शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

महापालिकेच्या नोकर भरतीत एका बाकावर दोघांनी बसून सोडविले पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 14:23 IST

या सगळ्या गोंधळामुळे अनेक उमेदवार मनपाच्या नोकरभरतीवर बहिष्कार टाकून परीक्षा न देताच केंद्रावरून बाहेर पडले.

ठळक मुद्देगोंधळामुळे परीक्षा न देताच अनेक जण पडले बाहेर११ जागांसाठी २ हजार उमेदवारांनी दिली परीक्षा

औरंगाबाद  : औरंगाबाद महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांच्या (स्थापत्य) ११ पदांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत बैठक व्यवस्थेवरून गोंधळ उडाला. एकाच बाकावर दोघांना बसविण्यात आल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेवरच उमेदवारांनी आक्षेप घेतला. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी स्वत: उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोंधळामुळे अनेक उमेदवार मनपाच्या नोकरभरतीवर बहिष्कार टाकून परीक्षा न देताच केंद्रावरून बाहेर पडले.

महापालिकेची १९९४ सालानंतर नोकरभरती झालेली नाही. जवळपास साडेसहाशे पदे रिक्त आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांअभावी महापालिकेवर कामाचा भार वाढत आहे. त्यामुळे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी नोकरभरतीची प्रक्रिया सुरू केली. पहिल्या टप्प्यात कनिष्ठ अभियंत्यांची ११ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ११ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. कोणी अर्ज केले आहेत, हे कळू नये आणि नोकरभरती पारदर्शकपणे होण्यासाठी उमेदवारांना थेट लेखी परीक्षेसाठी कागदपत्रांसह रविवारी सकाळी ११ ते १२ यावेळेत देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयात हजर राहण्याची सूचना करण्यात आली होती. 

राज्यभरातील विविध भागांतून उमेदवार सकाळी ११ ते १२ या वेळेत देवगिरी महाविद्यालयात दाखल झाले. प्रारंभी त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना वर्गात बसविण्यात आले. याठिकाणी वर्गात बसल्यानंतर परीक्षेचे नियोजन पाहून उमेदवारांना धक्काच बसला. याठिकाणचे बाक  अतिशय छोटे होते. एकाच बाकावर दोन जणांना बसविण्यात आले. त्यामुळे उमेदवारांनी बैठक व्यवस्थेवर आक्षेप घेऊन एका बाकावर एकच उमेदवार बसविण्याची मागणी केली. मनपाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी बराच वेळ त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते.यासंदर्भात माहिती मिळताच डॉ. निपुण विनायक यांनी धाव घेऊन उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चर्चा केल्यानंतरही एकाच बाकावर दोघांनी बसून परीक्षा देण्यास उमेदवारांनी नकार दिला. या गोंधळामुळे अशा पद्धतीने परीक्षा देणे नको म्हणून अनेक उमेदवार परीक्षा केंद्रातून बाहेर पडले.

पारदर्शकतेवर शंकागोंधळ होत असलेल्या काही वर्गातील उमेदवारांची अन्य वर्गात बैठक व्यवस्था करण्यात आली. यात बराच वेळ गेला. अखेर दुपारी १.४५ वाजता परीक्षेला सुरुवात झाली. जशी व्यवस्था आहे, तशातच २ हजार ९३ उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षा देऊन  बाहेर पडलेल्या उमेदवारांनी परीक्षेच्या नियोजनाविषयी नाराजी व संताप व्यक्त केला. मनपाचे नियोजन चुकले, परीक्षेच्या पारदर्शकतेवर शंका वाटते. ५ वर्षांपासून भरतीसाठी प्रयत्न करतो, अशा परीक्षा होतील, तर आमचे काय होणार, असा सवाल त्यांनी केला. 

प्रश्न क्रमांक ८७ साठी सर्वांना गुणमनपाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतही घोळ झाल्याचे दिसते. परीक्षेनंतर मनपाने संकेतस्थळावर ‘अन्सर की’ अपलोड केली. यात प्रश्न    क्रमांक ८७ साठी सर्वांना गुण देण्यात येत असल्याची सूचना लिहिण्यात आली होती. 

पुढील नियोजनाचा धडानेमके किती उमेदवार परीक्षा देतील, याचा अंदाज नव्हता. तरीही काही वर्गातच उमेदवारांची गैरसोय झाली. बसण्यावरून काही उमेदवारांचा आक्षेप होता. परंतु परीक्षेत बाजूला बसले तरीही कोणी एकमेकांना काही दाखवीत नसतो. थोडा त्रास झाला असला तरी ९० टक्के यशस्वी ठरलो आहोत. यातून पुढील काळातील नियोजनासंदर्भातही एकप्रकारे शिकता आले. सोमवारपर्यंत उमेदवारांची निवड जाहीर करण्याचा प्रयत्न आहे.- डॉ. निपुण विनायक, आयुक्त मनपा

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाexamपरीक्षाStudentविद्यार्थी