शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

‘जायकवाडी’चे दोन दरवाजे उघडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 4:10 AM

दुष्काळी भागातील पाणीप्रश्नावर मात करण्यासाठी पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचे दोन दरवाजे गुरुवारी उघडून गोदावरी नदीच्या पात्रात १०४८ क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली.

औरंगाबाद : दुष्काळी भागातील पाणीप्रश्नावर मात करण्यासाठी पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचे दोन दरवाजे गुरुवारी उघडूनगोदावरी नदीच्या पात्रात १०४८ क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. या पाण्यातून गोदावरी नदीवरील बंधारे भरण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या आदेशानंतर नाथसागरातून पाणी सोडण्यात येत आहे.नगर आणि नाशिक जिल्ह्यांत गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा ९१ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. परंतु, मराठवाड्यात अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नसल्यामुळे खरिपाची पिके जगविण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे.नाथसागर भरत आलेला असताना मध्य गोदावरी खोऱ्यात दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे नाथसागरातून पाणी सोडून गेदावरी नदीवरील बंधारे भरण्याची मागणी करण्यात आली होती.गुरुवारी प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा ९१.९९ टक्क्यांपर्यंत पोहोचला. त्यानंतर दुपारी नाथसागराच्या दोन दरवाजांमधून १०४८ क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्याशिवाय प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून १२०० क्युसेक, उजव्या कालव्यातून ९०० क्युसेक आणि जलविद्युत प्रकल्पासाठी १५८९ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरण