शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

शहरात दोन दिवस निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 1:15 AM

जायकवाडी येथून औरंगाबाद शहरासाठी पाणीपुरवठा करणाºया पंपगृहाच्या वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्यास मनपा प्रशासन जबाबदार असून, याबाबत महावितरणच्या नावाने खापर फोडण्यात येत असल्याचा खुलासा सहायक कार्यकारी अभियंता रवींद्र गायकवाड यांनी केला

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : जायकवाडी येथून औरंगाबाद शहरासाठी पाणीपुरवठा करणाºया पंपगृहाच्या वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्यास मनपा प्रशासन जबाबदार असून, याबाबत महावितरणच्या नावाने खापर फोडण्यात येत असल्याचा खुलासा सहायक कार्यकारी अभियंता रवींद्र गायकवाड यांनी केला आहे.मनपाने त्यांच्या विद्युत उपकेंद्राची डागडुजी (मेन्टेनन्स) वेळच्या वेळी केल्यास वीजपुरवठा खंडित न होता औरंगाबाद शहरास वेळेवर पाणीपुरवठा करता येईल, असे म्हणत गायकवाड यांनी मनपाचे कानही टोचले. बुधवारी त्यांनी मनपाच्या वीज केंद्राची पाहणी केली तेव्हा ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. महापारेशनच्या उपकेंद्रापासून मनपाच्या उपकेंद्रापर्यंत ३३ केव्ही वाहिनीची देखभाल कंपनीमार्फत करण्यात येते. मनपाच्या पाणीपुरवठा उपकेंद्राच्या सुरुवातीला महावितरणतर्फे अद्ययावत मीटरिंग यंत्रणा लावण्यात आलेली आहे. महापारेशन उपकेंद्र ते महावितरण मीटरपर्यंतची वीजपुरवठ्याची जबाबदारी महावितरण प्रशासनाची असते. मनपा उपकेंद्राची देखभाल व दुरुस्तीकडे, संचालन व सुव्यवस्थेकडे मनपाने दुर्लक्ष केल्यामुळे वाहिनीवर किंवा मीटरमध्ये वारंवार बिघाड होत असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. बुधवारी मनपाच्या मीटरमधील केबल दोन ठिकाणी नादुरुस्त झाल्याने महावितरणच्या लाइनवरदेखील फॉल्ट झाला. केबल फॉल्ट हा आर्थिंग व इतर देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे झाल्याचे चाचणी अभियंता विवेक थोरवे यांनी सांगितले.