शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंनी मागितली औरंगाबादकरांची माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:25 IST

शहरातील ६५ दिवसांपासून झालेली कचराकोंडी येत्या आठ दिवसांत फुटेल; परंतु महापालिकेला कचराकोंडी फोडण्यात अपयश आले आहे. औरंगाबादकरांनी शिवसेनेवर टाकलेल्या विश्वासाला तडा गेल्यामुळे त्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जाहीर माफी मागितली.

ठळक मुद्देकचराकोंडी फोडण्यात महापालिकेला अपयश : महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी न देता राज्य शासनाकडूनही कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील ६५ दिवसांपासून झालेली कचराकोंडी येत्या आठ दिवसांत फुटेल; परंतु महापालिकेला कचराकोंडी फोडण्यात अपयश आले आहे. औरंगाबादकरांनी शिवसेनेवर टाकलेल्या विश्वासाला तडा गेल्यामुळे त्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जाहीर माफी मागितली. ते सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे दोन दिवस मराठवाडा दौऱ्यावर असून, ते संघटनात्मक पदाधिकाºयांची मते जाणून घेत आहेत.ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या बैठकीपूर्वी महापौर नंदकुमार घोडेले, खा. चंद्रकांत खैरे, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि मनपा अधिकाºयांची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले की, कचºयाची समस्या बिकट झाली असून, त्याला गती नाही. औरंगाबादवासीयांची माफी मागतो. हे काम शासन, प्रशासनाचे आहे. औरंगाबादकरांनी आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. त्यामुळे त्यांची क्षमा मागतो. आज जी चर्चा झाली आहे, त्यानुसार मनपा अधिकाºयांनी ८ ते १० दिवसांत कचराकोंडी सुटेल, असे आश्वासन दिले आहे. या विषयात राजकारण आणू इच्छित नाही. शहराला मनपा आयुक्त नाही. पोलीस आयुक्त प्रभारी आहेत. जिल्हाधिकाºयांची बदली केली. या सगळ्या बाबींमध्ये मार्ग काढणे सुरू आहे. नागरिकांना त्रास होतो आहे. नागरिकांची पुन्हा एकदा क्षमा मागतो. शहराची कचराकोंडी लवकरच फुटेल. कचरा टाकण्यासाठी जेथे पालिका गेली तेथे विरोध झाला. सर्वांनी सहकार्य करावे.कचराकोंडी सोडविण्यात स्थानिक नेतृत्व अपयशी ठरले आहे काय? यावर ठाकरे म्हणाले की, नाही नेतृत्व अपयशी ठरले नाही; परंतु सर्वांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, यंत्रणा काम करीत असताना शासनाकडून मनपा आयुक्त नाहीत. पूर्ण वेळ पोलीस आयुक्त नाहीत. जिल्हाधिकारी रुजू झालेले नाहीत. मग काम कसे करणार; परंतु ६२ दिवसांत कचरामुक्ती का झाली नाही. यावर ठाकरे म्हणाले की, जनता सध्या कचरामुक्ती मागते आहे. सरकारनेदेखील इतरत्र जागा उपब्ध करून दिली पाहिजे. यंत्रणा, मशिनरी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था शासनाने केली पाहिजे. भाजपने कोंडी केली आहे काय, यावर राजकारण करू इच्छित नसल्याचे ठाकरे म्हणाले. सरकार आणि प्रशासनाने एकत्रित काम करावे.विदर्भात पावसाळी अधिवेशन नकोचपावसाळी अधिवेशन विदर्भाऐवजी मुंबईतच व्हावे. विदर्भासाठी नुसते अधिवेशन घेण्यापेक्षा विदर्भाला अमलात आणू शकाल त्या योजना द्या. जमीन निर्बंधमुक्तीचा निर्णय घेताना अधिवेशनाची गरज वाटली नाही, असा टोला लगावत शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी विदर्भात पावसाळी अधिवेशन घेण्याच्या भाजपच्या मागणीला ‘खो’ दिला. विदर्भात यापूर्वीच सर्व योजना नेल्या आहेत, या पत्रकारांच्या प्रश्नावर ठाकरे म्हणाले की, मी तसा भेदभाव करीत नाही. विदर्भाला ५० हजार कोटी देऊ, अशी घोषणा करू नका ना, आता नुसत्या ‘स्वप्नरंजनगुटिका’ देऊन काही होणार नाही. लोकांना लक्षात आले आहे. शिवसेना सरकारमध्ये असल्यामुळे मी कठोरपणे बोलत आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरे