधमुक्तीचा निर्णय घेताना अधिवेशनाची गरज वाटली नाही, असा टोला लगावत शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी विदर्भात पावसाळी अधिवेशन घेण्याच्या भाजपच्या मागणीला ‘खो’ दिला. विदर्भात यापूर्वीच सर्व योजना नेल्या आहेत, या पत्रकारांच्या प्रश्नावर ठाकरे म्हणाले की, मी तसा भेदभाव करीत नाही. विदर्भाला ५० हजार कोटी देऊ, अशी घोषणा करू नका ना, आता नुसत्या ‘स्वप्नरंजनगुटिका’ देऊन काही होणार नाही. लोकांना लक्षात आले आहे. शिवसेना सरकारमध्ये असल्यामुळे मी कठोरपणे बोलत आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरे