शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अतिवृष्टीत २ वनरक्षक वाहून गेले;एकाचा मृतदेह सापडला, दुसरा बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 11:41 IST

पाण्याचा अंदाज न घेता दुचाकी काढण्याच्या प्रयत्नात अपघात

ठळक मुद्देतोल जाऊन पडल्याने दुचाकीसह दोघेही पाण्यात वाहून गेले. भारंबा शिवारातील ओढ्यातील घटना

कन्नड/पिशोर (जि. औरंगाबाद) : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड व सिल्लोड तालुक्यात शनिवारी रात्री अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कन्नड तालुक्यातील भारंबा तांडा शिवारात ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरील दोन वनरक्षक वाहून गेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. यातील एकाचा मृतदेह सापडला असून दुसरा बेपत्ता आहे.

कन्नड तालुक्यातील पिशोरसह परिसरात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. यामुळे अंजना नदीच्या उपनद्या असलेल्या इसम, कोळंबी, भारंबा आदी नद्यांनाही मोठा पूर आला होता. या पावसामुळे शनिवारी रात्री भारंबा शिवारातील ओढ्याला पूर आल्याने पुलावरून तीन फूट पाणी वाहत होते. कन्नड तालुक्यातील जैतखेडा व साळेगाव बीटमध्ये कार्यरत असलेले  राहुल दामोदर जाधव (३०, रा. सिंदखेडराजा) व अजय संतोष भोई (रा. शिरपूर, जि. धुळे) हे दुचाकी क्रमांक (एमएच-१८ एबी-४२९३) वरून पिशोरकडे येत होते. भारंबा तांड्याच्या पुढे आल्यावर नदीला पूर आलेला होता व पाणी पुलावरून वाहत होते. पाण्याचा अंदाज न घेता दुचाकी काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु प्रवाह जास्त असल्याने तोल जाऊन पडल्याने दुचाकीसह दोघेही पाण्यात वाहून गेले.

रविवारी सकाळी काही नागरिकांना दुचाकी पडल्याचे दिसून आले. ही माहिती पिशोर पोलिसांना देण्यात आली. सपोनि. जगदीश पवार, उपनिरीक्षक एन.वाय. अंतरप, पोना. कैलास वाघ यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. गावातील नागरिकांच्या मदतीने शोध घेतला असता एका व्यक्तीचा मृतदेह मिळून आला. ओळखपत्रावरून तो राहुल दामोदर जाधव यांचा असून, ते वनरक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळाली. अधिक माहिती घेतली असता सोबत अजय संतोष भोई हे वनरक्षकसुद्धा त्यांच्या सोबत असल्याचे समजले. पोलीस, वन विभागाचे कर्मचारी व नागरिकांनी भोई यांचा नदीपात्रात नऊ किलोमीटरपर्यंत शोध घेतला. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. शेवटी अग्निशमन विभागाच्या पथकास पाचारण करण्यात आले. मात्र, सायंकाळी ७ वाजेपर्यंत शोध घेऊनही त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. रात्री पावसाची रिमझिम सुरू झाल्याने व अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार असून, नदीकाठच्या गावातील पोलीस पाटलांना काही माहिती मिळाल्यास तात्काळ कळविण्यास सांगण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, राहुल जाधव यांचे पिशोर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. मयत राहुल जाधव हे दोन वर्षांपासून, तर बेपत्ता अजय भोई हे पंधराच दिवसांपूर्वी जैतखेडा व साळेगाव बीटवर रुजू झालेले होते. भोई यांचे शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घरच्या लोकांशी मोबाईलवर बोलणे झाले होते. त्यांनी ड्यूटीवरून दोघे सोबत निघाल्याची माहिती दिली होती, असे सपोनि. पवार यांनी सांगितले.

टॅग्स :forestजंगलDeathमृत्यूAurangabadऔरंगाबादRainपाऊस