शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

हाकेचे अंतर अन डोळ्याने दिसणारे घर गाठण्यासाठी दोन कि.मी. फेरा

By साहेबराव हिवराळे | Updated: July 1, 2023 20:38 IST

एक दिवस एक वसाहत: काखेत कळसा अन् गावाला वळसा ...! दत्तनगरी, सदाशिवनगर, त्रिमूर्तीनगर, व्यंकटेशनगर, अंजनीनगरवासीयांची व्यथा

छत्रपती संभाजीनगर : देवळाईतील माउलीनगर मागील गट ९०,९२,९४,९६ मागील दत्तनगरी, सदाशिवनगर, त्रिमूर्तीनगर, व्यंकटेशनगर, अंजनीनगरातून शहरात येणारे रस्तेच विकासकांनी बंद केल्याने अगदी घराजवळ असूनही नागरिकांना दोन किलोमीटरचा फेरा मारून नाईकनगरमार्गे घर गाठावे लागते.

या परिसरात अंदाजे १० डॉक्टर, २० वकील, काॅर्पोरेट सेक्टरमधील अधिकारी, सरकारी, निमसरकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, परिचारिका, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात राहतात. येथील रहिवासी मनपाकडे कर अदा करतात, तरीदेखील त्यांना मनपा मूलभूत प्रश्नांसाठी वेठीस धरताना दिसत आहे. कारण ही मंडळी ऑनलाइन तक्रारीही करू शकतात. पण आता कंटाळलेल्या नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

... अन्यथा आंदोलनकाही रस्ते बनले; परंतु इतर सुविधा तर रेंगाळलेल्याच आहेत. रस्ते मोकळे करावेत अन्यथा आंदोलन करावे लागेल.- हेमा पाटील, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा

ज्येष्ठांना अधिक त्रास..भिंतीपलीकडचे सर्व काही दिसते मात्र भिंत ओलांडून जाणे शक्य नाही. तातडीच्या गंभीर प्रसंगीही दूरवरून घर गाठावे लागते.- शरद देशपांडे (ज्येष्ठ नागरिक)

घाण पाण्यातून नाइलाजाने जावे लागते...ड्रेनेजलाइन व पाण्याचीही लाइन टाकण्यात आलेली नाही. सेफ्टी टँक ओव्हरफ्लो होऊन ते पाणी रस्त्यावर वाहते. त्यावेळी घाण पाण्यातूनच मार्ग काढावा लागतो. याविषयी ना मनपा लक्ष देते ना कुणी पदाधिकारी. प्रश्न मांडावेत कुणाकडे, असा सवाल आहे.-प्रल्हाद बावस्कर, रहिवासी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका