शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या नोकर भरतीत एका बाकावर दोघांनी बसून सोडविले पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 14:23 IST

या सगळ्या गोंधळामुळे अनेक उमेदवार मनपाच्या नोकरभरतीवर बहिष्कार टाकून परीक्षा न देताच केंद्रावरून बाहेर पडले.

ठळक मुद्देगोंधळामुळे परीक्षा न देताच अनेक जण पडले बाहेर११ जागांसाठी २ हजार उमेदवारांनी दिली परीक्षा

औरंगाबाद  : औरंगाबाद महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांच्या (स्थापत्य) ११ पदांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत बैठक व्यवस्थेवरून गोंधळ उडाला. एकाच बाकावर दोघांना बसविण्यात आल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेवरच उमेदवारांनी आक्षेप घेतला. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी स्वत: उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोंधळामुळे अनेक उमेदवार मनपाच्या नोकरभरतीवर बहिष्कार टाकून परीक्षा न देताच केंद्रावरून बाहेर पडले.

महापालिकेची १९९४ सालानंतर नोकरभरती झालेली नाही. जवळपास साडेसहाशे पदे रिक्त आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांअभावी महापालिकेवर कामाचा भार वाढत आहे. त्यामुळे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी नोकरभरतीची प्रक्रिया सुरू केली. पहिल्या टप्प्यात कनिष्ठ अभियंत्यांची ११ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ११ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. कोणी अर्ज केले आहेत, हे कळू नये आणि नोकरभरती पारदर्शकपणे होण्यासाठी उमेदवारांना थेट लेखी परीक्षेसाठी कागदपत्रांसह रविवारी सकाळी ११ ते १२ यावेळेत देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयात हजर राहण्याची सूचना करण्यात आली होती. 

राज्यभरातील विविध भागांतून उमेदवार सकाळी ११ ते १२ या वेळेत देवगिरी महाविद्यालयात दाखल झाले. प्रारंभी त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना वर्गात बसविण्यात आले. याठिकाणी वर्गात बसल्यानंतर परीक्षेचे नियोजन पाहून उमेदवारांना धक्काच बसला. याठिकाणचे बाक  अतिशय छोटे होते. एकाच बाकावर दोन जणांना बसविण्यात आले. त्यामुळे उमेदवारांनी बैठक व्यवस्थेवर आक्षेप घेऊन एका बाकावर एकच उमेदवार बसविण्याची मागणी केली. मनपाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी बराच वेळ त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते.यासंदर्भात माहिती मिळताच डॉ. निपुण विनायक यांनी धाव घेऊन उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चर्चा केल्यानंतरही एकाच बाकावर दोघांनी बसून परीक्षा देण्यास उमेदवारांनी नकार दिला. या गोंधळामुळे अशा पद्धतीने परीक्षा देणे नको म्हणून अनेक उमेदवार परीक्षा केंद्रातून बाहेर पडले.

पारदर्शकतेवर शंकागोंधळ होत असलेल्या काही वर्गातील उमेदवारांची अन्य वर्गात बैठक व्यवस्था करण्यात आली. यात बराच वेळ गेला. अखेर दुपारी १.४५ वाजता परीक्षेला सुरुवात झाली. जशी व्यवस्था आहे, तशातच २ हजार ९३ उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षा देऊन  बाहेर पडलेल्या उमेदवारांनी परीक्षेच्या नियोजनाविषयी नाराजी व संताप व्यक्त केला. मनपाचे नियोजन चुकले, परीक्षेच्या पारदर्शकतेवर शंका वाटते. ५ वर्षांपासून भरतीसाठी प्रयत्न करतो, अशा परीक्षा होतील, तर आमचे काय होणार, असा सवाल त्यांनी केला. 

प्रश्न क्रमांक ८७ साठी सर्वांना गुणमनपाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतही घोळ झाल्याचे दिसते. परीक्षेनंतर मनपाने संकेतस्थळावर ‘अन्सर की’ अपलोड केली. यात प्रश्न    क्रमांक ८७ साठी सर्वांना गुण देण्यात येत असल्याची सूचना लिहिण्यात आली होती. 

पुढील नियोजनाचा धडानेमके किती उमेदवार परीक्षा देतील, याचा अंदाज नव्हता. तरीही काही वर्गातच उमेदवारांची गैरसोय झाली. बसण्यावरून काही उमेदवारांचा आक्षेप होता. परंतु परीक्षेत बाजूला बसले तरीही कोणी एकमेकांना काही दाखवीत नसतो. थोडा त्रास झाला असला तरी ९० टक्के यशस्वी ठरलो आहोत. यातून पुढील काळातील नियोजनासंदर्भातही एकप्रकारे शिकता आले. सोमवारपर्यंत उमेदवारांची निवड जाहीर करण्याचा प्रयत्न आहे.- डॉ. निपुण विनायक, आयुक्त मनपा

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाexamपरीक्षाStudentविद्यार्थी