शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीत २ वनरक्षक वाहून गेले;एकाचा मृतदेह सापडला, दुसरा बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 11:41 IST

पाण्याचा अंदाज न घेता दुचाकी काढण्याच्या प्रयत्नात अपघात

ठळक मुद्देतोल जाऊन पडल्याने दुचाकीसह दोघेही पाण्यात वाहून गेले. भारंबा शिवारातील ओढ्यातील घटना

कन्नड/पिशोर (जि. औरंगाबाद) : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड व सिल्लोड तालुक्यात शनिवारी रात्री अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कन्नड तालुक्यातील भारंबा तांडा शिवारात ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरील दोन वनरक्षक वाहून गेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. यातील एकाचा मृतदेह सापडला असून दुसरा बेपत्ता आहे.

कन्नड तालुक्यातील पिशोरसह परिसरात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. यामुळे अंजना नदीच्या उपनद्या असलेल्या इसम, कोळंबी, भारंबा आदी नद्यांनाही मोठा पूर आला होता. या पावसामुळे शनिवारी रात्री भारंबा शिवारातील ओढ्याला पूर आल्याने पुलावरून तीन फूट पाणी वाहत होते. कन्नड तालुक्यातील जैतखेडा व साळेगाव बीटमध्ये कार्यरत असलेले  राहुल दामोदर जाधव (३०, रा. सिंदखेडराजा) व अजय संतोष भोई (रा. शिरपूर, जि. धुळे) हे दुचाकी क्रमांक (एमएच-१८ एबी-४२९३) वरून पिशोरकडे येत होते. भारंबा तांड्याच्या पुढे आल्यावर नदीला पूर आलेला होता व पाणी पुलावरून वाहत होते. पाण्याचा अंदाज न घेता दुचाकी काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु प्रवाह जास्त असल्याने तोल जाऊन पडल्याने दुचाकीसह दोघेही पाण्यात वाहून गेले.

रविवारी सकाळी काही नागरिकांना दुचाकी पडल्याचे दिसून आले. ही माहिती पिशोर पोलिसांना देण्यात आली. सपोनि. जगदीश पवार, उपनिरीक्षक एन.वाय. अंतरप, पोना. कैलास वाघ यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. गावातील नागरिकांच्या मदतीने शोध घेतला असता एका व्यक्तीचा मृतदेह मिळून आला. ओळखपत्रावरून तो राहुल दामोदर जाधव यांचा असून, ते वनरक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळाली. अधिक माहिती घेतली असता सोबत अजय संतोष भोई हे वनरक्षकसुद्धा त्यांच्या सोबत असल्याचे समजले. पोलीस, वन विभागाचे कर्मचारी व नागरिकांनी भोई यांचा नदीपात्रात नऊ किलोमीटरपर्यंत शोध घेतला. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. शेवटी अग्निशमन विभागाच्या पथकास पाचारण करण्यात आले. मात्र, सायंकाळी ७ वाजेपर्यंत शोध घेऊनही त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. रात्री पावसाची रिमझिम सुरू झाल्याने व अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार असून, नदीकाठच्या गावातील पोलीस पाटलांना काही माहिती मिळाल्यास तात्काळ कळविण्यास सांगण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, राहुल जाधव यांचे पिशोर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. मयत राहुल जाधव हे दोन वर्षांपासून, तर बेपत्ता अजय भोई हे पंधराच दिवसांपूर्वी जैतखेडा व साळेगाव बीटवर रुजू झालेले होते. भोई यांचे शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घरच्या लोकांशी मोबाईलवर बोलणे झाले होते. त्यांनी ड्यूटीवरून दोघे सोबत निघाल्याची माहिती दिली होती, असे सपोनि. पवार यांनी सांगितले.

टॅग्स :forestजंगलDeathमृत्यूAurangabadऔरंगाबादRainपाऊस